शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

पाण्याअभावी ऊसशेती उद्ध्वस्त; उस्मानाबादेत २८ हजार हेक्टर क्षेत्रातील ऊस दुष्काळाने केला गडप !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 16:57 IST

अनेकांचा ऊस लागवडीवर झालेला खर्च मातीत

ठळक मुद्देदमदार पाऊस पडेल, या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी नव्याने उसाची लागवड केली होती.

उस्मानाबाद : नगदी पीक म्हणून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल उसाकडे अधिक आहे. २०१८ मध्ये जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी सुमारे ४८ हजार ८५६ हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड केली. उसाचे हे क्षेत्र सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा अधिक आहे. परंतु, अत्यल्प पर्जन्यमान झाले. त्यामुळे पाण्याअभावी थोडाथोडका नव्हे, तर तब्बल २८ हजार हेक्टर क्षेत्रावरील ऊस मोडून काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊन ठेपली.

सीना-कोळेगाव वगळात जिल्ह्यात एकही मोठा प्रकल्प नाही. याही प्रकल्पाचा परंडा वगळता अन्य तालुक्यांना फारसा फायदा होत नाही. असे असतानाही एखाद दुसऱ्या वर्षी दमदार पाऊस झाल्यानंतर शेतकरी नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या ऊस लागवडीवर भर देतात. ऊस पिकाखालील जिल्ह्याचे सर्वसाधारण क्षेत्र ३९ हजार १०० हेक्टर एवढे असले तरी २०१८ मध्ये शेतकऱ्यांनी मोठ्याप्रमाणात ऊस लागवड केली. तब्बल ४८ हजार ८५६ हेक्टर क्षेत्र उसाखाली आले. असे असतानाच अख्ख्या पावसाळ्यात जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ५२ ते ५४ टक्केच पाऊस झाला. काही तालुक्यात तर पन्नास टक्केही पाऊस पडला नाही. त्यामुळे सध्या जिल्ह्यातील सर्वच तालुके भीषण दुष्काळाचा सामना करीत आहेत.

दुष्काळी दाह एवढा तीव्र आहे की, एकेका गावात पिण्यासाठी पाणी नाही. ३० ते ३५ किमी अंतरावरून टँकरद्वारे पाणी आणावे लागत आहे. अशा परिस्थितीत पिकांसाठी पाण्याचा विचार न केलेलाच बरा. दुष्काळी तडाखा इतर पिकांसोबतच ऊसशेतीलाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. थोडेथोकडे नव्हे, तर पन्नास टक्के क्षेत्र उद्ध्वस्त झाले आहे. ४८ हजार ८५६ पैकी २० हजार ४४५ हेक्टर क्षेत्रातील ऊस शेतकऱ्यांनी मोडून काढला आहे. त्यामुळे आजघडीला केवळ २० हजार ४४५ हेक्टर क्षेत्रावरच ऊस उला आहे.   दरम्यान, यापैकी आणखी काही क्षेत्र कमी होऊ शकते, अशी भिती कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड...दमदार पाऊस पडेल, या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी नव्याने उसाची लागवड केली होती. सुरूवातीच्या काळात बऱ्यापैकी पाऊस झाल्यामुळे ऊसही जोमदार अला होता. परंतु, कालांतराने पावसाने दडी मारली. अख्ख्या पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या ५२ ते ५४ टक्के पाऊस झाला. काही भागात तर पर्जन्यमान पन्नास टक्क्यांच्या आतच आहे. त्यामुळे उसणवारी तसेच पीक कर्ज काढून उसाची नव्याने लागवड केलेले असंख्य शेतकरी अडचणीत आले ओहत. अर्थकारण कोलमडल्यामुळे अशा शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक आधार देण्याची गरज व्यक्त होत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखानेagricultureशेतीdroughtदुष्काळWaterपाणी