शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

सोनभद्र नरसंहार प्रकरणी योगी आदित्यनाथ यांची मोठी कारवाई;  डीएम, एसपींना हटवले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2019 6:26 PM

हत्याकांडात दहा आदिवासी शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता.

ठळक मुद्देदोन्ही अधिकाऱ्यांविरोधात विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. .1952 पासून दीर्घकाळापर्यंत काँग्रेसच्या काळात समिती बनवून ग्रामसभेच्या जमिनीवर कब्जा करण्याचा खेळ खेळला गेला. या प्रकरणी आतापर्यंत मुख्य आरोपी असलेल्या ग्रामप्रधानासह 24 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सोनभद्र (उत्तर प्रदेश) - सोनभद्र जिल्ह्यातील उंभा येथे झालेल्या नरसंहारप्रकरणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीचा अहवाल आल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोनभद्रचे एसपी सलमान ताज पाटील आणि डीएम अंकीत अग्रवाल यांना तत्काळ प्रभावाने पदावरून हटवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच दोन्ही अधिकाऱ्यांविरोधात विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. सोनभद्र जिल्ह्यातील उंभा येथे जमिनीच्या वादातून झालेल्या हत्याकांडात दहा आदिवासी शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज जमिनीच्या वादातून नरसंहार झालेल्या सोनभद्रमधील उंभा गावाला भेट दिली. त्यानंतर संवाद सधताना सांगितले की, उंभ हत्याकांड प्रकरणी डीएम, एसपी यांच्याबरोबरच आतापर्यंत एक एएसपी, तीन सीओ, महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत सात राजपत्रित आणि आठ बिगर राजपत्रित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली आहे." 

दरम्यान, याप्रकरणी 1952 पासून आतापर्यंत जे दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.1952 पासून दीर्घकाळापर्यंत काँग्रेसच्या काळात समिती बनवून ग्रामसभेच्या जमिनीवर कब्जा करण्याचा खेळ खेळला गेला. यामध्ये अनेक बडे अधिकारी आणि नेते सहभागी होते. मिर्झापूर आणि सोनभद्रमध्ये खोटी सोसायटी बनवून 1 लाख हेक्टर जमिनीवर कब्जा करण्यात आला होता. आता या प्रकरणी एक समिती बनवण्यात आली असून, ती अशा प्रकरणांची चौकशी करेल, असेही योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. सोनभद्र जिल्ह्यातील उंभा येथे जमिनीच्या वादातून दहा आदिवासी शेतकऱ्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आतापर्यंत मुख्य आरोपी असलेल्या ग्रामप्रधानासह 24 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथSonbhadra Shootoutसोनभद्र हत्याकांडUttar Pradeshउत्तर प्रदेश