शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

उस्मानाबाद जिल्ह्यात तयार झाले २५०० शेततळे; मात्र अस्तरीकरण झाले केवळ २३७ चे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2018 6:15 PM

मागेल त्याला शेततळे या योजनेंतर्गत गत तीन वर्षात तब्बल २५०० शेततळी तयार करण्यात आली़

ठळक मुद्देतुटपुंजे अनुदान असल्याने मर्यादा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष

उस्मानाबाद : शासनाच्या वतीने जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या मागेल त्याला शेततळे या योजनेंतर्गत गत तीन वर्षात तब्बल २५०० शेततळी तयार करण्यात आली़ मात्र, या शेततळ्यावरील महत्त्वाचा भाग असलेल्या अस्तरीकरणाचे काम केवळ २३७ शेततळ्यांचे झाले आहे़ अपुरे अनुदान आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे ही कामे अपूर्ण दिसत आहेत़

शेतकयांना सतत दुष्काळाला तोंड द्यावे लागत असल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहेत़ पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे़ त्याचा पिकांवर परिणाम होत आहे़ शेती उत्पादनात शाश्वतता आणण्यासाठी तसेच नैसर्गिक दुष्काळावर मात करण्यासाठी राज्य सरकारने मागेल त्याला शेततळे योजना राबविली आहे़ प्रत्येक शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत शेततळे योजनेचा लाभ देण्यात येतो़ परंतु कागदाची जुळवाजुळव, अटी, नियमांनमुळे अनेक शेतकरी हैराण होतात़ त्यातच शेतकऱ्यांना कृषी विभागातर्फे ५० हजार व प्लास्टिक अस्तरीकरण ७५ हजार असे मिळून १ लाख २५ हजार रुपयांपर्यंत मागेल त्याला शेततळे देण्याची योजना आहे़

राष्ट्रीय कृषी विकास योजना व राष्ट्रीय फलोत्पादन अभियान या अंतर्गत शेतकºयांना वयक्तिक शेततळे अस्तरीकरण योजना दिली होती़ मात्र आॅनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर अनेक शेतक-यांना कार्यारंभ आदेश देण्यात आला. परंतु या योजनेचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र आहे़ गेल्या तीन वर्षात जिल्ह्यात ३७०० शेततळ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते़ त्यापैकी अद्यापर्यंत २ हजार ५२० शेततळी पूर्ण झाल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे़ त्या शेततळ्यापैकी वैयक्तिक शेततळ्यामध्ये आजवर केवळ २३७ शेतकऱ्यांनीच अस्तरीकरण केल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीOsmanabadउस्मानाबाद