शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

उस्मानाबाद जिल्ह्यात शासनाची ५० टक्के मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 14:26 IST

खरीप हंगाम २०१८ मध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले होते. यासाठी शासनाची मदत जमा झाली आहे

ठळक मुद्देमदत देण्याची गती वाढविण्याची गरज  दोन टप्प्यात जिल्ह्यासाठी १३९ कोटी मिळाले ५० गावांतील याद्या प्रलंबित

उस्मानाबाद : खरीप हंगाम २०१८ मध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांच्या हाती उत्पादन खर्चही पडला नव्हता. अशा बाधित शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शासनाने आर्थिक मदत जाहीर केली. दोन टप्प्यात जिल्ह्यासाठी सुमारे १३९ कोटी ९६ लाख रूपये उपलब्ध झाले आहेत. यापैकी ५० ते ५१ टक्के म्हणजेच  ७० ते ७१ कोटी रूपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यात आले आहेत. 

खरीप हंगाम २०१८ मध्ये सुरूवातीला पेरणीयोग्य पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी विलंब न करता पेरणी उरकली होती. ही पिके ऐन फुलोऱ्यात व शेंगा लागण्याच्या अवस्थेत असतानाच पावसाने दडी मारली. त्यामुळे त्यामुळे जोमदार आलेली पिके पाण्याअभावी शेतकऱ्यांच्या हातून गेली. थोडेबहूत उत्पन्न हाती लागले, त्यातून उत्पादन खर्चही हाती पडला नाही. प्रशासनाकडून पीक कापणी प्रयोग आणि पंचनामे केल्यानंतर विदारक वास्तव समोर आले होते. त्यामुळे खरीप उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी जोर धरत होती. दरम्यान, शेतकऱ्यांचे झालेले नकुसान लक्षात घेऊन शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना थोडाबहुत आधार देण्याच्या अनुषंगाने आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार मदत वितरण सुरू झाले आहे.

उस्मानाबाद जिल्ह्याला  सुमारे १६९ कोटी रूपये मंजूर केली आहे. सदरील मदतीसाठी  ४ लाख ६२ हजार ७७४ पात्र आहेत. यापैकी आजघडीला ३ लाख ३१ हजार ६६५ शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. दरम्यान, मंजूर तरतुदीतीपैैकी आजवर दोन टप्प्यात सुमारे १३९ कोटी ९६ लाख ४४ हजार १६० रूपये उपलब्ध झाले आहेत. ही रक्कम तालुकास्तरावर वितरित करण्यात आली असून तेथून शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येऊ लागली आहे. आज अखेर ७१ कोटी ८३ लाख ७४ हजार रूपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. हे प्रमाण उपलब्ध तरतुदीच्या ५० ते ५१ टक्के एवढे आहे. सदरील प्रमाण लक्षात घेता, प्रशासनाने प्रक्रियेला आणखी गती देण्याची गरज शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.

५० गावांतील याद्या प्रलंबितजिल्हाभरातील सुमारे ६४० गावांमध्ये शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. यापैकी ५९० गावांतील शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्यात आले आहेत. परंतु, आजही ५० गावांतील पात्र लाभार्थ्यांच्या याद्या तयार करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे संबंधित गावांतील शेतकऱ्यांतून आता तीव्र प्रतिक्रीया उमटू लागल्या आहेत. प्रशासनाने याद्यांचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीState Governmentराज्य सरकारgovernment schemeसरकारी योजनाfundsनिधी