शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंडिया आघाडी' तुटणार? बिहारमधील पराभवानंतर, काँग्रेसवर एकट्याने निवडणूक लढण्याचा वाढला दबाव
2
सावधान! मोटरोलाचा स्मार्टफोन जिन्सच्या खिशातच फुटला; तरुणाचा प्रायव्हेट पार्ट थोडक्यात वाचला...
3
'माझ्या प्रियकराला भैय्या म्हणायचीस, आता बाबू बोलतेस'; दोन तरुणींचा रस्त्यातच राडा, केस ओढून मारहाण; व्हिडीओ व्हायरल
4
Viral Video : चालत्या रिक्षेतून उडी मारली अन् थेट रील करू लागला, व्हिडीओ येताच तुफान व्हायरल झाला! 
5
कुठे तोडफोड, कुठे राडा; उमेदवारीवरून राज्यभरात दिसला 'हायव्होल्टेज ड्रामा'! इच्छुकांचे नेत्यांपुढे रडगाणे...
6
पाकिस्तानात मोठी खळबळ! लष्कर मुख्यालयात लष्करप्रमुखांच्या मुलीचा निकाह; फोटो का आले नाहीत समोर?
7
२०२६च्या पहिल्याच दिवशी प्रदोष, ‘असे’ करा व्रतपूजन; शिव मंत्र ठरेल रामबाण, वर्षभर मिळेल लाभ!
8
नवीन वर्ष २०२६ मध्ये PM Kisan योजनेचा २२ वा हप्ता कधी जारी होईल? कोणाला मिळणार नाहीत पैसे, जाणून घ्या
9
६ राशींचे धनलाभाने २०२६ नववर्ष सुरू, यश-प्रगती; समृद्धी-भरभराट, तुमच्या राशीवर कसा प्रभाव?
10
२००३ मध्ये भारताच्या हातातला वर्ल्डकप हिसकावणारा फलंदाज कोमामध्ये; ऑस्ट्रेलियाचा स्फोटक दिग्गज मृत्यूशी देतोय झुंज
11
भारत-पाक संघर्षात चीनची उडी! "आम्हीच केली मध्यस्थी"; ट्रम्प यांच्यानंतर आता 'ड्रॅगन'चा नवा दावा
12
टार्गेट पूर्ण...! केंद्र सरकारने 'या' इलेक्ट्रिक वाहनांवरील सबसिडी बंद केली; टू-व्हीलर, कारही रांगेत...
13
Union Bank of India मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,२३९ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
14
निवडणुकीला समोरे जाण्यापूर्वी योगी आदित्यनाथ अखेरचा डाव टाकणार; संक्रांतीनंतर अनेक मंत्र्यांना डच्चू देणार, मंत्रिमंडळाचा विस्तार करणार...
15
गुड न्यूज! रेल्वे तिकिटावर ३ टक्के सवलत; प्रवाशांना आर्थिक दिलासा
16
भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था; जपानला टाकले मागे; केंद्र सरकारची अधिकृत घोषणा
17
सैन्य भरतीची तयारी करत होता, पण प्रेमाच्या जाळ्यात अडकला; प्रेयसीच्या एका फोन कॉलने घात केला!
18
नाराज निष्ठावंतांचा उद्रेक, थेट नेत्यांनाच शिव्यांची लाखोली! वर्षानुवर्षे पक्षनिष्ठा जपणारे, सतरंज्या उचलणारे भाजप कार्यकर्ते भडकले
19
नातेवाईकच उदंड झाले कार्यकर्ते वाऱ्यावर उडाले, ३० नेत्यांसह ११६ नातेवाईक निवडणूक रिंगणात
20
आजचे राशीभविष्य ३१ डिसेंबर २०२५ : सरत्या वर्षाचा शेवट कोणासाठी गोड होणार? कसा असेल आजचा दिवस...
Daily Top 2Weekly Top 5

धाराशिव जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्गाची जमीन मोजणी तूर्त थंडबस्त्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 16:52 IST

राजू शेट्टींसह शेतकऱ्यांच्या आक्रमकते पुढे जिल्हा प्रशासनाची मवाळ भूमिका

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील वाणेवाडी शिवारात बुधवारी (दि. २५) शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीस विरोध केला. यावेळी पोलिसांसोबत झटापट झाली. या प्रकरणानंतर लागलीच गुरुवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी संबंधित शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यालयात अधिकाऱ्यांसमोर शेट्टी यांनी शक्तिपीठबाबत आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने मवाळ भूमिका घेत महामार्गाची मोजणी तूर्त थांबवल्याचे स्पष्ट केले.

धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तीर्थक्षेत्राला जोडणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली, असून जमीन मोजणीचे काम हाती घेण्यात आले आहे. मंगळवारी पथक पाहणीसाठी गेले होते, शेतकऱ्यांनी परतवून लावले होते. बुधवारी उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्यासह एक पथक वाणेवाडी शिवारात मोजणीसाठी गेले. तेव्हा शेतकरी व पोलिसांत झटापट झाली. यानंतर पथक मोजणीविना माघारी फिरले. दरम्यान, गुरुवारी सकाळी राजू शेट्टी यांनी संबंधित शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यांची कैफियत ऐकून घेतल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा वळवला. बैठकीमुळे जिल्हाधिकाऱ्यांची भेट झाली नसल्याने अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्यासमवेत शेट्टी यांनी चर्चा केली. शेतकऱ्यांच्या व्यथा सांगून जमीन मोजणी रद्द करण्याची मागणी केली. यावर ज्योती पाटील यांनी तूर्त मोजणी प्रक्रिया थांबवली असल्याचे स्पष्ट केले.

समुद्रात महामार्ग बांधा : राजू शेट्टीशेतकऱ्यांनी मेहनतीने जमिनी कसून त्या बागायती केल्या. चांगल्या जमिनी महामार्गात जाणार असून यामुळे शेतकरी देशोधडीला लागतील. दर जाहीर न करता केवळ अफवा पसरवल्या जात आहेत. तुम्हाला महामार्ग करायचाच असेल, तर तिकडे समुद्रात बांधा, असा सल्ला शेट्टी यांनी सरकारला दिला.

लोणीकर चावडीवर या, हिशेब सांगतोआ. बबनराव लोणीकर यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त करताना शेट्टी म्हणाले, यांना सत्तेचा माज चढला आहे. शेतकऱ्यांना दिलेले ६ हजार तुम्ही काढणार असाल, तर मी हिशेब घेऊन चावडीवर येतो. या चर्चा करूया. केंद्र सरकारच्या धोरणामुळे सोयाबीन दर कमी होऊन शेतकऱ्यांना एका वर्षात ३५ ते ४० हजार कोटींचा फटका बसला. ४०० रुपयांचे डीएपी खत २ हजाराला केले. सगळाच हिशेब सांगतो, तुम्ही याच, असे शेट्टी म्हणाले.

टॅग्स :dharashivधाराशिवShaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गRaju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरी