शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

१६ लाख नागरिकांची अन्न सुरक्षा वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:33 IST

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील १६ लाख नागरिकांसाठी तीन अन्न सुरक्षा अधिकारी व एक औषध निरीक्षक कार्यरत आहे. किराणा दुकान, ...

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील १६ लाख नागरिकांसाठी तीन अन्न सुरक्षा अधिकारी व एक औषध निरीक्षक कार्यरत आहे. किराणा दुकान, मेडीकल, हॉटेल्स, खानावळीची तपासणी करण्याची जबाबदारी यांच्यावर आहे. मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत अन्न व औषध प्रशासन विभागातील मनुष्यबळ अपुरे असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे.

अन्न व औषध प्रशासन या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्राव्ये विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राहकांच्या हिताचे संरक्षण केले जात असते. नागरिकांना उत्तम प्रतीची औषधे, सौंदर्य प्रसाधने आणि सुरक्षित व आरोग्यदायी अन्न पदार्थ उपलब्ध करून देणे, त्याचबरोबर माफक दरात औषधे उपलब्ध करून देणे, आदी कामे अन्न व औषध प्रशासन विभागांतर्गत येतात. उस्मानाबाद जिल्ह्याची लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. वाढत्या नागरिकांची गरज भागविण्यासाठी येथे हॉटेल्स, मेडिकल, किराणा दुकान उभी राहिली आहेत. त्यामुळे अशा आस्थापनांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारीही अन्न व औषध प्रशासन विभागाची आहे. सध्या औषध विभागात दोन औषध निरीक्षक पदे मंजूर असून, एक जागा रिक्त आहे. त्यामुळे एकाच औषध निरीक्षकावर परवाने मंजूर करणे, औषध तपासणी, तक्रारीची चौकशी, खटल्याचा पाठपुरावा करणे, कार्ट कचेऱ्याच्या तारखा करणे आदी कामे करावे लागत आहेत. मागील तीन अन्न विभागात तीन अन्न निरीक्षकाचे पदे मंजूर असून, या जागा भरल्या आहेत. जिल्ह्यात एक हजार २७६ परवानाधारक आस्थापना व १५ हजार १६ आस्थापना नोंदणीकृत आहेत. यात ३७६ परवानाधारक व २ हजार २०० नोंदणीकृत हॉटेल्सची संख्या आहे. आस्थापनांच्या तुलनेत कर्मचाऱ्यांची संख्या तोकडी असल्याने हा डोलारा सांभाळताना कर्मचाऱ्यांची मोठी दमछाक होते. असे असतानाही कार्यरत अधिकारी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत आहेत.

चौकट...

मेडिकल्सची तपासणीच होत नाही

जिल्ह्यात सुमारे १२५ होलसेल व ७५०रिटेलर मेडिकल्स आहेत. या मेडिकलची प्रत्येक वर्षी तपासणी करणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. मात्र, अन्न व औषध प्रशासन विभागाकडे केवळ एकच औषध निरीक्षक असल्याने जिल्ह्यातील संपूर्ण मेडिकलची तपासणी पूर्ण होत नाही.

हॉटेलचीही तपासणी नाही

जिल्ह्यात ३७३ परवानाधारक व २ हजार २०० नोंदणीकृत हॉटेल्स आहेत. या हॉटेल्सच्या तपासणीसाठी तीन अन्न सुरक्षा अधिकारी कार्यरत आहेत. अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांनाच किराणा दुकान, खानावळीसह इतर आस्थापना तपासणी करावी लागत असते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांकडूनही वर्षभरात पूर्ण हॉटेल्सची तपासणी केली जात नाही.

कोर्ट, कचेऱ्या करण्यातच खर्ची होतो अधिक वेळ तपासणीदरम्यान अनियमितता आढळल्यास दंडात्मक, प्रसंगी संबंधित प्रतिष्ठानावर निलंबनाची कारवाई केली जाते. प्रकरण न्यायालयाकडे वर्ग केले जाते. यात अधिकाऱ्यांना न्यायालयात हजर व्हावे, लागत असल्याने, त्यांचे बरेच दिवस या कामकाजात जातात. यामुळे इतर कामांवर परिणाम होतो.

पाॅईंटर...

१६६०३११

जिल्ह्याची लोकसंख्या

९७५

जिल्ह्यातील मेडिकल्स

औषध निरीक्षक

२५००

जिल्ह्यातील हॉटेल्स

कोट...

जिल्ह्यातील हॉटेल्स, किराणा दुकाने, भोजनालये, रेस्टॉरंट याची तपासणी केली जात आहे. ३ अन्न सुरक्षा अधिकारी कार्यरत असून, प्रत्येक अधिकाऱ्यास महिन्याला दहा आस्थापना तपासणी व ८ नमुने घेण्याचे उद्दिष्ट दिले आहे.

एस. बी. कोडगिरे, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन