शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

धक्कादायक ! सोयीचा अर्थ लावून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना नाकारली मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 18:32 IST

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना १ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान शासनाकडून दिले जाते.

ठळक मुद्देइमानदारीचे घोडे गाढवांच्या बाजारात उभे करण्याचा प्रकारकर्ज खाते चालू बाकी असल्याने ९६ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मदत नाकारली

- चेतन धनुरे 

उस्मानाबाद : शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत राज्यात शीर्षस्थानी असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मिळणारी आर्थिक मदतही सोयीचा अर्थ लावून डावलण्याचे प्रकार घडले आहेत. पात्रतेसाठी तीन निकष असतानाही थकबाकीदार नाही म्हणून प्रकरणे अपात्र ठरवत तब्बल ९६ शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मागील ३ वर्षांत मदत नाकारली गेली. हा तर इमानदारीचे घोडे गाढवांच्या बाजारात उभे करण्याचा प्रकार ठरला आहे.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना १ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान शासनाकडून दिले जाते. त्यासाठी नापिकी, बँक - सावकारी कर्ज थकबाकीदार व परतफेडीसाठी तगादा हे निकष शासनाने २००६ साली घालून दिले आहेत. यापैकी एकाही निकषात आत्महत्येचे प्रकरण बसत असल्यास संबंधित मयत शेतकऱ्याच्या वारसांना मदत दिली जाते. ही प्रकरणे जिल्हास्तरीय समिती निकाली काढत असते. दरम्यान, मागील काही वर्षांत या समितीने मयत शेतकरी बँक किंवा सावकाराच्या कर्जाचा थकबाकीदार असणे, या केवळ एकाच निकषावर प्रकरणे निकाली काढली. यावेळी नापिकीच्या निकषाचा विचारच झालेला नाही. एखादा शेतकरी इमानदारीने कर्जाचे हप्ते भरतो. मात्र, सातत्याने उद्भवणाऱ्या नापिकीमुळे त्याच्यावर हप्ते कसे भरायचे, अशी वेळ येते. केवळ सोयीचा अर्थ लावून २०१७ नंतर तब्बल ९६ शेतकरी कुटुंबांना मदतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे.

सचिवांकडे प्रस्ताव...२०१७ नंतर जिल्ह्यात केवळ कर्ज खाते चालू बाकी असल्याने ९६ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मदत नाकारली आहे. वास्तविक पाहता नापिकी किंवा परतफेडीसाठी तगादा हे निकष तेव्हा बाजूला ठेवले गेले. त्यामुळे हे शेतकरी कुटुंब वंचित राहिले. त्यामुळे या संबंधित ९६ शेतकरी कुटुंबांप्रति सहानुभूती दर्शवून त्यांना अनुदान देण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी मदत व पुनर्वसनच्या सचिवांकडे पाठविला आहे. मात्र, महिन्यानंतरही अद्याप निर्णय झालेला नाही.

७६ कुटुंबांना फेरआढाव्यात न्याय.मागील महिन्यात विभागीय आयुक्तांकडे झालेल्या बैठकीत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रकरणांचा आढावा घेतला. त्यात प्रकरणे अपात्र ठरविली गेलेली मोठी संख्या उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणांचा फेरआढावा घेतला. गत एका वर्षात १२७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी ९४ प्रकरणे कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने अपात्र ठरविली होती. यापैकी ७६ आत्महत्या या नापिकीने झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संवेदनशीलता जपत महसूल विभागाने त्यांच्या वारसांकडून ही कागदपत्रे घेऊन व त्यांना पात्र ठरवून ७६ लाख रुपयांचे अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याagricultureशेतीOsmanabadउस्मानाबाद