शहरं
Join us  
Trending Stories
1
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
4
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
5
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
6
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
7
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
8
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
9
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
10
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
11
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
12
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
13
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
15
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
16
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
17
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
18
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
19
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
20
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

...अन्यथा अडीच कोटी मराठा मुंबईत येतील; मनोज जरांगे यांचा सरकारला पुन्हा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 12:56 IST

मराठा आरक्षणाच्या तिसऱ्या पर्वातील आंदोलनाची सुरुवात धाराशिव जिल्ह्यातील वाशी शहरात झालेल्या सभेने करण्यात आली.

वाशी (जि. धाराशिव) : माझे प्राण गेले तरी बेहत्तर; पण, आरक्षणाच्या या लढ्यातून इंचभरही मागे हटणार नाही. सरकारने २४ डिसेंबरपर्यंतची वेळ मागितली आहे. तोपर्यंत सरसकट मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याचे निश्चित झाले पाहिजे. अन्यथा, लागलीच राज्यभरातून अडीच कोटी मराठा मुंबई पाहायला येतील, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी रात्री वाशी येथील सभेतून दिला.

मराठा आरक्षणाच्या तिसऱ्या पर्वातील आंदोलनाची सुरुवात धाराशिव जिल्ह्यातील वाशी शहरात झालेल्या सभेने करण्यात आली. तब्बल साडेआठ तास उशीर झाला तरी या सभेसाठी मोठ्या संख्येने मराठा बांधव हजर राहिले. साडेसात वाजण्याच्या सुमारास सुरू झालेल्या सभेत मनोज जरांगे पाटील म्हणाले, “मागच्या सत्तर वर्षांत मराठा समाजाने विविध पक्षांतील नेत्यांना मतदान करून मोठे केले. मात्र, त्यांनी त्यांच्या घरातील तिसरी पिढी आता राजकारणात आणून परिवार मोठा केला. मराठा समाजासाठी कोणी काहीच नाही केले. पण, आता हक्कासाठी सुरू झालेला लढा थांबणार नाही. आपण आरक्षणाशिवाय इंचभरही मागे हटणार नाही. सरकारने २४ डिसेंबरपर्यंत वेळ मागून घेतला आहे. या तारखेची वाट न पाहता १ डिसेंबरपासून पुन्हा प्रत्येक गावात साखळी उपोषण सुरू करण्याचे आवाहन जरांगे पाटील यांनी यावेळी केले.

उशीर होऊनही गर्दी कायमवाशी येथील सभा सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आयोजित करण्यात आली होती. मात्र, वाशीला येईपर्यंत जागोजागी सत्कार व इतर कार्यक्रमांत अडकून पडावे लागल्याने मनोज जरांगे पाटील यांना वाशीत पोहोचायला सायंकाळचे साडेसात वाजले. साडेआठ तास उशीर झाला तरी मराठा बांधव सभास्थळावरून हलले नाहीत.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलOsmanabadउस्मानाबाद