शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

दररोज 15 हजार भाविकांना प्रवेश, तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी नियमावली जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 12:00 IST

7 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ होत आहे. त्यासाठी उस्मानाबाद जिल्हाधिकारी आणि तुळजाभवानी मंदिर संस्थानाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे

ठळक मुद्देनवरात्रीत तुळजाभवानी मंदिरात प्रचंड गर्दी होत असते. त्यामुळे तासाला किती भाविकांना सोडायचे, मंदिर किती वेळ सुरू ठेवायचे याचे नियोजन करण्यात येत आहे.

उस्मानाबाद/मुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर बंद झालेली राज्यातील सर्व मंदिरे ७ ऑक्टोबरपासून म्हणजे नवरात्रीच्या पहिल्याच दिवसापासून खुली करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे, राज्यातील भाविकांनी आनंद व्यक्त केला आहे. तर, आदिशक्तीपीठ असलेल्या कोल्हापूर, तुळजापूरसह विविध देवींच्या भक्तांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र, कोविड नियमावलींचे पालन करुनच भाविकांना मंदिरात प्रवेश वा दर्शन मिळणार आहे. तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील दर्शनासंदर्भात नियमावली जाहीर करण्यात आली आहे.  

तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेचेही दर्शन भक्तांना घेता येईल. मात्र, त्यासाठी मंदिर संस्थान आणि प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमावलींचे पालन करावे लागणार आहे. 7 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ होत आहे. त्यासाठी उस्मानाबाद जिल्हाधिकारी आणि तुळजाभवानी मंदिर संस्थानाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यानुसार, दररोज पहाटे 4 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत या काळात 15 हजार भाविकांनाच दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे.

अशी आहे नियमावली

दररोज 15 हजार भाविकांना दर्शनासाठी प्रवेश

परराज्यातील ज्या भाविकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे त्यांनाच जिल्ह्यात प्रवेश

लसीकरण न झालेल्या भाविकांना 72 तासांपूर्वीचा आरटीपीसीआर अहवाल दाखवणे बंधनकारक

गर्दी न करता कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन बंधनकारक

चेहऱ्यावर मास्क असणे बंधनकारक

सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक

नवरात्रौत्सवात कोजागिरी पौर्णिमा रद्द

18 ते 20 ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यात बंदी, तुळजापूर शहरात भाविकांना प्रवेश नाही

तुळजाभवानी मंदिरात 65 वर्षांवरील नागरिकांना तसेच गरोदर स्त्रिया आणि 10 वर्षांखालील मुलांना प्रवेश नाही

भाविकांना केवळ मंदिरात प्रवेश, अभिषेक आणि इतर विधींना परवानगी नाही

ऑनलाईन दर्शनाचीही सोय 

नवरात्रीत तुळजाभवानी मंदिरात प्रचंड गर्दी होत असते. त्यामुळे तासाला किती भाविकांना सोडायचे, मंदिर किती वेळ सुरू ठेवायचे याचे नियोजन करण्यात येत आहे. याशिवाय भाविकांना घरबसल्या देवीचे दर्शन तसेच दैनंदिन धार्मिक विधी पाहता यावेत याकरिता चॅनेलवरून लाईव्ह दर्शनाची सोयही करण्यात येणार आहे. राज्यात कोरोनाची साथ पसरल्यानंतर राज्यातील प्रार्थनास्थळे बंद ठेवण्यात आली होती. जवळपास गेल्या 1.5 वर्षांपासून ही प्रार्थनास्थळे बंद होती. मात्र, राज्य सरकारने नवरात्री उत्सवाच्या पहिल्याच दिवशी ही प्रार्थनास्थळे मंदिरे उघडण्यास परवानगी दिली आहे. 

टॅग्स :tuljapur-acतुळजापूरTempleमंदिरNavratriनवरात्री