शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

दिवसभर रिपरिप, पिकांचे नुकसान, ऊस आडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 17:15 IST

मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस होत असल्यामुळे काढणीला असलेल्या सोयाबीनसह उसाला मोठा फटका बसला आहे. आजवर जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या सुमारे ९९.१ टक्के एवढा पाऊस नोंदविला गेला आहे.

उस्मानाबाद : मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस होत असल्यामुळे काढणीला असलेल्या सोयाबीनसह उसाला मोठा फटका बसला आहे. आजवर जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या सुमारे ९९.१ टक्के एवढा पाऊस नोंदविला गेला आहे.

यंदा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच पावसाने दमदार सुरूवात केली होती. पुढेही पावसाने हे सातत्य कायम राखले. त्यामुळे दि. ११ ऑक्टोबरअखेर जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ६२६.५ मिमी म्हणजेच ९९.१ टक्के एवढा पाऊस नोंदविला गेला. यामध्ये उस्मानाबाद तालुक्यात आजवर ६५५.३ मिमी पाऊस पडला आहे. याचे प्रमाण ९८.३ टक्के आहे.

दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या भूम तसेच परंडा तालुक्यात यंदा प्रत्येकी ९४.३ टक्के पाऊस पडला आहे. वाशी तालुक्यात ९८.१ तर तुळजापूर तालुक्यामध्ये सर्वात कमी ८५.२ मिमी टक्के पाऊस झाला आहे. दरम्यान, तीन तालुक्यांत पावसाने शंभरी ओलांडली आहे. कळंब तालुक्यात १०१.३ टक्के, उमरगा १२६.८ टक्के तर लोहारा तालुक्यात १२१.६ टक्के एवढा पाऊस झाला आहे. असे असतानाच हवामान खात्याने केलेल्या भाकितानुसार मागील दोन दिवसांपासून पुन्हा पाऊस होऊ लागला आहे.

हा पाऊस रबी पेरणीसाठी पुरक ठरणारा असला तरी सध्या काढणी सुरू असलेल्या सोयाबीनसह उसाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे हजारो हेक्टवरील ऊस आडवा झाला आहे. पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश लघु, मध्यम तसेच साठवण तलाव तुडूंब भरले आहेत. काही प्रकल्प तर ओव्हरफ्लो झाले आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासोबत शेतीच्या सिंचनासाठी संबंधित प्रकल्पांवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीDamधरणMarathwadaमराठवाडा