शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

लसीकरणाबाबत ग्रामीण भागात अफवा; आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:23 IST

उस्मानाबाद : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शासनाने लसीकरण मोहिमेवर जोर दिला आहे. शहरी भागात लसीकरण मोहिमेस प्रतिसाद मिळत आहे. ...

उस्मानाबाद : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शासनाने लसीकरण मोहिमेवर जोर दिला आहे. शहरी भागात लसीकरण मोहिमेस प्रतिसाद मिळत आहे. मात्र, काही महाभागांनी मृत्यू होतो, तर काहींनी अपत्य होत नाही, अशी खुळचट अफवा पसरवली. ते शंभर टक्के चूक असून, आरोग्य विभागाला हे समजावून सांगण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गास आळा बसावा, यासाठी शासन स्तरावरून लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. १६ जानेवारीपासून लसीकरणास प्रारंभ झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर यांना लस देण्यात आली होती. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षांपुढील नागरिकांना लस टोचली जात आहे. मागील दोन महिन्यांत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने सजग नागरिक लस घेण्यास प्राधान्य देत आहेत. मात्र, असे असतानाच काही महाभाग लस घेतल्यानंतर दोन वर्षांत मृत्यू ओढवतो, तर काहींनी अपत्य होत नाही, अशी खुळचट अफवा पसरविली आहे, तर काहींनी समाजमाध्यमाद्वारे अशा अफवांना हवा देण्याचे काम केले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात अनेक नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत संभ्रमावस्था निर्माण होत आहे. ही अफवा शंभर टक्के चूक असून, आरोग्य विभागाला हे समजावून सांगण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

काय आहेत अफवा...

अशी आहे पहिली अफवा

लस घेतल्यानंतर माणूस आजारी पडतो, अशक्तपणा येतो. कोविशिल्ड लस घेतल्यानंतर ताप, अंगदुखी, मळमळ, तोंड येणे असे आजार होत आहेत.

अशी आहे दुसरी अफवा

निरोगी असलेल्या व्यक्तीने लस घेतली तर लस घेतल्यानंतर त्या व्यक्तीचा पंधरा दिवसांनी मृत्यू हाेत आहे. तसेच लस घेतल्यानंतर दोन वर्षांच्या आत माणसाचा मृत्यू होताे.

अशी आहे तिसरी अफवा

लस घेतल्यानंतर त्याचा मानवी शरीरावर विपरीत परिणाम होताे. महिलांनी लस घेतल्यानंतर मुले होत नाहीत. अशा अफवाही ग्रामीण भागात काही ठिकाणी पसरविल्या आहेत.

प्रतिक्रिया..

लस न घेतलेल्या व्यक्तींमध्ये कोरोना प्रतिबंधित लस घेण्यासाठी अद्यापही समज - गैरसमज आहेत. लस घेतल्यानंतर माणूस आजारी पडत आहे. ताप येणे, कणकण येणे, उलटी, डोकेदुखी, छातीत वेदना याचा त्रास होत आहे. त्यामुळे लस घ्यावी की नाही, घेतल्यानंतर काय परिणाम होईल, याची मनात शंका आहे. त्यामुळे मी अद्यापर्यंत लस घेतली नाही.

अनिल गुरव, केसरजवळगा

कोट...

लसीकरणाबाबत ग्रामीण भागात मागील काही दिवसांपूर्वी आजारी पडण्याची अफवा होती. तसेच समाजमाध्यमांद्वारे अफवा पसरविल्या जात असतात. लसीचा मानवी शरीरावर दुष्परिणाम होत नसून, लस उपयुक्त आहे. लसीबाबत ग्रामीण भागात आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्तीमार्फत जनजागृती केली जात आहे.

डॉ. कुलदीप मिटकरी, जिल्हा लसीकरण अधिकारी