शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
4
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
5
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
6
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
8
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
9
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
10
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
11
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
12
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
13
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
14
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
15
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
16
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
17
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
18
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
19
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
20
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती

मुलगी पाहायला गेले अन् लग्नच उरकून आले, विशाखाला भावला शेतकरी महेश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2018 8:02 PM

मुलगी पाहायला गेले अन् चक्क 3 तासात लग्नच उरकून आल्याची घटना उस्मानाबाद जिल्ह्याच्या वाशी तालुक्यातील बावी येथे घडली.

उस्मानाबाद - साखरपुडा करायला गेले अन् लग्नच उरकून आले, अशी बातमी आपण वाचली आहे. मात्र, मुलगी पाहायला गेले अन् चक्क 3 तासात लग्नच उरकून आल्याची घटना उस्मानाबाद जिल्ह्याच्या वाशी तालुक्यातील बावी येथे घडली. महेश केशव गायकवाड असे शेतकरी कुटुंबातील नवरदेवाचे नाव आहे. तर विशाखा संभाजी शिंदे असे वधु मुलीचे नाव आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे लग्नाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देण्याच्या या उपक्रमाचे गावपातळीवर कौतूक होत आहे.

सोलापूरच्या पाथरी येथील महेश केशव गायकवाड हे आपल्या नातेवाईकांसह मुलगी पाहण्यासाठी वाशी तालुक्यातील गोलेगाव येथे गेले होते. साधारण दुपारी दोन वाजता मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला. मुला-मुलीची पसंती झाल्यानंतर सुपारी फोडण्याच्या कार्यक्रमाची चर्चा सुरु होती. मात्र, मुलाचे भाऊजी बालाजी चौधरी आणि राजाभाऊ बाराते यांनी पुढाकार घेत दुष्काळी परिस्थितीचा दाखला घेत लगेच लग्न करण्याचा विचार मांडला. त्यास, मुलाचे वडिलबंधू रमेश गायकवाड, न्या. दिनेश गायकवाड आणि अमोल गायकवाड यांनी सहमती देताच लग्न करण्याचं ठरलं. त्यानंतर, दिवाळीच्या पाडव्यादिवशीच गुरुवारी सायंकाळी लग्नासोहळा पार पडला.

बी कॉम पदवीधर शिक्षण घेतलेल्या विशाखानेही व्यवसायाने शेतकरी असलेल्या महेशसोबत संसार करण्याचा होकारार्थी निर्णय एका क्षणात कळवला. त्यानंतर, लग्नातील अनावश्यक खर्चाला फाटा देत मुलगी अन् नारळ या परंपरेनुसार लग्न सोहळा आनंदी व उत्साही वातावरणात पडला. या लग्नसोहळ्याला दोन्ही कुटुंबातील मोजकीच वऱ्हाडी मंडळी हजर होती. 

शेतकरी मुलाला पसंती शेतकरी कुटुंबातील महेश हा पदवीधर असून वडिलोपार्जित शेतीचा व्यवसाय करतो. विशेष म्हणजे महेशच्या कुटुंबातील दोन्ही वडिलबंधू उच्च शिक्षित असून रमेश गायकवाड हे प्राध्यापक आहेत. तर दिनेश गायकवाड हे न्यायमूर्ती आहेत. तरीही, कुठलाही बडेजाव न करता, किंवा मोठेपणाचा कुठलाही आव न आणता साधारणपणे लग्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. पदवीधर असलेल्या विशाखानेही तात्काळ लग्नाला होकार देत शेतकरी महेशला आपला आयुष्यभराचा साथीदार निवडले. इंजिनिअरच मुलगा हवा असा अट्टाहस करणाऱ्या मुलींपुढे पदवीधर विशाखाने एक आदर्श घालून दिला आहे.  

दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्यमुलीकडील सर्वसाधारण परिस्थितीचा अंदाज घेत गायकवाड कुटुंबीयांनी लग्नातील खर्चाला फाटा देण्याचे ठरवलं. तसेच, ना घोडा, ना बँड, ना नेते ना प्रतिष्ठित व्यक्तींची रांग, केवळ हजर असलेल्या पाहुणे मंडळींच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला. सध्या राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे लग्नासाठी अनावश्यक खर्च करुन दोन्ही कुटुंबीयांना आर्थिक भार सोसावा लागू नये, यासाठी हा निर्णय एकमताने घेतला. विशेष म्हणजे यास नवरा आणि नवरीने पसंती दिल्यानेच हे शक्य झाल्याचे, गायकवाड कुटुबीयांनी म्हटले. 

टॅग्स :marriageलग्नOsmanabadउस्मानाबादFarmerशेतकरी