शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

...अन्यथा अडीच कोटी मराठा मुंबईत येतील; मनोज जरांगे यांचा सरकारला पुन्हा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 12:56 IST

मराठा आरक्षणाच्या तिसऱ्या पर्वातील आंदोलनाची सुरुवात धाराशिव जिल्ह्यातील वाशी शहरात झालेल्या सभेने करण्यात आली.

वाशी (जि. धाराशिव) : माझे प्राण गेले तरी बेहत्तर; पण, आरक्षणाच्या या लढ्यातून इंचभरही मागे हटणार नाही. सरकारने २४ डिसेंबरपर्यंतची वेळ मागितली आहे. तोपर्यंत सरसकट मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याचे निश्चित झाले पाहिजे. अन्यथा, लागलीच राज्यभरातून अडीच कोटी मराठा मुंबई पाहायला येतील, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी रात्री वाशी येथील सभेतून दिला.

मराठा आरक्षणाच्या तिसऱ्या पर्वातील आंदोलनाची सुरुवात धाराशिव जिल्ह्यातील वाशी शहरात झालेल्या सभेने करण्यात आली. तब्बल साडेआठ तास उशीर झाला तरी या सभेसाठी मोठ्या संख्येने मराठा बांधव हजर राहिले. साडेसात वाजण्याच्या सुमारास सुरू झालेल्या सभेत मनोज जरांगे पाटील म्हणाले, “मागच्या सत्तर वर्षांत मराठा समाजाने विविध पक्षांतील नेत्यांना मतदान करून मोठे केले. मात्र, त्यांनी त्यांच्या घरातील तिसरी पिढी आता राजकारणात आणून परिवार मोठा केला. मराठा समाजासाठी कोणी काहीच नाही केले. पण, आता हक्कासाठी सुरू झालेला लढा थांबणार नाही. आपण आरक्षणाशिवाय इंचभरही मागे हटणार नाही. सरकारने २४ डिसेंबरपर्यंत वेळ मागून घेतला आहे. या तारखेची वाट न पाहता १ डिसेंबरपासून पुन्हा प्रत्येक गावात साखळी उपोषण सुरू करण्याचे आवाहन जरांगे पाटील यांनी यावेळी केले.

उशीर होऊनही गर्दी कायमवाशी येथील सभा सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आयोजित करण्यात आली होती. मात्र, वाशीला येईपर्यंत जागोजागी सत्कार व इतर कार्यक्रमांत अडकून पडावे लागल्याने मनोज जरांगे पाटील यांना वाशीत पोहोचायला सायंकाळचे साडेसात वाजले. साडेआठ तास उशीर झाला तरी मराठा बांधव सभास्थळावरून हलले नाहीत.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलOsmanabadउस्मानाबाद