शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

२५ वर्षांचे कष्ट क्षणात वाहून गेले; ४२ गाई-वासरांचा मृत्यू, भूमच्या पशुपालकावर दुःखाचा डोंगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 19:46 IST

Dharashiv Rain : एका गायीपासून ६७ गायींचा गोठा उभं करण्यासाठी २५ वर्षे गेली. आम्ही पशुधनांना आपल्या लेकरांसारखं जपलं.

संतोष वीर/भूम (जि. धाराशिव) : काळ बनून काळरात्री बरसलेल्या पावसाने हजारो शेतकऱ्यांना उघड्यावर आणले आहे. पिंपळगावचे दातखिळे कुटुंबही यापैकीच एक. २५ वर्षांपूर्वी एक गाय आणून जोडव्यवसाय सुरू केला. अखंड मेहनतीने २५ वर्षांनी शेकडो पशुधनाची जंत्री उभी केली. गोठा मोठा केला. पोल्ट्री केली. यासाठी केलेला संघर्ष व कष्ट मात्र अवघ्या २५ मिनिटांत पुरामध्ये वाहून गेले. आता उरलाय तो दाटलेला हुंदका अन् गायीविना पोरका झालेला तो गोठा.

बालाघाटच्या डोंगररांगांत वसलेले भूम. माळरानामुळे शेती आवाक्याबाहेरची. म्हणून पशुपालनावर उपजीविका भागविणाऱ्या कुटुंबांची संख्या येथे मोठी. पिंपळगाव येथील शेतकरी आत्माराम भानुदास दातखिळे हेही यापैकीच एक. शेतीवर भागत नसल्याने २५ वर्षांपूर्वी त्यांनी एक गाय आणली. दुधातून पदरी पडलेले पै-पै जोडून दुसरी गाय घेतली. याच पद्धतीने पशुधन जोडत त्यांनी आता ६७ गायी केल्या होत्या. त्यांच्यासाठी मोठा गोठा बांधला. त्यांच्या दुधातून मिळणाऱ्या उत्पन्नाद्वारे २० शेळ्या, १०० कोंबड्याही आणल्या. हे सारं उभं करण्यासाठी आयुष्याची २५ वर्षे खर्ची घातली.

दरम्यान, रविवार व सोमवारच्या रात्री पडलेल्या जोरदार पावसाने त्यांच्या गोठ्याच्या वरील बाजूस बाणगंगा व रामगंगा नद्यांचा संगम होऊन पाण्याचा मोठा लोंढा तयार झाला. अवघ्या २५ ते ३० मिनिटांत हा लोंढा दातखिळे यांच्या शेतात, गोठ्यात शिरला. बांधलेल्या गायींना सोडण्याची संधीही दिली नाही. त्यामुळे १७ गायी जागेवरच दगावल्या. १० गायी वाहून गेल्या. २० शेळ्या, १५ वासरे, १०० कोंबड्या, ४०० बॅग खुराक हे सारं काही डोळ्यांदेखत संपलं. २५ वर्षे अविरत कष्ट घेऊन लेकरांसारखं जपलेल्या पशुधनाचा बळी गेलाय, हे आत्माराम दातखिळे यांचे मन अजूनही मानायला तयार नाही.

घरातही घातला पुराने धुमाकूळदातखिळे यांच्या घरातही पुराचे पाणी शिरल्याने सारा संसारही नष्ट झाला. पिके, कृषी औजारे, धान्य सगळ्यांची नासाडी झाली. कणा नव्हे, अख्खा माणूस मोडून पडला. त्यामुळे सरपंच झिनत सय्यद यांच्यासह गावकऱ्यांनी त्यांना धीर देत जमेल तशी मदत देण्यास सुरुवात केली आहे.

पुराचा पुन्हा लोंढा, मृत गायीही गेल्या वाहून...बांधलेल्या अवस्थेत मृत झालेल्या गायींच्या अंत्यसंस्कारासाठी दातखिळे यांनी शेतातच मोठा खड्डा घेतला होता. ट्रॅक्टर आणले होते. मात्र, पुन्हा पावसाला सुरुवात झाली. सोमवारी रात्री पुन्हा पूर आला व त्यात मृत गायी वाहून गेल्या.

आता सगळंच संपलंएका गायीपासून ६७ गायींचा गोठा उभं करण्यासाठी २५ वर्षे गेली. आम्ही पशुधनांना आपल्या लेकरांसारखं जपलं. त्यांच्यावरच आमचं घर चालायचं; पण आता सगळंच संपलं. ५० लाखांचं नुकसान झालंय. कसं उभं राहायचं, हा प्रश्न डोक्यावर दगडासारखा आदळतोय.- आत्माराम दातखिळे, पशुपालक

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Farmer Devastated: Flood Kills Livestock, Wipes Out 25 Years' Work

Web Summary : A Maharashtra farmer's 25 years of hard work vanished as floods killed 42 cattle. Atmaram Datkhile lost livestock, crops, and his home in the deluge, facing a 50 lakh loss. Villagers offer support.
टॅग्स :RainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीdharashivधाराशिव