गळ्यातील चेन मोडायची वेळ आली, कसले ब्रेक द चेन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:31 AM2021-04-11T04:31:54+5:302021-04-11T04:31:54+5:30

उस्मानाबाद : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शासनाने ब्रेक द चेन अभियान सुरू केले आहे. या अभियानाअंतर्गत अत्यावश्यक सेवा वगळता ...

It's time to break the chain around your neck, break the chain | गळ्यातील चेन मोडायची वेळ आली, कसले ब्रेक द चेन

गळ्यातील चेन मोडायची वेळ आली, कसले ब्रेक द चेन

googlenewsNext

उस्मानाबाद : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शासनाने ब्रेक द चेन अभियान सुरू केले आहे. या अभियानाअंतर्गत अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. दुकाने बंद असल्याने व्यावसायिकांचे कुटुंबे आर्थिक अडचणीत सापडले आहेत. बँकेचे कर्ज, दुकान भाडे भरण्यासाठी गळ्यातील चेन मोडायची वेळ आली, कसले ब्रेक द चेन अशा संतप्त प्रतिक्रिया व्यावसायिक व त्यांच्या कुटुंबीयातून व्यक्त केल्या जात आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. कोरोनास अटकाव बसावा, याकरिता प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. दर रविवारी जनता कर्फ्यू तसेच रात्री सात वाजल्यानंतर संचारबंदी लागू करण्यात आली होती. राज्य शासनाने राज्य शासनाने ब्रेक द चेन अभियान राबविले असून, या अभियानाअंतर्गत अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे लहान व मध्यम व्यावसायिकांची आर्थिक कोंडीत सापडले आहेत. दुकाने बंद असतानाही दुकानाचे भाडे, बँकाचे कर्ज, लाईट बिल, फायनान्सचे हप्ते भरावे लागणार आहेत. त्यामुळे व्यावसायिक व त्यांच्या कुटुंबातून ब्रेक द चेन अभियानास तीव्र विरोध होत आहे.

पाच महिने सुरू राहिला व्यवसाय कर्ज कसे फेडायचे

गतवर्षी २३ मार्चपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. या कालावधीत तब्बल चार ते पाच महिने दुकाने बंद होती. त्यानंतर खबरदारी घेत दुकाने सुरू करण्यास प्रशासनाने मुभा दिली. मात्र, कोरोनाच्या धास्तीमुळे म्हणावा तसा व्यवसाय होत नव्हता. दसरा, दिवाळी सणापासून मार्केट पूर्वपदावर येऊ लागले. पाच महिने व्यवसाय सुरळीत चालू होता. आता पुन्हा दुकाने बंद करावी लागली आहेत. त्यामुळे आता व्यवसाय कर्ज कसे फेडायचे असा प्रश्न व्यावसायिकांपुढे आहे.

प्रतिक्रिया...

गेल्या वर्षी दाेन महिने दुकान बंद होते. त्यामुळे पाच महिन्याचे दुकानाचे भाडे घरूनच भरावे लागले. आता पुन्हा दुकान बंद झाले आहे. व्यवसाय बंद असल्याने कर्ज काढण्याची वेळ आली आहे.

मनीषा क्षीरसागर,

कोरोना विषाणू रोखण्यासाठी सर्व दुकाने बंद करणे, लॉकडाऊन करणे हा पर्याय नाही. शासनाने ब्रेक द चेन मोहिमेअंतर्गत आणखी कठोर निर्बंध करावेत, दुकानाची वेळ कमी करावी, परंतु, ब्रेक द चेन म्हणत लॉकडाऊन लावू नये.

अश्विनी गोरे

पहिल्या टप्प्यात दुकाने पाच ते सहा महिने सुरू राहिली. यानंतर पुन्हा एकदा शासनाने कठोर निर्बंध लागू केले. आमची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली आहे. देणी भागवायची कशी, हा प्रश्न आता भेडसावू लागला आहे.

निकिता कांबळे,

पॉईंटर

जिल्ह्यात २४० दिवस राहिली दुकाने सुरू

Web Title: It's time to break the chain around your neck, break the chain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.