शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

१६ लाख नागरिकांची अन्न सुरक्षा वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:33 IST

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील १६ लाख नागरिकांसाठी तीन अन्न सुरक्षा अधिकारी व एक औषध निरीक्षक कार्यरत आहे. किराणा दुकान, ...

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील १६ लाख नागरिकांसाठी तीन अन्न सुरक्षा अधिकारी व एक औषध निरीक्षक कार्यरत आहे. किराणा दुकान, मेडीकल, हॉटेल्स, खानावळीची तपासणी करण्याची जबाबदारी यांच्यावर आहे. मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत अन्न व औषध प्रशासन विभागातील मनुष्यबळ अपुरे असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे.

अन्न व औषध प्रशासन या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्राव्ये विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राहकांच्या हिताचे संरक्षण केले जात असते. नागरिकांना उत्तम प्रतीची औषधे, सौंदर्य प्रसाधने आणि सुरक्षित व आरोग्यदायी अन्न पदार्थ उपलब्ध करून देणे, त्याचबरोबर माफक दरात औषधे उपलब्ध करून देणे, आदी कामे अन्न व औषध प्रशासन विभागांतर्गत येतात. उस्मानाबाद जिल्ह्याची लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. वाढत्या नागरिकांची गरज भागविण्यासाठी येथे हॉटेल्स, मेडिकल, किराणा दुकान उभी राहिली आहेत. त्यामुळे अशा आस्थापनांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारीही अन्न व औषध प्रशासन विभागाची आहे. सध्या औषध विभागात दोन औषध निरीक्षक पदे मंजूर असून, एक जागा रिक्त आहे. त्यामुळे एकाच औषध निरीक्षकावर परवाने मंजूर करणे, औषध तपासणी, तक्रारीची चौकशी, खटल्याचा पाठपुरावा करणे, कार्ट कचेऱ्याच्या तारखा करणे आदी कामे करावे लागत आहेत. मागील तीन अन्न विभागात तीन अन्न निरीक्षकाचे पदे मंजूर असून, या जागा भरल्या आहेत. जिल्ह्यात एक हजार २७६ परवानाधारक आस्थापना व १५ हजार १६ आस्थापना नोंदणीकृत आहेत. यात ३७६ परवानाधारक व २ हजार २०० नोंदणीकृत हॉटेल्सची संख्या आहे. आस्थापनांच्या तुलनेत कर्मचाऱ्यांची संख्या तोकडी असल्याने हा डोलारा सांभाळताना कर्मचाऱ्यांची मोठी दमछाक होते. असे असतानाही कार्यरत अधिकारी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत आहेत.

चौकट...

मेडिकल्सची तपासणीच होत नाही

जिल्ह्यात सुमारे १२५ होलसेल व ७५०रिटेलर मेडिकल्स आहेत. या मेडिकलची प्रत्येक वर्षी तपासणी करणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. मात्र, अन्न व औषध प्रशासन विभागाकडे केवळ एकच औषध निरीक्षक असल्याने जिल्ह्यातील संपूर्ण मेडिकलची तपासणी पूर्ण होत नाही.

हॉटेलचीही तपासणी नाही

जिल्ह्यात ३७३ परवानाधारक व २ हजार २०० नोंदणीकृत हॉटेल्स आहेत. या हॉटेल्सच्या तपासणीसाठी तीन अन्न सुरक्षा अधिकारी कार्यरत आहेत. अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांनाच किराणा दुकान, खानावळीसह इतर आस्थापना तपासणी करावी लागत असते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांकडूनही वर्षभरात पूर्ण हॉटेल्सची तपासणी केली जात नाही.

कोर्ट, कचेऱ्या करण्यातच खर्ची होतो अधिक वेळ तपासणीदरम्यान अनियमितता आढळल्यास दंडात्मक, प्रसंगी संबंधित प्रतिष्ठानावर निलंबनाची कारवाई केली जाते. प्रकरण न्यायालयाकडे वर्ग केले जाते. यात अधिकाऱ्यांना न्यायालयात हजर व्हावे, लागत असल्याने, त्यांचे बरेच दिवस या कामकाजात जातात. यामुळे इतर कामांवर परिणाम होतो.

पाॅईंटर...

१६६०३११

जिल्ह्याची लोकसंख्या

९७५

जिल्ह्यातील मेडिकल्स

औषध निरीक्षक

२५००

जिल्ह्यातील हॉटेल्स

कोट...

जिल्ह्यातील हॉटेल्स, किराणा दुकाने, भोजनालये, रेस्टॉरंट याची तपासणी केली जात आहे. ३ अन्न सुरक्षा अधिकारी कार्यरत असून, प्रत्येक अधिकाऱ्यास महिन्याला दहा आस्थापना तपासणी व ८ नमुने घेण्याचे उद्दिष्ट दिले आहे.

एस. बी. कोडगिरे, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन