शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

राष्ट्रवादीच्या ‘परिवार संवादात’ आमदार आपलाच हवाचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:23 IST

तुळजापूर : गेली अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीला तुळजापूर विधानसभा ही दिली गेली नाही, त्यामुळे पक्षवाढीसाठी तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचा आमदार हा ...

तुळजापूर : गेली अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीला तुळजापूर विधानसभा ही दिली गेली नाही, त्यामुळे पक्षवाढीसाठी तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचा आमदार हा राष्ट्रवादीचा असला पाहिजे, अशी मागणी पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी तुळजापूर येथे आयोजित राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमात लावून धरली. दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तुळजापूर तालुका, युवक, महिला, युवती व विद्यार्थी आघाडीच्या पदाधिकारी यांच्या पक्षवाढीच्या कामाचा आढावा घेतला.

यावेळी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे, महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, माजी आ. राहुल मोटे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, जीवनराव गोरे, जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती हाेती.

बैठकी दरम्यान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तुळजापूर तालुका महिला, युवती, युवक ओबीसी, सामाजिक न्याय तालुकाध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, विद्यार्थी आघाडी यांच्याकडून किती सदस्य आहेत? किती कार्यकरणी आहेत? त्यांचे कार्य काय आहे? तुळजापूर विधानसभा मतदारसंघात बुथ किती आहे? किती कमिट्या आहेत? आदी बाबींचा आढावा घेतला. यावेळी पदाधिकारी यांनी सांगितलेल्या सदस्यांपैकी आढावा बैठकीत सदस्य कमी असल्याचे आढळून आले. तसेच महिला पदाधिकार्यांचीही संख्या अल्पच हाेती. याबाबत विचारणा केली असता, काेराेनाचे कारण सांगत वेळ मारून नेली. यानंतर कार्यकर्ते, पदाधिकारी यांना बोलण्याची संधी दिल्यानंतर अनेकांनी गटबाजीवर बाेट ठेवले. गटतट असल्याने कार्यकर्त्यांनी जायचे काेणाकडे? असा सवाल केला. तालुक्यात राष्ट्रवादीला मानणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या कमी नाही. परंतु, आमदार आपले नसल्याने अडचणींना ताेंड द्यावे लागत आहे. याप्रसंगी काहींनी २१ टीएमसी पाणी, एमआयडीसी, तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना आदी प्रश्न मांडून याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली.

चाैकट....

अशोक जगदाळे यांच्या भूमिकेसंदर्भात कार्यकर्त्यांनी अपेक्षा घेऊन ते पक्षात आहेत का? असतील तर तसे स्पष्ट करावे. त्यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम केले आहे, असे सांगत कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. यावेळी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी जगदाळे यांची बाजू घेत, एखाद्या व्यक्तीला प्रवेश घ्या असा विषय मांडायच्या अगोदरच तो व्यक्ती म्हणतोय मी पक्षातच आहे. एवढेच नाही तर जगदाळे यांनी न.प.ची निवडणूक जनतेतून लढविली आहे. विधान परिषद निवडणूकही अटीतटीची झालरी. ते केवळ ७४ मतांनी पराभूत झाले. या निवडणुकीत जगदाळे पडले नाहीत तर पक्ष पडला. त्यांच्या बाबतीत जे राजकारण झाले ते झाले. ते पक्षातच आहेत. त्यामुळे हा विषय आता संपला आहे, असे मंत्री मुंडे म्हणाले.