शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

वाळलेल्या पिकासह शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा, ‘कोरडा दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी

By गणेश कुलकर्णी | Updated: September 6, 2023 16:40 IST

वाशी तहसीलवर एल्गार मोर्चा : स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर

धाराशिव : जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून दुष्काळ कायमस्वरूपी संपवण्यासाठी शासनाने शाश्वत पाण्याच्या उपायोजना कराव्यात, यासह अन्य मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी वाशी तहसील कार्यालयावर यल्गार मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेतातील वाळलेल्या पिकांसह मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.

यावेळी जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, वाशी तालुक्याचा खंडवृष्टीत समावेश करावा, दुष्काळ कायमस्वरूपी संपवण्यासाठी शासनाने शाश्वत पाण्याच्या उपाय योजना कराव्यात, पीक कर्ज माफ करावे, खरीप २०२४ चा पीक विमा मंजूर करावा, नियमित पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम तत्काळ द्यावी, अतिवृष्टी नुकसानाचे अनुदान राहिलेल्या शेतकऱ्यांना ताबडतोब द्यावे, २०२० चा सोयाबीन पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकर जमा करावा, कांदा अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना ताबडतोब द्यावी, पर्जन्यमापक यंत्र प्रत्येक गावोगावी बसविण्यात यावे, आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

या मोर्चात जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, तालुकाध्यक्ष वसंत जगताप, बिभीषण भैरट, तानाजी पाटील, गजानन भारती, मुकुंद शिंगणापुरे, शिवाजी उंद्रे, राजेश्वर कवडे, संजय कवडे, पांडुरंग घुले, बाळकृष्ण बारगजे, दादासाहेब चेडे, नाना उंद्रे, चंद्रकांत उंद्रे, चंद्रकांत चेडे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.यापूर्वी दोनदा दिले निवेदनेया सर्व मागण्यांसंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शासनास यापूर्वी २४ ॲागस्ट व १ सप्टेंबर रोजी लेखी निवेदन देण्यात आले होते. मात्र, या निवेदनाची शासनाने कसलीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे संघटनेच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आल्याचे आंदोलकांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसOsmanabadउस्मानाबाद