शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

२५ वर्षांचे कष्ट क्षणात वाहून गेले; ४२ गाई-वासरांचा मृत्यू, भूमच्या पशुपालकावर दुःखाचा डोंगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 19:46 IST

Dharashiv Rain : एका गायीपासून ६७ गायींचा गोठा उभं करण्यासाठी २५ वर्षे गेली. आम्ही पशुधनांना आपल्या लेकरांसारखं जपलं.

संतोष वीर/भूम (जि. धाराशिव) : काळ बनून काळरात्री बरसलेल्या पावसाने हजारो शेतकऱ्यांना उघड्यावर आणले आहे. पिंपळगावचे दातखिळे कुटुंबही यापैकीच एक. २५ वर्षांपूर्वी एक गाय आणून जोडव्यवसाय सुरू केला. अखंड मेहनतीने २५ वर्षांनी शेकडो पशुधनाची जंत्री उभी केली. गोठा मोठा केला. पोल्ट्री केली. यासाठी केलेला संघर्ष व कष्ट मात्र अवघ्या २५ मिनिटांत पुरामध्ये वाहून गेले. आता उरलाय तो दाटलेला हुंदका अन् गायीविना पोरका झालेला तो गोठा.

बालाघाटच्या डोंगररांगांत वसलेले भूम. माळरानामुळे शेती आवाक्याबाहेरची. म्हणून पशुपालनावर उपजीविका भागविणाऱ्या कुटुंबांची संख्या येथे मोठी. पिंपळगाव येथील शेतकरी आत्माराम भानुदास दातखिळे हेही यापैकीच एक. शेतीवर भागत नसल्याने २५ वर्षांपूर्वी त्यांनी एक गाय आणली. दुधातून पदरी पडलेले पै-पै जोडून दुसरी गाय घेतली. याच पद्धतीने पशुधन जोडत त्यांनी आता ६७ गायी केल्या होत्या. त्यांच्यासाठी मोठा गोठा बांधला. त्यांच्या दुधातून मिळणाऱ्या उत्पन्नाद्वारे २० शेळ्या, १०० कोंबड्याही आणल्या. हे सारं उभं करण्यासाठी आयुष्याची २५ वर्षे खर्ची घातली.

दरम्यान, रविवार व सोमवारच्या रात्री पडलेल्या जोरदार पावसाने त्यांच्या गोठ्याच्या वरील बाजूस बाणगंगा व रामगंगा नद्यांचा संगम होऊन पाण्याचा मोठा लोंढा तयार झाला. अवघ्या २५ ते ३० मिनिटांत हा लोंढा दातखिळे यांच्या शेतात, गोठ्यात शिरला. बांधलेल्या गायींना सोडण्याची संधीही दिली नाही. त्यामुळे १७ गायी जागेवरच दगावल्या. १० गायी वाहून गेल्या. २० शेळ्या, १५ वासरे, १०० कोंबड्या, ४०० बॅग खुराक हे सारं काही डोळ्यांदेखत संपलं. २५ वर्षे अविरत कष्ट घेऊन लेकरांसारखं जपलेल्या पशुधनाचा बळी गेलाय, हे आत्माराम दातखिळे यांचे मन अजूनही मानायला तयार नाही.

घरातही घातला पुराने धुमाकूळदातखिळे यांच्या घरातही पुराचे पाणी शिरल्याने सारा संसारही नष्ट झाला. पिके, कृषी औजारे, धान्य सगळ्यांची नासाडी झाली. कणा नव्हे, अख्खा माणूस मोडून पडला. त्यामुळे सरपंच झिनत सय्यद यांच्यासह गावकऱ्यांनी त्यांना धीर देत जमेल तशी मदत देण्यास सुरुवात केली आहे.

पुराचा पुन्हा लोंढा, मृत गायीही गेल्या वाहून...बांधलेल्या अवस्थेत मृत झालेल्या गायींच्या अंत्यसंस्कारासाठी दातखिळे यांनी शेतातच मोठा खड्डा घेतला होता. ट्रॅक्टर आणले होते. मात्र, पुन्हा पावसाला सुरुवात झाली. सोमवारी रात्री पुन्हा पूर आला व त्यात मृत गायी वाहून गेल्या.

आता सगळंच संपलंएका गायीपासून ६७ गायींचा गोठा उभं करण्यासाठी २५ वर्षे गेली. आम्ही पशुधनांना आपल्या लेकरांसारखं जपलं. त्यांच्यावरच आमचं घर चालायचं; पण आता सगळंच संपलं. ५० लाखांचं नुकसान झालंय. कसं उभं राहायचं, हा प्रश्न डोक्यावर दगडासारखा आदळतोय.- आत्माराम दातखिळे, पशुपालक

टॅग्स :RainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीdharashivधाराशिव