शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

लसीकरणाबाबत ग्रामीण भागात अफवा; आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:23 IST

उस्मानाबाद : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शासनाने लसीकरण मोहिमेवर जोर दिला आहे. शहरी भागात लसीकरण मोहिमेस प्रतिसाद मिळत आहे. ...

उस्मानाबाद : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शासनाने लसीकरण मोहिमेवर जोर दिला आहे. शहरी भागात लसीकरण मोहिमेस प्रतिसाद मिळत आहे. मात्र, काही महाभागांनी मृत्यू होतो, तर काहींनी अपत्य होत नाही, अशी खुळचट अफवा पसरवली. ते शंभर टक्के चूक असून, आरोग्य विभागाला हे समजावून सांगण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गास आळा बसावा, यासाठी शासन स्तरावरून लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. १६ जानेवारीपासून लसीकरणास प्रारंभ झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर यांना लस देण्यात आली होती. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षांपुढील नागरिकांना लस टोचली जात आहे. मागील दोन महिन्यांत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने सजग नागरिक लस घेण्यास प्राधान्य देत आहेत. मात्र, असे असतानाच काही महाभाग लस घेतल्यानंतर दोन वर्षांत मृत्यू ओढवतो, तर काहींनी अपत्य होत नाही, अशी खुळचट अफवा पसरविली आहे, तर काहींनी समाजमाध्यमाद्वारे अशा अफवांना हवा देण्याचे काम केले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात अनेक नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत संभ्रमावस्था निर्माण होत आहे. ही अफवा शंभर टक्के चूक असून, आरोग्य विभागाला हे समजावून सांगण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

काय आहेत अफवा...

अशी आहे पहिली अफवा

लस घेतल्यानंतर माणूस आजारी पडतो, अशक्तपणा येतो. कोविशिल्ड लस घेतल्यानंतर ताप, अंगदुखी, मळमळ, तोंड येणे असे आजार होत आहेत.

अशी आहे दुसरी अफवा

निरोगी असलेल्या व्यक्तीने लस घेतली तर लस घेतल्यानंतर त्या व्यक्तीचा पंधरा दिवसांनी मृत्यू हाेत आहे. तसेच लस घेतल्यानंतर दोन वर्षांच्या आत माणसाचा मृत्यू होताे.

अशी आहे तिसरी अफवा

लस घेतल्यानंतर त्याचा मानवी शरीरावर विपरीत परिणाम होताे. महिलांनी लस घेतल्यानंतर मुले होत नाहीत. अशा अफवाही ग्रामीण भागात काही ठिकाणी पसरविल्या आहेत.

प्रतिक्रिया..

लस न घेतलेल्या व्यक्तींमध्ये कोरोना प्रतिबंधित लस घेण्यासाठी अद्यापही समज - गैरसमज आहेत. लस घेतल्यानंतर माणूस आजारी पडत आहे. ताप येणे, कणकण येणे, उलटी, डोकेदुखी, छातीत वेदना याचा त्रास होत आहे. त्यामुळे लस घ्यावी की नाही, घेतल्यानंतर काय परिणाम होईल, याची मनात शंका आहे. त्यामुळे मी अद्यापर्यंत लस घेतली नाही.

अनिल गुरव, केसरजवळगा

कोट...

लसीकरणाबाबत ग्रामीण भागात मागील काही दिवसांपूर्वी आजारी पडण्याची अफवा होती. तसेच समाजमाध्यमांद्वारे अफवा पसरविल्या जात असतात. लसीचा मानवी शरीरावर दुष्परिणाम होत नसून, लस उपयुक्त आहे. लसीबाबत ग्रामीण भागात आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्तीमार्फत जनजागृती केली जात आहे.

डॉ. कुलदीप मिटकरी, जिल्हा लसीकरण अधिकारी