शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

कुर्डूवाडी-लातूर रेल्वेगाडी ११० किमी वेगाने धावणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 4:53 PM

ज्यामुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होण्यास मदत होईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे (मुंबई) महाप्रबंधक डी. के. शर्मा यांनी दिली. 

ठळक मुद्देमहाप्रबंधक शर्मा यांची माहिती उस्मानाबाद स्थानकाची केली तपासणी

उस्मानाबाद : तासी ९० किमी वेगाने धावणारी कुर्डूवाडी-लातूर ही रेल्वेगाडी डिसेंबरमध्ये तासी ११० किमी वेगाने धावेल. ज्यामुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होण्यास मदत होईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे (मुंबई) महाप्रबंधक डी. के. शर्मा यांनी दिली. 

रेल्वेचे महाप्रबंधक शर्मा यांनी शुक्रवारी उस्मानाबाद रेल्वेस्थानकाची तपासणी केली. विशेष रेल्वेतून सर्व विभाग प्रमुखांच्या ताफ्यासह ते दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास उस्मानाबाद स्थानकात दाखल झाले. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांसह प्लॅटफार्म, पाण्याची सुविधा, स्वच्छता, प्रवाश्यांच्या विश्रांती कक्षात जावून सोयीसुविधांची पाहणी केली. त्यानंतर स्थानक परिसरालाही भेट दिली. स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिमेला असलेल्या खुल्या भूखंडावर वृक्षारोपण करण्याची सूचना त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना केली. यानंतर शर्मा यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.

कुर्डूवाडी-उस्मानाद-लातूर या मार्गावर गाड्या वाढविण्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला असता, दीड वर्षात विद्युतीकरणाचे काम पूर्ण होईल. त्यानंतर आपण आवश्यक तेवढ्या गाड्यांची संख्या वाढू शकतो. कुर्डूवाडी-लातूर या रेल्वेगाडीचा वेगही वाढविण्यात येणार आहे. सध्या ही रेल्वेगाडी तासी ९० किमी वेगाने धावते आहे. डिसेंबरमध्ये ही रेल्वेगाडी तासी ११० किमी वेगाने धावेल, अशी माहिती त्यांनी दिली. यामुळे प्रवाशांचा प्रवास पूर्वीच्या तुलनेत अधिक वेगावान होऊन वेळेचीही बचत होण्यास मदत होणार आहे. याप्रसंगी रेल्वे उपभोक्ता समितीचे सदस्य संजय मंत्री यांच्यासह प्रवाश्यांनीही महाप्रबंधक शर्मा यांच्यापुढे काही गरजा मांडल्या. त्यास त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

रेल्वेस्थानक चकाचक...सोलापूर विभागाचे रेल्वे प्रबंधक हितेंद्र मल्होत्रा यांनी २५ आॅक्टोबर रोजी स्थानकाला भेट देऊन पाहणी केली होती. यावेळी त्यांनी स्वच्छतेसह विविध असुविधांवरून अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली होती. शुक्रवारी महाप्रबंधक शर्मा रेल्वेस्थानकाच्या तपासणीसाठी आले असता, स्थानक चकाचक केले होते. पाणी, स्वच्छता, पार्र्किं ग आदी बाबींची दक्षता घेतल्याचे पहावयास मिळाले.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादrailwayरेल्वेpassengerप्रवासी