शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

नागपंचमीला सापाला पूजले जाते, मग इतर दिवशी का मारले जाते ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:37 IST

उस्मानाबाद : नागपंचमी सणाला सापांची पूजा केली जाते त्याच सापाना मात्र इतर दिवशी नजरेस पडताच निर्दयीपणे मारले जाते. यामुळे ...

उस्मानाबाद : नागपंचमी सणाला सापांची पूजा केली जाते त्याच सापाना मात्र इतर दिवशी नजरेस पडताच निर्दयीपणे मारले जाते. यामुळे दिवसेंदिवस सापांची संख्या कमी होत चालली आहे. सापांबद्दल आजही अनेक गैरसमज आहेत. सापाबद्दल जनजागृती होणे गरजेचे आहे. जिल्ह्यात चारच विषारी साप असून इतर साप बिनविषारी आहेत. साप हा जीवसृष्टीतील महत्वाचा असल्याने त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे.

मार्च-एप्रिल हा सापाच्या मिलनाचा काळा असतो. मे महिन्यात साप अंडी घालत असतो. सापाची अंडी उबवण्यासाठी ३० डिग्री अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची गरज असते. असे तापमान असलेल्या ठिकाणी साप अंडी सोडतो. यातून ५५ ते ६५ दिवसात म्हणजेच जून-जुलै महिन्यात पिल्ले निघण्याचा काळ असतो. या महिन्यात पावसामुळे सर्वत्र हिरवळ असते. त्यामुळे या काळात सर्वत्र साप दिसतात. जिल्ह्यात १५ प्रकारचे साप आढळून येतात. त्यामध्ये केवळ ४ विषारी साप तर दोन निम्न विषारी साप आहेत. तर उर्वरित बिनविषारी साप आहेत. सापाबद्दल असलेल्या भीतीचा फटका बिनविषारी सापांना बसतो. विषारी साप चावल्यानंतर प्रथमोपचार करून योग्य वेळेत‌ उपचार मिळाल्यास जीव वाचू शकतो. त्यामुळे नागरिकांनी पावसाळ्यात खबरदारी घेण्याचे आवाहन सर्पमित्रांनी केले आहे.

विषारी : जिल्ह्यात सापाच्या चार विषारी जाती आढळून येतात.

नाग (नागराज) जो फणा काढून उभा राहतो तो नाग, मण्यार काळपट नीळसर रंग, फुरसे या सापाची फूटपट्टी एवढी लांबी, शरीरावर वेलबट्टीसारखे नक्षीकाम असते. घोणस हा साप कुकरच्या शिट्टीचा आवाज काढतो, अंगावर साखळीसारखे काळ्या रंगाचे ठिपके असणाऱ्या रेषा असतात.

बिनविषारी

जिल्ह्यात मांजऱ्या व हरणटोळ हे दोन साप निम्नविषारी साप आढळून येतात. धामण, कड्या, तस्कर, गवत्या, पांदीवड, नानीटी हे साप बिनविषारी आहेत. मात्र, नागरिक साप म्हटले की सर्वच साप विषारी समजून त्यांना इजा पोहोचवित असतात. साप हे जीवसृष्टीतील महत्त्वाचा असल्याने त्याचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे.

साप आढळला तर...

शेतात तसेच रस्त्याला साप आढळून आला तर नागरिकांनी त्यास इजा न पोहोचविता जाऊ द्यावे.

घरात साप आढळून आला तर त्याच्यापासून ५ ते ६ फूट अंतर राखून उभे राहावे.

घोणस जातीच्या सापाला डिवचल्यानंतर तो मानवावर हल्ला करू शकतो.

घराच्या परिसरात नाग आढळून आला तर ज्या ठिकाणाहून साप येण्याची शक्यता वाटते त्या ठिकाणी रॉकेल आणि पाणी शिंपडावे. साप चावल्यानंतर नागरिकांचा भीती पोटीच मृत्यू होता. त्यामुळे साप चावल्यानंतर भीती न बाळगता रुग्णालय गाठणे सोयीचे ठरते.

साप तर शेतकऱ्यांचा मित्र

जिल्ह्यात अनेकांचा व्यवसाय शेतीआधारीत आहेत. शेतीवरच बहुतांश व्यक्तींची उपजिविका भागते. शेतातील पिकांचे उदीर मोठ्या प्रमाणात नुकसान करीत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतो. मात्र, सापाचे खाद्य उदीर असल्याने शेतात सापांचे वास्तव्य असल्यास उदीरापासून धान्याचे संरक्षण होते.

कोट...

साप तिन्ही ऋतूत आढळून येतात. नाग, घोणस, मण्यार, फुरसे या चार विषारी प्रजाती आहेत. पावसाळ्याच्या दिवसात शेतात काम करताना नागरिकांनी खबरदारी बाळगावी. तसेच मानवी वस्तीत साप आढळून आल्यानंतर त्यास इजा न पोहोचविता सर्पमित्रांशी संपर्क साधावा. दूध हे सापाचे अन्न नसल्यामुळे सापला दूध पाजू नये.

सुरज मस्के, सर्पमित्र