कोरोनाच्या भीतीने उष्माघातही पळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:33 IST2021-05-19T04:33:40+5:302021-05-19T04:33:40+5:30

उस्मानाबाद : उन्हाळ्यात उष्माघाताने दरवर्षी जिल्हाभरात आठ ते दहा जणांचे बळी जातात. यावर्षी मात्र उष्माघाताने नागरिकांचा बळी नाही. कोरोनाच्या ...

Corona also fled the heatstroke for fear | कोरोनाच्या भीतीने उष्माघातही पळाला

कोरोनाच्या भीतीने उष्माघातही पळाला

उस्मानाबाद : उन्हाळ्यात उष्माघाताने दरवर्षी जिल्हाभरात आठ ते दहा जणांचे बळी जातात. यावर्षी मात्र उष्माघाताने नागरिकांचा बळी नाही. कोरोनाच्या भीतीने उष्माघातही पळाला काय, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

कोरोनामुळे एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर दुकाने बंद आहेत. शिवाय लग्नसमारंभावरही निर्बंध असल्याने मोजक्याच नागरिकांमध्ये आटोपले जात आहेत. जिल्हाबंदी असल्याने लांबचा प्रवासही बंद आहे. अशा स्थितीत नागरिकांचा उन्हाळा घरीच जात आहे. त्यामुळे उष्माघाताची एकही घटना आजपर्यंत जिल्ह्यात घडली नाही. ग्रामीण भागात मशागतीची कामे सुरू आहेत. रोजगार हमीचीही कामे सुरू आहेत. त्यामुळे या नागरिकांना उष्माघाताचा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोग्य विभागाने यामध्ये जागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.

ढगाळ वातावरण

रोहिणी नक्षत्रापासून नवतपांना सुरुवात होते. यावर्षी रोहिणी नक्षत्र २५ मेपासून सुरुवात होत आहे. नवतपा ३ जूनपर्यंत चालणार आहेत. या कालावधीत सूर्य-पृथ्वीदरम्यानचे अंतर कमी होते. त्यामुळे सूर्याची प्रखरता वाढते. तापमानाचा पारा ४४ अंशाच्या जवळपास पोहोचते. नवतपाच्या पूर्वीही असह्य उकाडा राहतो. मात्र, या वर्षी ढगाळ वातावरण असून, अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे तापमान घट होत आहे.

उन्हाळा घरातच

यंदा मार्च महिन्यापासून कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली. कोरोना संसर्गास प्रतिबंध घालण्यासाठी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून निर्बंध लागू करण्यात आले. एप्रिल महिन्यापासून संचारबंदी लागू आहे. शिवाय अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद आहेत. त्यामुळे नागरिकांचा उन्हाळा घरातच जात आहे.

कोट

दरवर्षी उन्हाळा सुरू होण्यापूर्वी रुग्णालयात उष्माघातासंबंधी जनजागृती केली जात असत. शिवाय रुग्णांसाठी बेडही ठेवले जात. यंदा कोरोनामुळे सूचना फलक लावण्यात आले नाहीत. शिवाय अद्यापपर्यंत उष्माघाताचा रुग्ण आढळून आला नाही.

-डाॅ. हनुमंत वडगावे, जिल्हा आरोग्य अधिकारी,

उष्माघाताचे बळी

२०१९ - १-

२०२० - ०८

२०२१ - ००

Web Title: Corona also fled the heatstroke for fear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.