शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

उस्मानाबाद जिल्ह्यात शासनाची ५० टक्के मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 14:26 IST

खरीप हंगाम २०१८ मध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले होते. यासाठी शासनाची मदत जमा झाली आहे

ठळक मुद्देमदत देण्याची गती वाढविण्याची गरज  दोन टप्प्यात जिल्ह्यासाठी १३९ कोटी मिळाले ५० गावांतील याद्या प्रलंबित

उस्मानाबाद : खरीप हंगाम २०१८ मध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांच्या हाती उत्पादन खर्चही पडला नव्हता. अशा बाधित शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शासनाने आर्थिक मदत जाहीर केली. दोन टप्प्यात जिल्ह्यासाठी सुमारे १३९ कोटी ९६ लाख रूपये उपलब्ध झाले आहेत. यापैकी ५० ते ५१ टक्के म्हणजेच  ७० ते ७१ कोटी रूपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यात आले आहेत. 

खरीप हंगाम २०१८ मध्ये सुरूवातीला पेरणीयोग्य पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी विलंब न करता पेरणी उरकली होती. ही पिके ऐन फुलोऱ्यात व शेंगा लागण्याच्या अवस्थेत असतानाच पावसाने दडी मारली. त्यामुळे त्यामुळे जोमदार आलेली पिके पाण्याअभावी शेतकऱ्यांच्या हातून गेली. थोडेबहूत उत्पन्न हाती लागले, त्यातून उत्पादन खर्चही हाती पडला नाही. प्रशासनाकडून पीक कापणी प्रयोग आणि पंचनामे केल्यानंतर विदारक वास्तव समोर आले होते. त्यामुळे खरीप उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी जोर धरत होती. दरम्यान, शेतकऱ्यांचे झालेले नकुसान लक्षात घेऊन शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना थोडाबहुत आधार देण्याच्या अनुषंगाने आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार मदत वितरण सुरू झाले आहे.

उस्मानाबाद जिल्ह्याला  सुमारे १६९ कोटी रूपये मंजूर केली आहे. सदरील मदतीसाठी  ४ लाख ६२ हजार ७७४ पात्र आहेत. यापैकी आजघडीला ३ लाख ३१ हजार ६६५ शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. दरम्यान, मंजूर तरतुदीतीपैैकी आजवर दोन टप्प्यात सुमारे १३९ कोटी ९६ लाख ४४ हजार १६० रूपये उपलब्ध झाले आहेत. ही रक्कम तालुकास्तरावर वितरित करण्यात आली असून तेथून शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येऊ लागली आहे. आज अखेर ७१ कोटी ८३ लाख ७४ हजार रूपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. हे प्रमाण उपलब्ध तरतुदीच्या ५० ते ५१ टक्के एवढे आहे. सदरील प्रमाण लक्षात घेता, प्रशासनाने प्रक्रियेला आणखी गती देण्याची गरज शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.

५० गावांतील याद्या प्रलंबितजिल्हाभरातील सुमारे ६४० गावांमध्ये शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. यापैकी ५९० गावांतील शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्यात आले आहेत. परंतु, आजही ५० गावांतील पात्र लाभार्थ्यांच्या याद्या तयार करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे संबंधित गावांतील शेतकऱ्यांतून आता तीव्र प्रतिक्रीया उमटू लागल्या आहेत. प्रशासनाने याद्यांचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीState Governmentराज्य सरकारgovernment schemeसरकारी योजनाfundsनिधी