शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
3
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
4
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
5
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
6
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
7
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
8
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
9
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
10
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
11
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
12
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
13
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
14
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
15
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
16
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
17
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
18
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
19
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
20
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

धाराशिवला जलप्रलय; पुराने वेढली गावे, जनावरे दावणीतच बुडून ठार, हेलिकॉप्टरने रेस्क्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 12:15 IST

धाराशिव जिल्ह्यातील २२ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यात सर्वाधिक पाऊस हा भूम व परंडा तालुक्यात झाला.

धाराशिव : दररोज होत असलेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यात हाहाकार माजला आहे. रविवार व सोमवारच्या रात्रीतून पावसाने कहर केला. जिल्ह्यातील तब्बल २२ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. विशेषत: भूम व परंडा तालुक्यातील सर्वच मंडळांत १०० मि.मी.हून अधिक पाऊस झाला. त्यामुळे अनेक गावे, शेतवस्त्या पुराच्या पाण्यात गेल्या. परिणामी, अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी हेलिकॉप्टर व बोटीचा वापर करावा लागला.

धाराशिव जिल्ह्यात सोमवारी पहाटेपर्यंत जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे परंडा तालुक्यातील सीना, खासापुरी, चांदणी प्रकल्पांतून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे सीना, खैरी, नळी, दुधना, सोनगिरी नद्यांना मोठा पूर आला. या पुराचे पाणी परंडा तालुक्यातील सुमारे २० पेक्षा अधिक गावांमध्ये शिरले. नागरिकांच्या घरात पाणी शिरून संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील पिके अन् मातीही वाहून गेली असून, अद्याप अनेक शिवारात पिके पूर्णत: पाण्याखाली बुडाली आहेत.

२२ मंडळांमध्ये अतिवृष्टीधाराशिव जिल्ह्यातील २२ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यात सर्वाधिक पाऊस हा भूम व परंडा तालुक्यात झाला. येथील दहाही मंडळांमध्ये १०० मि.मी.पेक्षा जास्त पाऊस आहे. शिवाय, उमरगा तालुक्यातही सहापैकी ५ मंडळांत अतिवृष्टी नोंदली आहे.

हेलिकॉप्टरने ६० नागरिकांना काढलेपुरात परंडा तालुक्यातील लाखी बुकी, चौघरी वस्ती, नरसाळे वस्ती, वाघेगव्हाण, देवगावसह इतरही काही वस्त्यांवर नागरिक अडकून पडले होते. नाशिक येथून बोलावलेल्या हेलिकॉप्टरद्वारे सुमारे ६० नागरिकांना बाहेर काढण्यात आले. बोटीद्वारेही शेकडो नागरिकांना वाचविण्यात आले.

पुराच्या लोंढ्याने घेतला जीवभूम तालुक्यातील चिंचोली येथील देवना नवनाथ वारे (७०) या रविवारी रात्री शेतातील शेडमध्ये झोपल्या होत्या. रात्रीतून लगतच्या ओढ्याला पूर आला. देवनाबाई झोपेतच असताना पुराचा एक लोंढा शेडमध्ये शिरला व त्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.

बांधलेल्या अवस्थेतील जनावरे दगावलीभूम तालुक्यातील पिंपळगाव येथील शेतकरी विश्वनाथ दातखिळे यांच्या गोठ्यात पुराचे पाणी शिरल्याने बांधलेल्या अवस्थेतील १६ गाई बुडून जागेवरच मृत्यू पावल्या. या गावात एकूण ६५ तर अंतरगाव येथे १२ जनावरे दगावली आहे. परंडा तालुक्यातही शेकडो जनावरे वाहून गेली आहेत.

एनडीआरएफ, आर्मी तैनातपरंडा तालुक्यात पावसाने नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. पुढचे काही दिवस आणखी जोरदार पावसाचे असतील, असे हवामान विभागाने अलर्ट दिल्याने परंड्यात एनडीआरएफ, सैन्यदलाचे जवान सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत.

टॅग्स :RainपाऊसdharashivधाराशिवFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र