शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

यंदा पाऊसमान चांगले राहील; पंचांगकर्त्यांसह हवामान तज्ज्ञांचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2023 16:57 IST

शेतकरी हवालदिल न होता सुखात व आनंदात राहतील, असा अंदाज पंचांगकर्त्याने वर्तविला आहे.

- व्ही. एस. कुलकर्णीउदगीर : यंदाच्या शोभन नाम संवत्सरात मेघाचा निवास रजकाचे घरी असल्यामुळे पाऊस पुष्कळ प्रमाणात होऊन धन-धान्यांची समृद्धी होईल. एकंदरित हे वर्ष चांगले असणार आहे. मात्र, सोसाट्याचा वारा सुटून संकटे उद्भवतील. धान्यांची, धनाची नासाडी होऊन घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याचा अंदाज पंचांगकर्ते व हवामान तज्ज्ञाने वर्तविला आहे.

यंदा गूळ, तूप, मध कमी प्रमाणात मिळणार आहे. तसेच मणी, मोती, सोने महाग होणार आहे. जनावरांकडून दूध, दुभते भरपूर मिळणार आहे. धार्मिक कार्यक्रम वाढत जातील. शेतकरी हवालदिल न होता सुखात व आनंदात राहतील, असा अंदाज दाते व अन्य एका पंचांगकर्त्याने वर्तविला आहे. तर अन्य तिसऱ्या एका पंचांगकर्त्याने पावसाचे मान निराशाजनक असून, काही ठिकाणी ओला तर काही ठिकाणी कोरडा दुष्काळाला तोंड द्यावे लागेल. शेती व पिकाविषयीचे अंदाज चुकतील. जीवनावश्यक वस्तूंची टंचाई जाणवेल व रोगराईचे प्रमाण वाढेल, असा अंदाज वर्तविला आहे.

एप्रिलच्या मध्यापासून उष्णतामानात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. मेच्या मध्यभागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मान्सूनच्या पावसाला १५ जूनपासून सुरुवात होईल. ८ जून रोजी मृग नक्षत्रास सुरुवात होणार असली तरी २२ जूननंतर पावसाला सुरुवात होऊन खरिपाच्या पेरण्यांना प्रारंभ होईल. ऑक्टोबरपर्यंत भरपूर पाऊस होणार असल्याचा अंदाज पंचांगकर्त्यांनी वर्तविला आहे.

२०२३ मध्ये चांगला पाऊस होणार : पंजाब डकप्रत्येक भूभागाला एकच समुद्र आहे. मात्र महाराष्ट्राच्या बाजूला अरबी व बंगालच्या खाडीचे असे दोन समुद्र आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात दरवर्षी ७ जूननंतर पाऊस होतोच. इलनिनो व लालीना या समुद्रातील प्रक्रिया आहेत. सध्या समुद्रात इलनिनोची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे दुष्काळ पडतो, अशी अफवा सुरू आहे. शेतकऱ्यांनी या अफवेवर विश्वास ठेवू नये. २०२३ मध्ये चांगला पाऊस होणार आहे. शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन हवामान तज्ज्ञ पंजाब डक यांनी केले आहे.

कलियुगाचे सहा शककर्ते, ४ लक्ष २६ हजार ८७६ वर्षे शिल्लक !...कलियुगात सहा शककर्ते आहेत. प्रथम इंद्रप्रस्थात युधिष्ठिर (धर्मराज) झाला. त्याचा शक ३ हजार ४४ वर्षे, दुसरा उज्जयिनीत विक्रम झाला. त्याचा शक १३५ वर्षे, तिसरा पैठण येथे शालिवाहन. त्याचा शक १८ हजार वर्षे. चौथा वैतरिणी नदीच्या काठी विजयाभिनंदन होईल. त्याचा शक १० हजार वर्षे, पाचवा गौड देशात धारातीर्थी नागार्जुन होईल. त्याचा शक ४ लक्ष वर्षे, सहावा कोल्हापूर प्रांतात कल्की होईल. त्याचा शक ८२१ वर्षे. कलियुगातल्या एकूण वर्षातून ५१२४ वर्षे मागे पडली व ४ लक्ष २६ हजार ८७६ वर्षे शिल्लक आहेत.

 

टॅग्स :RainपाऊसOsmanabadउस्मानाबादFarmerशेतकरीagricultureशेती