शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

धक्कादायक ! सोयीचा अर्थ लावून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना नाकारली मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 18:32 IST

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना १ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान शासनाकडून दिले जाते.

ठळक मुद्देइमानदारीचे घोडे गाढवांच्या बाजारात उभे करण्याचा प्रकारकर्ज खाते चालू बाकी असल्याने ९६ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मदत नाकारली

- चेतन धनुरे 

उस्मानाबाद : शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत राज्यात शीर्षस्थानी असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मिळणारी आर्थिक मदतही सोयीचा अर्थ लावून डावलण्याचे प्रकार घडले आहेत. पात्रतेसाठी तीन निकष असतानाही थकबाकीदार नाही म्हणून प्रकरणे अपात्र ठरवत तब्बल ९६ शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मागील ३ वर्षांत मदत नाकारली गेली. हा तर इमानदारीचे घोडे गाढवांच्या बाजारात उभे करण्याचा प्रकार ठरला आहे.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना १ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान शासनाकडून दिले जाते. त्यासाठी नापिकी, बँक - सावकारी कर्ज थकबाकीदार व परतफेडीसाठी तगादा हे निकष शासनाने २००६ साली घालून दिले आहेत. यापैकी एकाही निकषात आत्महत्येचे प्रकरण बसत असल्यास संबंधित मयत शेतकऱ्याच्या वारसांना मदत दिली जाते. ही प्रकरणे जिल्हास्तरीय समिती निकाली काढत असते. दरम्यान, मागील काही वर्षांत या समितीने मयत शेतकरी बँक किंवा सावकाराच्या कर्जाचा थकबाकीदार असणे, या केवळ एकाच निकषावर प्रकरणे निकाली काढली. यावेळी नापिकीच्या निकषाचा विचारच झालेला नाही. एखादा शेतकरी इमानदारीने कर्जाचे हप्ते भरतो. मात्र, सातत्याने उद्भवणाऱ्या नापिकीमुळे त्याच्यावर हप्ते कसे भरायचे, अशी वेळ येते. केवळ सोयीचा अर्थ लावून २०१७ नंतर तब्बल ९६ शेतकरी कुटुंबांना मदतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे.

सचिवांकडे प्रस्ताव...२०१७ नंतर जिल्ह्यात केवळ कर्ज खाते चालू बाकी असल्याने ९६ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मदत नाकारली आहे. वास्तविक पाहता नापिकी किंवा परतफेडीसाठी तगादा हे निकष तेव्हा बाजूला ठेवले गेले. त्यामुळे हे शेतकरी कुटुंब वंचित राहिले. त्यामुळे या संबंधित ९६ शेतकरी कुटुंबांप्रति सहानुभूती दर्शवून त्यांना अनुदान देण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी मदत व पुनर्वसनच्या सचिवांकडे पाठविला आहे. मात्र, महिन्यानंतरही अद्याप निर्णय झालेला नाही.

७६ कुटुंबांना फेरआढाव्यात न्याय.मागील महिन्यात विभागीय आयुक्तांकडे झालेल्या बैठकीत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रकरणांचा आढावा घेतला. त्यात प्रकरणे अपात्र ठरविली गेलेली मोठी संख्या उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणांचा फेरआढावा घेतला. गत एका वर्षात १२७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी ९४ प्रकरणे कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने अपात्र ठरविली होती. यापैकी ७६ आत्महत्या या नापिकीने झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संवेदनशीलता जपत महसूल विभागाने त्यांच्या वारसांकडून ही कागदपत्रे घेऊन व त्यांना पात्र ठरवून ७६ लाख रुपयांचे अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याagricultureशेतीOsmanabadउस्मानाबाद