शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

‘एसटी’च्या उस्मानाबाद विभागाने वर्षभरात जमवला पावणेदोनशे कोटींचा गल्ला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 4:57 PM

तब्बल सहा कोटी किलोमीटर केला प्रवास

उस्मानाबाद : ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीद घेऊन शहरांसोबतच ग्रामीण भागात धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या उस्मानाबाद विभागाअंतर्गत येणाऱ्या सहा आगारांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. वर्षभरात एसटीने ६ कोटी १ लाख किलोमीटर रस्ता कापत सुमारे पावणेदोनशे कोटींचा गल्ला जमवला आहे. गतवर्षीच्या तुलनेत गल्ल्यामध्ये दोन कोटींची जास्तीची भर पडली आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस ही ग्रामीण भागातील दळणवळणाचे प्रमुख साधन आहे. त्यामुळे  मागील काही दशकांच्या तुलनेत खाजगी प्रवासी वाहतुकीचे जाळे विस्तारले असले तरी महामंडळाच्या बसचे महत्व आणि उपायोगिता आजही कायम आहे. महामंडळाच्या उस्मानाबाद विभागाअंतर्गत उस्मानाबाद, तुळजापूर, परंडा, भूम, कळंब आणि उमरगा हे सहा आगार येतात. या सर्वच आगारांकडून मागील दोन-तीन वर्षांपासून प्रवासी वाढविण्यावर अधिकाधिक भर दिला जात आहे. प्रवास भाडे सवलत योजनाही राबविल्या जात आहेत. तसेच वातानुकुलित बससेवाही सुरू केली आहे.

या सर्व उपाययोजनांचा परिणाम म्हणून की काय, दुरावलेले प्रवासी पुन्हा महामंडळाच्या सेवेकडे वळू लागले आहेत. त्यानुसार ‘एसटी’च्या गल्ल्यातही भर पडू लागली आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षात एसटी महामंडळाच्या उस्मानाबाद विभागाअंतर्गत येणाऱ्या सहा आगारांच्या ३९६ बसेसने ५ कोटी ९२ लाख ६१ हजार किलोमीअर रस्ता कापत पावणेदोनशे कोटींचा गल्ला जमवला आहे. दरम्यान, २०१८-१९ या आर्थिक वर्षात उस्मानाबाद विभागाच्या ताफ्यात नव्याने सहा गाड्या दाखल झाल्या. त्यामुळे बसेसची संख्या ४०२ वर जावून ठेपली. या सर्व बसेसने मिळून ६ कोटी १ लाख ५ हजार किलोमीटर प्रवास केला. यातून १६७४ कोटी १६ लाख ५२ हजार रूपये एवढे उत्पन्न मिळाले. २०१७-१८ च्या तुलनेत महामंडळाच्या उस्मानाबाद विभागाच्या गल्ल्यात तब्बल दोन कोटींची जास्तीची भर पडली आहे. एवढे नाही तर बसेसने ८ लाख ४४ हजार किमीचा प्रवासही अधिक केला. उरोक्त आकडेवारी पाहता, कोणाला नसले आले तरी एसटी महामंडळाच्या उस्मानाबाद विभागाला तर ‘अच्छे दिन’ आले, असे म्हटल्याच वावगे ठरणार नाही. 

कोणी किती जमवला गल्ला?उस्मानाबाद विभागातील तुळजापूर आगाराने ३७ कोटी ८६ लाख, उमरगा ३१  कोटी ७ लाख, भूम २४ कोटी १६ लाख, कळंब २९ कोटी ५१ लाख, परंडा ११ कोटी ९४ लाख तर उस्मानाबाद आगाराने २९ कोटी ६२ लाखांचा गल्ल जमवला आहे.  

कोणाचा किती प्रवास?उस्मानाबाद आगाराच्या ८२ बसेसने १ कोटी ३५ लाख, तुळजापूरच्या ८० बसगाड्यांनी  १ कोटी ३२ लाख, उमरग्याच्या ६५ बसेसने १ कोटी २ लाख, भूम ५९ बसगाड्यांनी ८३ लाख, कळंबच्या ७१ बसेसने १ कोटी १ लाख, तर परंडा आगाराच्या ३५ गाड्यांचा मिळून ४१ लाख किलोमीटर प्रवास झाला.

टॅग्स :state transportएसटीMONEYपैसाOsmanabadउस्मानाबाद