शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

कर्नाटकातील मराठी साहित्य संमेलनावर बंदीवर निषेधाचा ठराव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 3:42 AM

'कर्नाटक सरकारचा निर्णय अन्यायकारक आहे. मराठी समाज त्याचा निषेध करत आहे.

उस्मानाबाद : कुद्रेमनी येथील मराठी साहित्य संमेलनावर कर्नाटक सरकारने बंदी घातली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात याचा ठरावाद्वारे निषेध केला जाणार आहे.

संमेलनाने मराठी भाषिक चळवळीला बळ दिले. मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, 'कर्नाटक सरकारचा निर्णय अन्यायकारक आहे. मराठी समाज त्याचा निषेध करत आहे. प्रत्येक प्रांतातील माणसाला आपली भाषा, साहित्य जपण्याचा, संमेलन भरवण्याचा अधिकार आहे. राज्य सरकार त्यावर बंदी घालत असेल, गदा आणत असेल तर केंद्र सरकारने त्यांना या चुकीची जाणीव करून दिली पाहिजे.सीमेवरील स्थानिक लोक भाषेचे रक्षक आहेत. त्यांच्याशी कोणी प्रतारणा करणार असेल तर विचारवंत, साहित्यिक गप्प बसणार नाहीत.संमेलन मंचावरील घुसखोरीने उडाला गोंधळसंमेलनाच्या दुसऱ्या दिवशी परिसंवादाच्या मंचावर अचानकपणे घुसखोरी झाल्याने काही काळ गोंधळ उडाला. मात्र, लगेच सर्व सुरळीत झाले.

‘संत साहित्याचे सामाजिक दृष्टीने पुरेसे आकलन न झाल्यामुळे समाजात बुवाबाजीचे प्रस्थ वाढले, वाढत आहे’, या विषयावर शनिवारी परिसंवाद होता. पहिले वक्ते बोलण्यास उभे राहिले असता, अचानकपणे लातूर येथील डॉ. जगन्नाथ पाटील हे मंचावर चढले. त्यांनी मला बोलू द्या, माझी भूमिका मांडू द्या, त्यानंतरच मी मंचावरून उतरतो, असा पवित्रा घेतला. तितक्यात दहा ते बाराजण मंचावर आले होते. त्यामुळे गडबड होणार हे पाहून पोलिसांनी सर्वांनाच मंचावरून खाली आणले.

दरम्यान, मंचावर अचानकपणे गेलेले डॉ. जगन्नाथ पाटील म्हणाले, प्रदर्शनात माझी पुस्तके आहेत. मी साहित्यिक, पत्रकार आहे. संत साहित्य आणि बुवाबाजी याबद्दल मला बोलायचे होते. शासनाने संत साहित्याचे विद्यापीठ स्थापन केले आहे. त्याबद्दल मी याचिकाही दाखल केली आहे. मी मंचावर असताना इतर दहा-बाराजण कोण आले होते, याची मला माहिती नाही.