शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

यंदा पाऊसमान चांगले राहील; पंचांगकर्त्यांसह हवामान तज्ज्ञांचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2023 16:57 IST

शेतकरी हवालदिल न होता सुखात व आनंदात राहतील, असा अंदाज पंचांगकर्त्याने वर्तविला आहे.

- व्ही. एस. कुलकर्णीउदगीर : यंदाच्या शोभन नाम संवत्सरात मेघाचा निवास रजकाचे घरी असल्यामुळे पाऊस पुष्कळ प्रमाणात होऊन धन-धान्यांची समृद्धी होईल. एकंदरित हे वर्ष चांगले असणार आहे. मात्र, सोसाट्याचा वारा सुटून संकटे उद्भवतील. धान्यांची, धनाची नासाडी होऊन घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याचा अंदाज पंचांगकर्ते व हवामान तज्ज्ञाने वर्तविला आहे.

यंदा गूळ, तूप, मध कमी प्रमाणात मिळणार आहे. तसेच मणी, मोती, सोने महाग होणार आहे. जनावरांकडून दूध, दुभते भरपूर मिळणार आहे. धार्मिक कार्यक्रम वाढत जातील. शेतकरी हवालदिल न होता सुखात व आनंदात राहतील, असा अंदाज दाते व अन्य एका पंचांगकर्त्याने वर्तविला आहे. तर अन्य तिसऱ्या एका पंचांगकर्त्याने पावसाचे मान निराशाजनक असून, काही ठिकाणी ओला तर काही ठिकाणी कोरडा दुष्काळाला तोंड द्यावे लागेल. शेती व पिकाविषयीचे अंदाज चुकतील. जीवनावश्यक वस्तूंची टंचाई जाणवेल व रोगराईचे प्रमाण वाढेल, असा अंदाज वर्तविला आहे.

एप्रिलच्या मध्यापासून उष्णतामानात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. मेच्या मध्यभागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मान्सूनच्या पावसाला १५ जूनपासून सुरुवात होईल. ८ जून रोजी मृग नक्षत्रास सुरुवात होणार असली तरी २२ जूननंतर पावसाला सुरुवात होऊन खरिपाच्या पेरण्यांना प्रारंभ होईल. ऑक्टोबरपर्यंत भरपूर पाऊस होणार असल्याचा अंदाज पंचांगकर्त्यांनी वर्तविला आहे.

२०२३ मध्ये चांगला पाऊस होणार : पंजाब डकप्रत्येक भूभागाला एकच समुद्र आहे. मात्र महाराष्ट्राच्या बाजूला अरबी व बंगालच्या खाडीचे असे दोन समुद्र आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात दरवर्षी ७ जूननंतर पाऊस होतोच. इलनिनो व लालीना या समुद्रातील प्रक्रिया आहेत. सध्या समुद्रात इलनिनोची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे दुष्काळ पडतो, अशी अफवा सुरू आहे. शेतकऱ्यांनी या अफवेवर विश्वास ठेवू नये. २०२३ मध्ये चांगला पाऊस होणार आहे. शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन हवामान तज्ज्ञ पंजाब डक यांनी केले आहे.

कलियुगाचे सहा शककर्ते, ४ लक्ष २६ हजार ८७६ वर्षे शिल्लक !...कलियुगात सहा शककर्ते आहेत. प्रथम इंद्रप्रस्थात युधिष्ठिर (धर्मराज) झाला. त्याचा शक ३ हजार ४४ वर्षे, दुसरा उज्जयिनीत विक्रम झाला. त्याचा शक १३५ वर्षे, तिसरा पैठण येथे शालिवाहन. त्याचा शक १८ हजार वर्षे. चौथा वैतरिणी नदीच्या काठी विजयाभिनंदन होईल. त्याचा शक १० हजार वर्षे, पाचवा गौड देशात धारातीर्थी नागार्जुन होईल. त्याचा शक ४ लक्ष वर्षे, सहावा कोल्हापूर प्रांतात कल्की होईल. त्याचा शक ८२१ वर्षे. कलियुगातल्या एकूण वर्षातून ५१२४ वर्षे मागे पडली व ४ लक्ष २६ हजार ८७६ वर्षे शिल्लक आहेत.

 

टॅग्स :RainपाऊसOsmanabadउस्मानाबादFarmerशेतकरीagricultureशेती