शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
3
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
4
दहा कोटीचे बक्षीस, चार तास चकमक ! दबा धरून बसलेल्या माओवाद्यांचा जवानांनी केला खात्मा
5
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
6
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
7
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
8
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
9
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
10
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
11
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
12
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
13
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
14
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
15
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
16
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
17
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
18
Viral Video : घर नव्हे हा तर अजूबा! अवघ्या ५२ इंचांच्या दोन मजली घरात डोकावून बघाल, तर हादरून जाल!
19
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
20
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

धाराशिवला जलप्रलय; पुराने वेढली गावे, जनावरे दावणीतच बुडून ठार, हेलिकॉप्टरने रेस्क्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 12:15 IST

धाराशिव जिल्ह्यातील २२ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यात सर्वाधिक पाऊस हा भूम व परंडा तालुक्यात झाला.

धाराशिव : दररोज होत असलेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यात हाहाकार माजला आहे. रविवार व सोमवारच्या रात्रीतून पावसाने कहर केला. जिल्ह्यातील तब्बल २२ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. विशेषत: भूम व परंडा तालुक्यातील सर्वच मंडळांत १०० मि.मी.हून अधिक पाऊस झाला. त्यामुळे अनेक गावे, शेतवस्त्या पुराच्या पाण्यात गेल्या. परिणामी, अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी हेलिकॉप्टर व बोटीचा वापर करावा लागला.

धाराशिव जिल्ह्यात सोमवारी पहाटेपर्यंत जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे परंडा तालुक्यातील सीना, खासापुरी, चांदणी प्रकल्पांतून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे सीना, खैरी, नळी, दुधना, सोनगिरी नद्यांना मोठा पूर आला. या पुराचे पाणी परंडा तालुक्यातील सुमारे २० पेक्षा अधिक गावांमध्ये शिरले. नागरिकांच्या घरात पाणी शिरून संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील पिके अन् मातीही वाहून गेली असून, अद्याप अनेक शिवारात पिके पूर्णत: पाण्याखाली बुडाली आहेत.

२२ मंडळांमध्ये अतिवृष्टीधाराशिव जिल्ह्यातील २२ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यात सर्वाधिक पाऊस हा भूम व परंडा तालुक्यात झाला. येथील दहाही मंडळांमध्ये १०० मि.मी.पेक्षा जास्त पाऊस आहे. शिवाय, उमरगा तालुक्यातही सहापैकी ५ मंडळांत अतिवृष्टी नोंदली आहे.

हेलिकॉप्टरने ६० नागरिकांना काढलेपुरात परंडा तालुक्यातील लाखी बुकी, चौघरी वस्ती, नरसाळे वस्ती, वाघेगव्हाण, देवगावसह इतरही काही वस्त्यांवर नागरिक अडकून पडले होते. नाशिक येथून बोलावलेल्या हेलिकॉप्टरद्वारे सुमारे ६० नागरिकांना बाहेर काढण्यात आले. बोटीद्वारेही शेकडो नागरिकांना वाचविण्यात आले.

पुराच्या लोंढ्याने घेतला जीवभूम तालुक्यातील चिंचोली येथील देवना नवनाथ वारे (७०) या रविवारी रात्री शेतातील शेडमध्ये झोपल्या होत्या. रात्रीतून लगतच्या ओढ्याला पूर आला. देवनाबाई झोपेतच असताना पुराचा एक लोंढा शेडमध्ये शिरला व त्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.

बांधलेल्या अवस्थेतील जनावरे दगावलीभूम तालुक्यातील पिंपळगाव येथील शेतकरी विश्वनाथ दातखिळे यांच्या गोठ्यात पुराचे पाणी शिरल्याने बांधलेल्या अवस्थेतील १६ गाई बुडून जागेवरच मृत्यू पावल्या. या गावात एकूण ६५ तर अंतरगाव येथे १२ जनावरे दगावली आहे. परंडा तालुक्यातही शेकडो जनावरे वाहून गेली आहेत.

एनडीआरएफ, आर्मी तैनातपरंडा तालुक्यात पावसाने नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. पुढचे काही दिवस आणखी जोरदार पावसाचे असतील, असे हवामान विभागाने अलर्ट दिल्याने परंड्यात एनडीआरएफ, सैन्यदलाचे जवान सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत.

टॅग्स :RainपाऊसdharashivधाराशिवFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र