शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
4
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
5
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
6
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
7
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
8
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
9
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
10
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
11
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
12
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
13
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
14
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
15
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
16
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
17
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
18
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
19
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
20
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'

सुखद ! २७ वर्षाच्या संघर्षानंतर भूकंपग्रस्तांना मिळणार हक्काची जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 18:26 IST

महामार्गालगत वास्तव्यास असलेल्या २५ ते ३० कुटुंबांना तब्बल २७ वर्ष झगडल्यानंतर हक्काची जागा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठळक मुद्दे घरकुलाच्या लाभातील प्रमुख अडथळा होणार दूरगुरूवारी (ता.१८) हद्द व हद्दीच्या खुणा कायम केल्या जाणार

उस्मानाबाद : १९९३ झाली झालेला प्रलयंकारी भूकंप वडगावकरांनीही पाहिला अन् अनुभवलाही. या संकटात अनेकांच्या डोक्यावरील हक्काचे छत नाहिसे झाले. भूकंपातील बहुतांश बाधितांनी पुन्हा निवारे उभा केले. असे असतानाच दुसरीकडे महामार्गालगत वास्तव्यास असलेल्या २५ ते ३० कुटुंबांना तब्बल २७ वर्ष झगडल्यानंतर हक्काची जागा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भूखंड नावे होताच घरकुल योजनेचा लाभही घेता येणार आहे. 

प्रयलंकारी भूकंपानंतर काहींनी आपल्या शेतामध्ये तर काहींनी आपल्या गावातील इतर खुल्या जागेत आपली नवीन घरे स्थलांतरित करून कुटुंबाला सावरण्याचा प्रयत्न केला. याचवेळी गावातील मागास  समाजातील २५ ते ३० कुटूंबानी गावाजवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या शेजारी असलेल्या गावठाण जमिनीवर अतिक्रमण करून आपली घरे बांधली. भूकंपानंतर बाधितांच्या पुनर्वसनासाठी जागेची उपलब्धता नसल्याने ग्रामपंचायत कार्यालयाने १९९४ मध्ये गावठाण विस्तार वाढ योजनेच्या माध्यमातून भूसंपादनासाठी गावातील गट क्र. ३८१ चा प्रस्ताव तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिला. १९९७ मध्ये हा प्रस्ताव निर्गमित करून शेतीची खरेदी-विक्री बाजार मुल्यानुसार निश्चित करून भूसंपादन कायद्याचे कलम १९८४ प्रमाणे निवाडा जाहीर करण्यात आला. संबंधित शेतकऱ्यास मावेजा देऊन जमिनीची ग्रामपंचायतच्या नावे मालकी हक्कात नोंद करण्यात आली. 

यानंतर ही जमीन मोजून व हद्द कायम करून ग्रामपंचायतीच्या ताब्यात देणे आवश्यक होते. परंतु, तसे झाले नाही. त्यामुळे भूकंपातील बाधितांचे पुनवर्सन होऊ शकले नाही. २७ वर्षाच्या काळात संबंधित कुटुंबांनी थेट मुंबईपर्यंत चकरा मारल्या. परंतु, हाती निराशाच पडली. कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्यांना पक्का निवारा देण्यासाठी शासनाने विविध योजना हाती घेतल्या आहेत. मात्र, संबंधित कुटुंबांना लाभ घेता येत नव्हता. कारण त्यांच्या नावे जागा नव्हती. ही बाब  अंकुश मोरे, पंचायत समिती सदस्य गजेंद्र जाधव, सरपंच अंकिता मोरे यांच्या लक्षात आल्यानंतर  २०१५ पासून पाठपुरावा सुरू करण्यात आला. खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आ. कैलास पाटील यांच्या निदर्शनास हा प्रश्न आणून दिला.

प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन खा. ओमराजे आणि आ. पाठील यांनी भूमी अभिलेखचे उपअधीक्षक, भूमापण अधिकारी यांना पत्र देण्यात आले. याची दाखल घेत ११ जून रोजी हद्द मोजणीची नोटीस निघाली. ५ एकर जमीनीची पाहणी केली. आता  गुरूवारी (ता.१८) हद्द व हद्दीच्या खुणा कायम केल्या जाणार आहेत. यानंतर लागलीच ग्रामपंचायतीकडून जागेची मांडणी (रचना) केली जाणार आहे. दरम्यान, सदरील प्रक्रिया आटोपताच तातडीने पुनर्वसितांच्या नावे प्लॉट करण्यात येणार आहेत. त्यामुळे हक्काची जागा मिळण्यासोबतच हक्काचा निवारा मिळण्याचा मार्गही मोकळा होणार आहे.

जागाधारक घरकुल योजनेसाठीही पात्र ठरतील.२५ ते ३० कुटुंबांना केवळ जागा नावे नसल्याने धोकादायक घरात वास्तव्य करावे लागत होते. पावसाळ्याच्या दिवसांत तर प्रचंड यातना सहन कराव्या लागत होत्या. ही समस्या लक्षात आल्यानंतर खा. ओम राजेनिंबाळकर, आ. कैलास पाटील यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला. तहसील, जिल्हाधिकारी कार्यालयाकडेही पत्रव्यवहार केला. त्यानुसार संबंधित जागेची हद्द व हद्दीच्या खुणा कायम करण्यात आल्या. त्यामुळे सदरील जागा संबंधितांच्या नावे करण्याचा मुख्य अडथळा दूर झाला आहे. यानंतर संबंधित जागाधारक घरकुल योजनेसाठीही पात्र ठरतील.- गजेंद्र जाधव, सदस्य, पंचायत समिती, उस्मानाबाद.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादEarthquakeभूकंपHomeसुंदर गृहनियोजन