शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

भूम तालुक्यात १७ गायी गोठ्यातच दगावल्या, ८७ जनावरे वाहून गेली; शेतीही खरडून निघाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 19:08 IST

अतिवृष्टीमुळे तालुक्यात  शेकडो हेक्टर शेतीचे प्रचंड नुकसान झाले

- संतोष वीरभूम ( धाराशिव) : तालुक्यातील पाचही मंडळांमध्ये २१ सप्टेंबर अतिवृष्टीची नोंद झाली. यात शेती व जनावरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. रविवारी सायंकाळी ८ वाजल्यापासूनच तालुक्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली व रात्रभर पावसाचा जोर कायम राहिला. यामध्ये आंबी मंडळात १०९ मिमी, माणकेश्वर १०३ मिमी, भूम १३२ मिमी, वालवड १०९ मिमी तर ईट मंडळात ७५ मिमी इतकी नोंद झाली असल्याचा अहवाल तहसील प्रशासनाच्या वतीने देण्यात आला.

दरम्यान शहरात तब्बल १३२ मिमी पाऊस झाला. यामुळे शहरातील सर्वच नाले ओसंडून वाहू लागले. यामध्ये शहरातील संजय साबळे यांच्या कृषी दुकानात नाल्यातील पाणी प्रवाहाने घुसले. त्यामुळे दुकानातील खते व औषधे पाण्यात भिजून लाखो रुपयांचे नुकसान झाले.

यासह तालुक्याच्या सीमेवरील अंतरगाव येथे बाणगंगा नदीला मोठा पूर आला. व नदी पात्राने  नदी पात्र सोडून गावात शिरकाव केला. त्यामुळे नागरिकांची घरे, शेतजमिनी व जनावरे याचे अतोनात नुकसान झाले. तब्बल अंतरगाव येथील ४०० हेक्टर जमिनीचे नुकसान झाले असून यातील पिके वाया गेली आहे. गांभीर्याची बाब म्हणजे ५० हेक्टर जमीन खरडून गेली आहे. १०५ घरांचे नुकसान झाले आहे व १२ जनावरे वाहून गेली आहेत. 

पिंपळगाव येथे विश्वनाथ आत्माराम दातखिळे यांच्या गोठ्यातील १७ गायी जागीच दगावल्या, १५ वासरे  व १० गाई वाहून गेली तर पशुखाद्याचे २२ पोते पाण्यात वाहून गेले व गोठ्याचेही मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय हिवर्डा येथे पाझर तलाव फुटल्याने २० ते २५ एकर जमीन पाण्यात गेली आहे.पाथरूड येथे ६ घरांची पडझड होऊन १ जनावर दगावले आहे. अंजनसोंडा येथे ३ घरांची पडझड झाली आहे. देवांग्रा येथे १ जनावर दगावले आहे. सुनगिरी येथे तीन घरांची पडझड होऊन तब्बल २० हेक्टर शेती खरडून गेली आहे. बेलगाव पिंपळगाव येथेही पूरामुळे जनावरे वाहून गेली आहेत.

आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार सायंकाळी ५ वाजेपर्यंत तालुक्यात तब्बल ८७ जनावरे वाहून व दगावली असल्याची नोंद झाली असल्याची माहिती दिली. अतिवृष्टीमुळे तालुक्यात  शेकडो हेक्टर शेतीचे प्रचंड नुकसान देखील झाल्याचे सांगितले आहे. यामुळे तातडीने प्रशासनाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे  पंचनामे करून मदत जाहीर करावी अशी मागणी तालुक्यातील नुकसान ग्रस्त शेतकरी करू लागले आहेत.

टॅग्स :RainपाऊसdharashivधाराशिवFarmerशेतकरी