शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

दिवसभर रिपरिप, पिकांचे नुकसान, ऊस आडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 17:15 IST

मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस होत असल्यामुळे काढणीला असलेल्या सोयाबीनसह उसाला मोठा फटका बसला आहे. आजवर जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या सुमारे ९९.१ टक्के एवढा पाऊस नोंदविला गेला आहे.

उस्मानाबाद : मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस होत असल्यामुळे काढणीला असलेल्या सोयाबीनसह उसाला मोठा फटका बसला आहे. आजवर जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या सुमारे ९९.१ टक्के एवढा पाऊस नोंदविला गेला आहे.

यंदा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच पावसाने दमदार सुरूवात केली होती. पुढेही पावसाने हे सातत्य कायम राखले. त्यामुळे दि. ११ ऑक्टोबरअखेर जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ६२६.५ मिमी म्हणजेच ९९.१ टक्के एवढा पाऊस नोंदविला गेला. यामध्ये उस्मानाबाद तालुक्यात आजवर ६५५.३ मिमी पाऊस पडला आहे. याचे प्रमाण ९८.३ टक्के आहे.

दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या भूम तसेच परंडा तालुक्यात यंदा प्रत्येकी ९४.३ टक्के पाऊस पडला आहे. वाशी तालुक्यात ९८.१ तर तुळजापूर तालुक्यामध्ये सर्वात कमी ८५.२ मिमी टक्के पाऊस झाला आहे. दरम्यान, तीन तालुक्यांत पावसाने शंभरी ओलांडली आहे. कळंब तालुक्यात १०१.३ टक्के, उमरगा १२६.८ टक्के तर लोहारा तालुक्यात १२१.६ टक्के एवढा पाऊस झाला आहे. असे असतानाच हवामान खात्याने केलेल्या भाकितानुसार मागील दोन दिवसांपासून पुन्हा पाऊस होऊ लागला आहे.

हा पाऊस रबी पेरणीसाठी पुरक ठरणारा असला तरी सध्या काढणी सुरू असलेल्या सोयाबीनसह उसाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे हजारो हेक्टवरील ऊस आडवा झाला आहे. पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश लघु, मध्यम तसेच साठवण तलाव तुडूंब भरले आहेत. काही प्रकल्प तर ओव्हरफ्लो झाले आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासोबत शेतीच्या सिंचनासाठी संबंधित प्रकल्पांवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीDamधरणMarathwadaमराठवाडा