शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

उस्मानाबादच्या अतिवृष्टीग्रस्तांसाठी आले 148 कोटी; दिवाळीपूर्वीच होणार वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2020 9:40 PM

अतिवृष्टीने जिल्ह्यात 2 लाख 62 हजार हेक्टर्स शेती पिकांचे नुकसान झाले होते.

ठळक मुद्देशासनाकडे 267 कोटी 57 लाख रुपयांची मागणीपहिल्या टप्प्यात नुकसान भरपाईपोटी 148 कोटी 38 लाख रुपये एकूण 4 लाख 6 हजार 447 शेतकऱ्यांना ही मदत मिळणार

- चेतन धनुरे

उस्मानाबाद : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्याच्या मध्यात झालेल्या नुकसानीपोटी शासनाने सोमवारी पहिला टप्पा वर्ग केला आहे.  यात १४८ कोटी रुपये देण्यात आले असून, दिवाळीपूर्वीच त्याचे वितरण सुरू होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली.

अतिवृष्टीने जिल्ह्यात 2 लाख 62 हजार हेक्टर्स शेती पिकांचे नुकसान झाले होते. शिवाय, मनुष्य, पशुधन मृत्यू, घरांची पडझड असेही नुकसान झाले आहे. एसडीआरएफच्या निकषानुसार प्रशासनाने तातडीने पंचनामे पूर्ण करून शासनाकडे 267 कोटी 57 लाख रुपयांची मागणी केली होती. दरम्यान, शासनाने सोमवारी नुकसान भरपाईपोटी 148 कोटी 38 लाख रुपये जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केले आहेत. हा पहिला टप्पा असून, दुसऱ्या टप्प्यात आणखी मदत येणार आहे. एकूण 4 लाख 6 हजार 447 शेतकऱ्यांना ही मदत मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी कौतुभ दिवेगावकर यांनी सांगितले.

कोणासाठी किती मिळणार मदत?एसडीआरएफच्या निकषानुसार कोरडवाहू पिकासाठी हेक्टरी 6800 रुपये, बागायतीसाठी 18000 रुपये मदत मिळते. शासनाने यात आपलाही वाटा घालून कोरडवाहूसाठी प्रति हेक्टरी 10000 तर बागायतीसाठी 25000 रुपये देण्याचे निश्चित केले आहे. ही मदत 2 हेक्टरच्या मर्यादेतच मिळणार आहे.

याना मिळतील इतके...मृत पशुधनासाठी मागणीइतकेच 38 लाख 55 हजार रुपये, मयत व्यक्ती, घरांची, गोठ्याची पडझड, संसारोपयोगी साहित्य यासाठी मागणीनुसार 2 कोटी 47 लाख रुपये, खरडून गेलेल्या जमिनीसाठी 11 कोटी 86 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तर कोरडवाहू व बागायती पिकांसाठी जवळपास 202 कोटी रुपयांची मागणी होती, त्यापैकी पहिल्या टप्प्यात 91 कोटी रुपये मंजूर करून ते वर्ग केले आहेत. वाढीव मदतीसाठी शासनाने 42 कोटी 61 लाख रुपयांची आपल्या निधीतून तरतूद केली आहे.

टॅग्स :fundsनिधीOsmanabadउस्मानाबाद