शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी ऊसशेती उद्ध्वस्त; उस्मानाबादेत २८ हजार हेक्टर क्षेत्रातील ऊस दुष्काळाने केला गडप !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 16:57 IST

अनेकांचा ऊस लागवडीवर झालेला खर्च मातीत

ठळक मुद्देदमदार पाऊस पडेल, या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी नव्याने उसाची लागवड केली होती.

उस्मानाबाद : नगदी पीक म्हणून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल उसाकडे अधिक आहे. २०१८ मध्ये जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी सुमारे ४८ हजार ८५६ हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड केली. उसाचे हे क्षेत्र सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा अधिक आहे. परंतु, अत्यल्प पर्जन्यमान झाले. त्यामुळे पाण्याअभावी थोडाथोडका नव्हे, तर तब्बल २८ हजार हेक्टर क्षेत्रावरील ऊस मोडून काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊन ठेपली.

सीना-कोळेगाव वगळात जिल्ह्यात एकही मोठा प्रकल्प नाही. याही प्रकल्पाचा परंडा वगळता अन्य तालुक्यांना फारसा फायदा होत नाही. असे असतानाही एखाद दुसऱ्या वर्षी दमदार पाऊस झाल्यानंतर शेतकरी नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या ऊस लागवडीवर भर देतात. ऊस पिकाखालील जिल्ह्याचे सर्वसाधारण क्षेत्र ३९ हजार १०० हेक्टर एवढे असले तरी २०१८ मध्ये शेतकऱ्यांनी मोठ्याप्रमाणात ऊस लागवड केली. तब्बल ४८ हजार ८५६ हेक्टर क्षेत्र उसाखाली आले. असे असतानाच अख्ख्या पावसाळ्यात जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ५२ ते ५४ टक्केच पाऊस झाला. काही तालुक्यात तर पन्नास टक्केही पाऊस पडला नाही. त्यामुळे सध्या जिल्ह्यातील सर्वच तालुके भीषण दुष्काळाचा सामना करीत आहेत.

दुष्काळी दाह एवढा तीव्र आहे की, एकेका गावात पिण्यासाठी पाणी नाही. ३० ते ३५ किमी अंतरावरून टँकरद्वारे पाणी आणावे लागत आहे. अशा परिस्थितीत पिकांसाठी पाण्याचा विचार न केलेलाच बरा. दुष्काळी तडाखा इतर पिकांसोबतच ऊसशेतीलाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. थोडेथोकडे नव्हे, तर पन्नास टक्के क्षेत्र उद्ध्वस्त झाले आहे. ४८ हजार ८५६ पैकी २० हजार ४४५ हेक्टर क्षेत्रातील ऊस शेतकऱ्यांनी मोडून काढला आहे. त्यामुळे आजघडीला केवळ २० हजार ४४५ हेक्टर क्षेत्रावरच ऊस उला आहे.   दरम्यान, यापैकी आणखी काही क्षेत्र कमी होऊ शकते, अशी भिती कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड...दमदार पाऊस पडेल, या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी नव्याने उसाची लागवड केली होती. सुरूवातीच्या काळात बऱ्यापैकी पाऊस झाल्यामुळे ऊसही जोमदार अला होता. परंतु, कालांतराने पावसाने दडी मारली. अख्ख्या पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या ५२ ते ५४ टक्के पाऊस झाला. काही भागात तर पर्जन्यमान पन्नास टक्क्यांच्या आतच आहे. त्यामुळे उसणवारी तसेच पीक कर्ज काढून उसाची नव्याने लागवड केलेले असंख्य शेतकरी अडचणीत आले ओहत. अर्थकारण कोलमडल्यामुळे अशा शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक आधार देण्याची गरज व्यक्त होत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखानेagricultureशेतीdroughtदुष्काळWaterपाणी