सराफ व्यापाऱ्यांनी पुकारला बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:37 IST2021-08-24T04:37:08+5:302021-08-24T04:37:08+5:30
उस्मानाबाद : हॉलमार्क व स्टॉकसंदर्भात नव्यानेच करण्यात आलेल्या कायद्यात जाचक अटींचा अंतर्भाव केला असल्याचा दावा करीत सोमवारी उस्मानाबादेतील सराफ ...

सराफ व्यापाऱ्यांनी पुकारला बंद
उस्मानाबाद : हॉलमार्क व स्टॉकसंदर्भात नव्यानेच करण्यात आलेल्या कायद्यात जाचक अटींचा अंतर्भाव केला असल्याचा दावा करीत सोमवारी उस्मानाबादेतील सराफ व्यापाऱ्यांनी आपला व्यवसाय बंद ठेवून आंदोलन केले. जाचक अटी शिथिल कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.
केंद्र शासनाने नुकताच हॉलमार्क-एचयृआयडी व स्टॉक डिक्लेरेशनच्या बाबतीत नव्याने कायदा लागू केला आहे. या कायद्यात काही जाचक नियम व अटी लादण्यात आल्या आहेत. यामुळे सराफ व्यापाऱ्यांवर अन्याय होत असल्याचा दावा जिल्हा सराफ व सुवर्णकार असोसिएशनने केला आहे. या कायद्याला व्यापाऱ्यांचा विरोध नाही, मात्र त्यातील त्रासदायक तरतुदींना विरोध असल्याचे जिल्हाध्यक्ष संजय गणेश यांनी सांगितले. या तरतुदी वगळाव्यात, अशी मागणी व्यापाऱ्यांची असल्याचेही ते म्हणाले. याच अनुषंगाने लक्ष्य वेधण्यासाठी सोमवारी जिल्ह्यातील संपूर्ण सराफ बाजारपेठ बंद ठेवून आंदोलन करण्यात आले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागणीबाबतचे निवेदनही संघटनेकडून देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष संजय गणेश, सचिव मयूर जालनेकर, कार्याध्यक्ष प्रकाश खंडेलवाल, संतोष गणेश, दत्ता माळी, व्यंकटेश ओमासे, राजन नायगावकर, सौदागर माळी, कारागीर संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास थडवे, युवा सोनार संघटनेचे जिल्हाध्यक्ष कृष्णा डहाळे व सराफ, सुवर्णकार बांधव उपस्थित होते.