शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

लसीकरणाबाबत ग्रामीण भागात अफवा; आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:23 IST

उस्मानाबाद : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शासनाने लसीकरण मोहिमेवर जोर दिला आहे. शहरी भागात लसीकरण मोहिमेस प्रतिसाद मिळत आहे. ...

उस्मानाबाद : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शासनाने लसीकरण मोहिमेवर जोर दिला आहे. शहरी भागात लसीकरण मोहिमेस प्रतिसाद मिळत आहे. मात्र, काही महाभागांनी मृत्यू होतो, तर काहींनी अपत्य होत नाही, अशी खुळचट अफवा पसरवली. ते शंभर टक्के चूक असून, आरोग्य विभागाला हे समजावून सांगण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गास आळा बसावा, यासाठी शासन स्तरावरून लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. १६ जानेवारीपासून लसीकरणास प्रारंभ झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर यांना लस देण्यात आली होती. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षांपुढील नागरिकांना लस टोचली जात आहे. मागील दोन महिन्यांत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने सजग नागरिक लस घेण्यास प्राधान्य देत आहेत. मात्र, असे असतानाच काही महाभाग लस घेतल्यानंतर दोन वर्षांत मृत्यू ओढवतो, तर काहींनी अपत्य होत नाही, अशी खुळचट अफवा पसरविली आहे, तर काहींनी समाजमाध्यमाद्वारे अशा अफवांना हवा देण्याचे काम केले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात अनेक नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत संभ्रमावस्था निर्माण होत आहे. ही अफवा शंभर टक्के चूक असून, आरोग्य विभागाला हे समजावून सांगण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

काय आहेत अफवा...

अशी आहे पहिली अफवा

लस घेतल्यानंतर माणूस आजारी पडतो, अशक्तपणा येतो. कोविशिल्ड लस घेतल्यानंतर ताप, अंगदुखी, मळमळ, तोंड येणे असे आजार होत आहेत.

अशी आहे दुसरी अफवा

निरोगी असलेल्या व्यक्तीने लस घेतली तर लस घेतल्यानंतर त्या व्यक्तीचा पंधरा दिवसांनी मृत्यू हाेत आहे. तसेच लस घेतल्यानंतर दोन वर्षांच्या आत माणसाचा मृत्यू होताे.

अशी आहे तिसरी अफवा

लस घेतल्यानंतर त्याचा मानवी शरीरावर विपरीत परिणाम होताे. महिलांनी लस घेतल्यानंतर मुले होत नाहीत. अशा अफवाही ग्रामीण भागात काही ठिकाणी पसरविल्या आहेत.

प्रतिक्रिया..

लस न घेतलेल्या व्यक्तींमध्ये कोरोना प्रतिबंधित लस घेण्यासाठी अद्यापही समज - गैरसमज आहेत. लस घेतल्यानंतर माणूस आजारी पडत आहे. ताप येणे, कणकण येणे, उलटी, डोकेदुखी, छातीत वेदना याचा त्रास होत आहे. त्यामुळे लस घ्यावी की नाही, घेतल्यानंतर काय परिणाम होईल, याची मनात शंका आहे. त्यामुळे मी अद्यापर्यंत लस घेतली नाही.

अनिल गुरव, केसरजवळगा

कोट...

लसीकरणाबाबत ग्रामीण भागात मागील काही दिवसांपूर्वी आजारी पडण्याची अफवा होती. तसेच समाजमाध्यमांद्वारे अफवा पसरविल्या जात असतात. लसीचा मानवी शरीरावर दुष्परिणाम होत नसून, लस उपयुक्त आहे. लसीबाबत ग्रामीण भागात आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्तीमार्फत जनजागृती केली जात आहे.

डॉ. कुलदीप मिटकरी, जिल्हा लसीकरण अधिकारी