शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

येऊ द्या ना ईडीला; हात बरबटलेले नसतील तर भिती कशाची ? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 7:12 PM

ईडीच्या कारवाया यांच्यापेक्षा जास्त आमच्यावर झाल्या आहेत.

ठळक मुद्दे केंद्रावरील आरोप नैराश्येतूनमग येऊ द्या सीडीही बाहेर

उस्मानाबाद : जर तुमचे हात बरबटलेले नसतील तर भिती कशाची? येऊ द्या ना ईडीला. ते काय कोणाच्याही घरी येऊ शकतात. आजच्या कारवाईमुळे केंद्रावर जे आरोप करीत सुटले आहेत, ते नैराश्येतून केले जात आहेत, असा टोला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उस्मानाबादेतून महाविकास आघाडीच्या नेत्यांना मंगळवारी लगावला.

पदवीधर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ दानवे मंगळवारी उस्मानाबादेत आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ईडीच्या कारवाया यांच्यापेक्षा जास्त आमच्यावर झाल्या आहेत. आम्ही यातून गेलो आहोत. पण काहीच सिद्ध झाले नाही. तो एक स्वतंत्र विभाग आहे. त्यांचे काम ते करीत आहेत. अतिवृष्टीची केंद्राकडून मदत मिळवण्याची एक प्रक्रिया आहे. राज्यांनी ती पूर्ण करायची असते. ती केली असेल तर केंद्र लगेचच महाराष्ट्राला मदत देईल, असे सांगत अप्रत्यक्षरित्या राज्यानेच दिरंगाई चालविल्याचे दानवे यांनी सूचित केले. 

दरम्यान, काँग्रस-राष्ट्रवादीचे नेते ओबीसी समाजात मराठा आरक्षणावरुन अपप्रचार पसरवत असल्याची टीकाही त्यांनी केली. फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कोणाच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही, याची तरतूद कायद्यात केलेली आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का बसण्याचा विषयच नाही. स्वत:ची इमेज तयार करण्यासाठी हा खटाटोप सुरु असल्याचेही दानवे म्हणाले. या सरकारने मराठवाडा वाटर ग्रीड, जलयुक्त शिवार योजना बंद केली. पोखरा योजना बंद केली. केवळ निधी बंद करण्याचे काम सरकार करीत आहे. त्यामुळे निर्माण झालेला रोष मतदार मतपेटीतून व्यक्त करीत महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून देतील, अशी आशाही दानवे यांनी व्यक्त केली. यावेळी माजी मंत्री आ.संभाजीराव पाटील, आ.राणाजगजितसिंह पाटील, माजी आ. गोविंद केंद्रे, जिल्हाध्यक्ष नितीन काळे, ॲड.मिलिंद पाटील, दत्ता कुलकर्णी, ॲड.खंडेराव चौरे, ॲड.व्यंकटराव गुंड, सुधीर पाटील, ॲड.नितीन भोसले उपस्थित होते.

सीडीही येऊ द्या...नुकतेच राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे यांनी ईडी बाहेर काढल्यास आपणही सीडी बाहेर काढू, असा इशारा प्रवेशावेळी दिला होता. त्यांचा नामोल्लेख न करता दानवे म्हणाले, आपले मन स्वच्छ आहे. आपण काही केलेच नसल्यास कशाला कोणाची भिती, मग येऊ द्या सीडीही बाहेर, असे सांगत त्यांनी खडसेंवर पलटवार केला.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेOsmanabadउस्मानाबादShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा