शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
4
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
5
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
6
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
7
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
9
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
10
...अन् सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला मारली मिठी, अभिनेता म्हणाला- "तुम्ही माझं कौतुक केलं..."
11
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
12
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
13
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
14
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
15
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
16
रश्मिका मंदानाला विसरा, आता ही साऊथ अभिनेत्री बनली 'नॅशनल क्रश'; दुप्पट केलं मानधन
17
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
18
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
19
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
20
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  

‘आधार’मुळे भीमरावला आई-वडील भेटले!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2020 5:41 AM

आधार कार्ड काढण्यासाठी नेल्यानंतर त्याच्या कुटुंबासंदर्भातील माहिती समोर आली. त्यानंतर भीमरावला त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

पांडुरंग पोळे नळदुर्ग (जि. उस्मानाबाद) : तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील आपलं घर येथे अनाथ म्हणून दाखल झालेल्या भीमराव अन् त्याच्या आई-वडिलांची तब्बल चार वर्षानंतर भेट झाली. भीमरावचे मूळ गाव बीड जिल्ह्यातील छत्र बोरगाव हे आहे. आधार कार्ड काढण्यासाठी नेल्यानंतर त्याच्या कुटुंबासंदर्भातील माहिती समोर आली. त्यानंतर भीमरावला त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.साधारणपणे आठ-नऊ वर्षाचा एक अशक्त मुलगा पोलिसांना आॅक्टोबर २०१६ मध्ये परभणी जिल्ह्यातील मानवत रेल्वे स्टेशनवर आढळून आला होता. पोलिसांनी चौकशी केली असता, त्यास काहीही आठवत नव्हते. मुलाने दिलेल्या जुजबी माहितीवरून तो उस्मानाबाद जिल्ह्यातील असावा, असे समजून त्यास उस्मानाबादच्या बालकल्याण समितीकडे सोपविण्यात आले. परंतु, त्याच्या कुटुंबाची खात्री होईल, त्यामुळे बालकल्याण समितीने त्याला आपलं घरमध्ये दाखल केले. त्यास तिसरीत प्रवेश देण्यात आला. हनुमान घाडगे असे त्याचे नाव नोंदविण्यात आले. काही दिवसांपूर्वीच शालेय विभागाने सर्व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्याचे आदेश दिले. तिसरीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड निघाले. परंतु, हनुमानचे आधार कार्ड निघत नव्हते. प्रत्येकवेळी काही ना काही त्रुटी निघत. ही बाब आपलं घरचे प्रभारी व्यवस्थापक नरेश ठाकूरयांनी विश्वस्त पन्नालाल सुराणायांच्या निदर्शनास आणून दिली.त्यावर हनुमान घाडगे यास सोबतघेऊन हे तिघेही गुरूवारी ‘आधार’च्या मुंबई येथील क्षेत्रिय कार्यालयातगेले.आधार कार्यालयाच्या निदर्शनास हे आणून दिल्यानंतर त्यांनी कारणे शोधण्याचा प्रयत्न केला असता, त्याचे यापूर्वीच आधार कार्ड काढले असल्याने पुन्हा निघत नसल्याचेस्पष्ट झाले. त्यानुसार हनुमान घाडगेहा अनाथ नसून त्याचे नावभीमराव मच्छिंद्र शिंदे (रा. छत्रबोरगाव, ता. माजलगाव) असल्याचे समोर आले होते.>पेढे वाटून आनंदोत्सव साजराभीमराव शिंदे याचे आधी आधार कार्ड काढण्यात आले होते, असे लक्षात आले. त्यावरून त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्यात आला. खात्री पटल्यानंतर भीमरावला बीडच्या बालकल्याण समितीकडे सोपविण्यात आले. समितीने त्यास आई-वडिलांच्या स्वाधीन केले. चार वर्षानंतर आपला मुलगा भेटल्याने आई-वडील व नातेवाईकांसह मित्रमंडळींनी पेढे व साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला.