शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

दिवसभर रिपरिप, पिकांचे नुकसान, ऊस आडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 17:15 IST

मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस होत असल्यामुळे काढणीला असलेल्या सोयाबीनसह उसाला मोठा फटका बसला आहे. आजवर जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या सुमारे ९९.१ टक्के एवढा पाऊस नोंदविला गेला आहे.

उस्मानाबाद : मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस होत असल्यामुळे काढणीला असलेल्या सोयाबीनसह उसाला मोठा फटका बसला आहे. आजवर जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या सुमारे ९९.१ टक्के एवढा पाऊस नोंदविला गेला आहे.

यंदा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच पावसाने दमदार सुरूवात केली होती. पुढेही पावसाने हे सातत्य कायम राखले. त्यामुळे दि. ११ ऑक्टोबरअखेर जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ६२६.५ मिमी म्हणजेच ९९.१ टक्के एवढा पाऊस नोंदविला गेला. यामध्ये उस्मानाबाद तालुक्यात आजवर ६५५.३ मिमी पाऊस पडला आहे. याचे प्रमाण ९८.३ टक्के आहे.

दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या भूम तसेच परंडा तालुक्यात यंदा प्रत्येकी ९४.३ टक्के पाऊस पडला आहे. वाशी तालुक्यात ९८.१ तर तुळजापूर तालुक्यामध्ये सर्वात कमी ८५.२ मिमी टक्के पाऊस झाला आहे. दरम्यान, तीन तालुक्यांत पावसाने शंभरी ओलांडली आहे. कळंब तालुक्यात १०१.३ टक्के, उमरगा १२६.८ टक्के तर लोहारा तालुक्यात १२१.६ टक्के एवढा पाऊस झाला आहे. असे असतानाच हवामान खात्याने केलेल्या भाकितानुसार मागील दोन दिवसांपासून पुन्हा पाऊस होऊ लागला आहे.

हा पाऊस रबी पेरणीसाठी पुरक ठरणारा असला तरी सध्या काढणी सुरू असलेल्या सोयाबीनसह उसाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे हजारो हेक्टवरील ऊस आडवा झाला आहे. पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश लघु, मध्यम तसेच साठवण तलाव तुडूंब भरले आहेत. काही प्रकल्प तर ओव्हरफ्लो झाले आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासोबत शेतीच्या सिंचनासाठी संबंधित प्रकल्पांवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीDamधरणMarathwadaमराठवाडा