शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

२९ जूनला मोर्चा; ‘जागरण-गोंधळा’ची तयारी पूर्ण, मराठा समाज आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 6:42 AM

तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने होऊ घातलेल्या २९ जूनच्या जागरण-गोंधळ आंदोलनाची तयारी पूर्ण झाली आहे़

तुळजापूर : तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने होऊ घातलेल्या २९ जूनच्या जागरण-गोंधळ आंदोलनाची तयारी पूर्ण झाली आहे़ महाराष्ट्रातील मराठा समाज बांधव यात मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती समन्वयक आण्णासाहेब पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली़मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आतापर्यंत राज्यभरात ५८ मूक मोर्चे झाले़ मुंबईच्या मोर्चानंतर एक महिन्यात मागण्या मान्य करण्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले होते़ यावेळी काही घोषणा सरकारने केल्या होत्या़ मात्र, या घोषणांवरही अंमलबजावणी केली नाही़ मुख्यमंत्र्यांनी इतर मंत्र्यांच्या खांद्यावर बंदुका ठेवून समाजाचा विश्वासघात केला आहे़ आता हे सरकार मराठा समाजाला न्याय देऊ शकत नाही, हे स्पष्ट झाल्याचा आरोप पाटील यांनी यावेळी केला़ यामुळेच आता मुक नाही तर ठोक मोर्चे काढले जातील, ही भूमिका घेऊन आंदोलनाचे दुसरे पर्व सुरु करीत आहोत़ यात छञपती शिवाजी महाराज यांच्या नितीप्रमाणे गनिमी कावा पध्दतीने आंदोलने करण्यात येणार आहेत़ यापुढे सरकारला कुठलेही निवेदन दिले जाणार नाही, ना चर्चा करु, असेही आण्णासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले़ यावेळी महेश सावंत, जिवनराजे इंगळे, सुनिल नागणे, अर्जून सांळुके, बबन सुद्रिके उपस्थित होतेमोर्चासाठी समित्या स्थापऩतुळजापुरातील जागरण-गोंधळ आंदोलनाचे संयोजक तुळजापूर-उस्मानाबाद आहेत़ मोर्चा यशस्वीतेसाठी आठ समित्या गठीत करण्यात आल्या आहेत़ या आंदोलनाचे नियोजनही पुर्वीच्या मोर्चा प्रमाणेच राहणार असून, स्वछता, शांततेला महत्त्वाचे स्थान राहणार असल्याची माहितीही पत्रकार परिषदेत देण्यात आली़

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा