शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी ऊसशेती उद्ध्वस्त; उस्मानाबादेत २८ हजार हेक्टर क्षेत्रातील ऊस दुष्काळाने केला गडप !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 16:57 IST

अनेकांचा ऊस लागवडीवर झालेला खर्च मातीत

ठळक मुद्देदमदार पाऊस पडेल, या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी नव्याने उसाची लागवड केली होती.

उस्मानाबाद : नगदी पीक म्हणून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल उसाकडे अधिक आहे. २०१८ मध्ये जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी सुमारे ४८ हजार ८५६ हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड केली. उसाचे हे क्षेत्र सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा अधिक आहे. परंतु, अत्यल्प पर्जन्यमान झाले. त्यामुळे पाण्याअभावी थोडाथोडका नव्हे, तर तब्बल २८ हजार हेक्टर क्षेत्रावरील ऊस मोडून काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊन ठेपली.

सीना-कोळेगाव वगळात जिल्ह्यात एकही मोठा प्रकल्प नाही. याही प्रकल्पाचा परंडा वगळता अन्य तालुक्यांना फारसा फायदा होत नाही. असे असतानाही एखाद दुसऱ्या वर्षी दमदार पाऊस झाल्यानंतर शेतकरी नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या ऊस लागवडीवर भर देतात. ऊस पिकाखालील जिल्ह्याचे सर्वसाधारण क्षेत्र ३९ हजार १०० हेक्टर एवढे असले तरी २०१८ मध्ये शेतकऱ्यांनी मोठ्याप्रमाणात ऊस लागवड केली. तब्बल ४८ हजार ८५६ हेक्टर क्षेत्र उसाखाली आले. असे असतानाच अख्ख्या पावसाळ्यात जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ५२ ते ५४ टक्केच पाऊस झाला. काही तालुक्यात तर पन्नास टक्केही पाऊस पडला नाही. त्यामुळे सध्या जिल्ह्यातील सर्वच तालुके भीषण दुष्काळाचा सामना करीत आहेत.

दुष्काळी दाह एवढा तीव्र आहे की, एकेका गावात पिण्यासाठी पाणी नाही. ३० ते ३५ किमी अंतरावरून टँकरद्वारे पाणी आणावे लागत आहे. अशा परिस्थितीत पिकांसाठी पाण्याचा विचार न केलेलाच बरा. दुष्काळी तडाखा इतर पिकांसोबतच ऊसशेतीलाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. थोडेथोकडे नव्हे, तर पन्नास टक्के क्षेत्र उद्ध्वस्त झाले आहे. ४८ हजार ८५६ पैकी २० हजार ४४५ हेक्टर क्षेत्रातील ऊस शेतकऱ्यांनी मोडून काढला आहे. त्यामुळे आजघडीला केवळ २० हजार ४४५ हेक्टर क्षेत्रावरच ऊस उला आहे.   दरम्यान, यापैकी आणखी काही क्षेत्र कमी होऊ शकते, अशी भिती कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड...दमदार पाऊस पडेल, या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी नव्याने उसाची लागवड केली होती. सुरूवातीच्या काळात बऱ्यापैकी पाऊस झाल्यामुळे ऊसही जोमदार अला होता. परंतु, कालांतराने पावसाने दडी मारली. अख्ख्या पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या ५२ ते ५४ टक्के पाऊस झाला. काही भागात तर पर्जन्यमान पन्नास टक्क्यांच्या आतच आहे. त्यामुळे उसणवारी तसेच पीक कर्ज काढून उसाची नव्याने लागवड केलेले असंख्य शेतकरी अडचणीत आले ओहत. अर्थकारण कोलमडल्यामुळे अशा शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक आधार देण्याची गरज व्यक्त होत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखानेagricultureशेतीdroughtदुष्काळWaterपाणी