शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

अफवांतून घडणाऱ्या हिंसाचारास सरकारच जबाबदार; प्रकाश आंबेडकर यांचा आरोप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2018 12:01 PM

गेल्या चार वर्षांत ज्या दंगली, घटना घडल्या, त्यातील क्रुरता यापूर्वी कधीही पाहिली नव्हती़ त्यामुळेच माणसातील सैतान जागे करण्यास आणि अशा हिंसाचारास सरकारच जबाबदार असल्याचा घणाघात अ‍ॅड़प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी उस्मानाबाद येथे केला़

ठळक मुद्देवंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जिल्ह्यातील आदिवासी, ओबीसी, मुस्लिम समाजाशी मंगळवारी अ‍ॅड. आंबेडकर यांनी संवाद साधला़

उस्मानाबाद : अफवांमुळे राज्यभर घडत असलेल्या हिंसाचाराच्या घटना माणसातील माणूसपण संपत चालल्याची प्रतिके आहेत़ गेल्या चार वर्षांत ज्या दंगली, घटना घडल्या, त्यातील क्रुरता यापूर्वी कधीही पाहिली नव्हती़ त्यामुळेच माणसातील सैतान जागे करण्यास आणि अशा हिंसाचारास सरकारच जबाबदार असल्याचा घणाघात अ‍ॅड़प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी उस्मानाबाद येथे केला़

वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जिल्ह्यातील आदिवासी, ओबीसी, मुस्लिम समाजाशी मंगळवारी अ‍ॅड़आंबेडकर यांनी संवाद साधला़ यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सरकारवर त्यांनी हल्ला चढविला़ ते म्हणाले, भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुस्लिमविरोधी राजकारण करीत आहेत़ मुस्लिम समाजाविनाही सत्ता आणू शकतो, हे रुजविण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून देशात चालला आहे़ व्यापारी, मुस्लिम समाज, राजकीय विरोधक यांच्यात वेगवेगळ्या माध्यमातून दहशत निर्माण करणे व राज्य करणे, हा केंद्र व राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय असल्याचा दावाही त्यांनी केला़

आपण वंचितांची मूठ बांधत असताना मला इतरांना का जागे करताय? तुम्ही दलितांचेच राजकारण बघा, असा सल्ला मिळू लागला आहे़ मात्र, मी कोणाच्याही दबावाला बळी पडणारा नाही, असेही आंबेडकर म्हणाले़ बड्या उद्योजकांवर सरकारची चांगलीच मेहेरनजर आहे. अनिल अंबानींच्या अस्तित्वात नसलेल्या कंपनीस १०० लढाऊ विमानांचे कंत्राट कोणत्या आधारावर दिले? हे ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’ म्हणणाऱ्यांनी जाहीर करावे, असे आव्हानही त्यांनी दिले़ 

पक्षनिधीची चौकशी व्हावी भाजपच्या पक्ष निधीत अचानक ५०० कोटी रुपये वाढतात़ ते कोणत्या उद्योजकाने दिले, याचा खुलासा व्हावा़ जेणेकरुन त्या उद्योजकाला सरकारने याबदल्यात काय दिले, हेही समोर येईल़ निवडणूक आयोगाने पक्षनिधीची चौकशी करुन ‘दूध का दूध़़’ करावे, अशी मागणी  आंबेडकर यांनी केली़

अदानीच्या तुरीसाठी शेतकरी सुळावऱ देशातील बडे उद्योजक अदानींनी आंतरराष्ट्रीय बाजारातून मोठ्या प्रमाणात तूर, खरेदी केली होती़ ही तूर देशांतर्गत बाजारपेठेत विक्री व्हायची असल्यानेच सरकार शेतकऱ्यांची तूर खरेदी करीत नसल्याचा आरोप अ‍ॅड. आंबेडकर यांनी केला.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरGovernmentसरकारPoliticsराजकारण