शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

शेतीसाठी मजूर देता का मजूर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:23 IST

कळंब : पीकपद्धती बदलत आहे, दोन्ही प्रमुख हंगामाखालील क्षेत्र, फळपिके व भाजीपाला वाढत आहे. अशी स्थिती सुखद असली तरी ...

कळंब : पीकपद्धती बदलत आहे, दोन्ही प्रमुख हंगामाखालील क्षेत्र, फळपिके व भाजीपाला वाढत आहे. अशी स्थिती सुखद असली तरी ही शेती कसण्यासाठी गरजेच्या असणाऱ्या मजुरांची मात्र मोठी वानवा आहे. यामुळे गावोगावी मजूर आणायचे कोठून, असा शेती क्षेत्रासमोर सवाल उभा ठाकला आहे.

काळाच्या ओघात ग्रामीण भागात अनेक ‘स्थित्यंतरे’ झाली आहेत. यात बहुतांश मजूरवर्गांना शेतीव्यतिरिक्त ‘रोजगार’ मिळत आहे. यातून काही गावांत ‘स्थलांतरे’ही नोंदली गेली आहेत. यामुळे निव्वळ शेती मशागतीवर उदरनिर्वाह भागविणाऱ्या कुटुंबातील संख्या गरजेच्या तुलनेत अत्यल्प राहिली आहे. यास्थितीत शेती क्षेत्र कात टाकत असताना पीकपद्धती बदलत असली तरी संकटाची मालिका काही संपुष्टात आलेली नाही. लहरी निसर्ग, वाढता उत्पादन खर्च, दरातील अस्थिरता, यासोबतच शेती कसण्यासाठी मजुरांची कमतरता जाणवत असल्याने गावोगावी कोणी मजूर देता का मजूर, अशी विनवणी करण्याची वेळ बळीराजावर आली आहे.

शेती कामासाठी मजूर मिळतच नाहीत. यामुळे बळीराजाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कापूस वेचणीसाठी माणसे मिळत नाहीत, यात वेचणीचा दरही वाढविला आहे. यामुळे यापुढे पीकच घ्यायचे टाळणार आहोत.

- राजाभाऊ गंभिरे

मजुरांअभावी फवारणी, भाजीपाला काढणी, खुरपणी, खते देणे आदी कामे वेळेवर न झाल्याने उत्पादनात घट होते आणि सध्या मजूर गुत्ते पद्धतीमध्ये अवाच्या सव्वा मागत आहे; परंतु पर्याय नाही. उदाहरणार्थ ऊस लावणं 6000 रुपये एकर, सोयाबीन काढणी 4000 रुपये बॅग घेत आहेत.

- विनोद तांबारे, आंदोरा

शेतीच्या दैनंदिन कामासाठी मजूर मिळत नाहीत. याशिवाय नियमित कामासाठी सालगडीही मिळत नाहीत. यासाठी इतर जिल्ह्यात भटकंती करावी लागते. सोयाबीन काढणीला बाहेरच्या जिल्ह्यातील मजूर आणले होते.

-तानाजी वाघमारे, भाटशिरपुरा

गरज ही शोधाची जननी

मजुरांची उपलब्धता होत नसल्याने नवतंत्राने अनेक यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली आहे. ट्रॅक्टर्सचा व त्यावरील यांत्रिक साधनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळेच बैलपेरा आता नामशेष होत आहे, तर कापूस वेचणीसाठी यंत्राचा शोध लागत नसल्याने व मजूरही मिळत नसल्याने शेतकरी हे पीक घेण्याचे टाळत आहेत.

यंत्राने होणारी कामे

नांगरणी, मोगडणी, पाळी, पेरणी, काढणी, फवारणी अशी कामे यंत्राने होत आहेत. मात्र, मशागत, काढणी, छाटणी, मळणी आदी विविध पिकांच्या कामाला मजुरांची गरज असते.