बांधकाम कामगारांचे अनेक प्रश्न रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:37 IST2021-08-25T04:37:46+5:302021-08-25T04:37:46+5:30

उस्मानाबाद : इमारत बांधकाम कामगारांच्या नोंदणी, नूतनीकरणाची प्रकरणे व विविध योजनांचे अर्ज येथील सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात २०१८ पासून ...

Many questions of construction workers lingered | बांधकाम कामगारांचे अनेक प्रश्न रखडले

बांधकाम कामगारांचे अनेक प्रश्न रखडले

उस्मानाबाद : इमारत बांधकाम कामगारांच्या नोंदणी, नूतनीकरणाची प्रकरणे व विविध योजनांचे अर्ज येथील सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात २०१८ पासून प्रलंबित आहेत. ही प्रकरणे तातडीने मार्गी लावावीत, अशी मागणी स्वतंत्र मजूर जनरल बांधकाम कामगार संघटनेने सरकारी कामगार अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, येथील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कार्यालयाकडे जानेवारी २०२१ पासून नोंदणी व नूतनीकरण अर्ज व २०१८ पासून विविध योजनांचे अर्ज प्रलंबित आहेत. या संदर्भात संघटनेमार्फत वारंवार चर्चा व निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. परंतु, संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत असल्यामुळे ती प्रकरणे धूळखात पडली आहेत. विशेष म्हणजे, एक त्रुटी पूर्ण केली की लगेच दुसरी नवीन त्रुटी टाकली जाते. त्यामुळे कामगारांचा वेळ आणि पैसा वाया जातो. तसेच सहाय्यक आवश्यक असलेली कागदपत्रे स्पष्ट असताना सुद्धा अस्पष्ट असा शेरा दिला जातो. ज्या कागदपत्रांची आवश्यकताच नाही अशी कागदपत्रे मागितली जातात.

नोंदणी नूतनीकरणाचे अर्ज निकाली काढताना येथील अधिकाऱ्यांचे एकमत होत नसल्यामुळे कामगारांची कामे खोळंबली असल्याचा आरोप निवेदनात केला आहे.

सुरक्षा संच व अत्यावश्यक संच आणि आरोग्य तपासणी होऊन एक वर्ष होऊनही कामगारांना अद्यापपर्यंत संच देखील वाटप करण्यात आलेले नाहीत. कामगारांचे प्रश्न येत्या १५ दिवसांमध्ये न सोडविल्यास या कार्यालयासमोर संघटनेच्यावतीने हलगीनाद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद भालेराव, दादा गवळी, एजाज सय्यद व परमेश्वर वाघमारे यांच्या सह्या आहेत.

Web Title: Many questions of construction workers lingered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.