शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

भूम तालुक्यात १७ गायी गोठ्यातच दगावल्या, ८७ जनावरे वाहून गेली; शेतीही खरडून निघाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 19:08 IST

अतिवृष्टीमुळे तालुक्यात  शेकडो हेक्टर शेतीचे प्रचंड नुकसान झाले

- संतोष वीरभूम ( धाराशिव) : तालुक्यातील पाचही मंडळांमध्ये २१ सप्टेंबर अतिवृष्टीची नोंद झाली. यात शेती व जनावरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. रविवारी सायंकाळी ८ वाजल्यापासूनच तालुक्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली व रात्रभर पावसाचा जोर कायम राहिला. यामध्ये आंबी मंडळात १०९ मिमी, माणकेश्वर १०३ मिमी, भूम १३२ मिमी, वालवड १०९ मिमी तर ईट मंडळात ७५ मिमी इतकी नोंद झाली असल्याचा अहवाल तहसील प्रशासनाच्या वतीने देण्यात आला.

दरम्यान शहरात तब्बल १३२ मिमी पाऊस झाला. यामुळे शहरातील सर्वच नाले ओसंडून वाहू लागले. यामध्ये शहरातील संजय साबळे यांच्या कृषी दुकानात नाल्यातील पाणी प्रवाहाने घुसले. त्यामुळे दुकानातील खते व औषधे पाण्यात भिजून लाखो रुपयांचे नुकसान झाले.

यासह तालुक्याच्या सीमेवरील अंतरगाव येथे बाणगंगा नदीला मोठा पूर आला. व नदी पात्राने  नदी पात्र सोडून गावात शिरकाव केला. त्यामुळे नागरिकांची घरे, शेतजमिनी व जनावरे याचे अतोनात नुकसान झाले. तब्बल अंतरगाव येथील ४०० हेक्टर जमिनीचे नुकसान झाले असून यातील पिके वाया गेली आहे. गांभीर्याची बाब म्हणजे ५० हेक्टर जमीन खरडून गेली आहे. १०५ घरांचे नुकसान झाले आहे व १२ जनावरे वाहून गेली आहेत. 

पिंपळगाव येथे विश्वनाथ आत्माराम दातखिळे यांच्या गोठ्यातील १७ गायी जागीच दगावल्या, १५ वासरे  व १० गाई वाहून गेली तर पशुखाद्याचे २२ पोते पाण्यात वाहून गेले व गोठ्याचेही मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय हिवर्डा येथे पाझर तलाव फुटल्याने २० ते २५ एकर जमीन पाण्यात गेली आहे.पाथरूड येथे ६ घरांची पडझड होऊन १ जनावर दगावले आहे. अंजनसोंडा येथे ३ घरांची पडझड झाली आहे. देवांग्रा येथे १ जनावर दगावले आहे. सुनगिरी येथे तीन घरांची पडझड होऊन तब्बल २० हेक्टर शेती खरडून गेली आहे. बेलगाव पिंपळगाव येथेही पूरामुळे जनावरे वाहून गेली आहेत.

आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार सायंकाळी ५ वाजेपर्यंत तालुक्यात तब्बल ८७ जनावरे वाहून व दगावली असल्याची नोंद झाली असल्याची माहिती दिली. अतिवृष्टीमुळे तालुक्यात  शेकडो हेक्टर शेतीचे प्रचंड नुकसान देखील झाल्याचे सांगितले आहे. यामुळे तातडीने प्रशासनाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे  पंचनामे करून मदत जाहीर करावी अशी मागणी तालुक्यातील नुकसान ग्रस्त शेतकरी करू लागले आहेत.

टॅग्स :RainपाऊसdharashivधाराशिवFarmerशेतकरी