शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

सूत जुळलं! ...म्हणून सुनेने नवऱ्याला सोडलं आणि थेट सासऱ्यासोबत लग्न केलं अन्...; नातेवाईक हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 11:13 IST

Crime News : एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर सुनेसोबतच लग्नगाठ बांधली आहे

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या बदायू जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर सुनेसोबतच लग्नगाठ बांधली आहे. धक्कादायक बाब म्हणजे स्वतःच्या दोन्ही मुलांना सोडून तो शहरात आपल्या सुनेसोबत राहू लागला. जेव्हा मुलांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला तेव्हा हे प्रकरण समोर आलं. मोठ्या मुलाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला. उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बदायू जिल्ह्यात ही भयंकर घटना घडली आहे. या घटनेने सर्वच जण हैराण झाले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, बदायू जिल्ह्यातील कस्बा बिसौली गावातील दबतरा येथील रहिवासी असलेल्या 45 वर्षीय देवानंद याच्या पत्नीचं 2015 मध्ये निधन झालं. यावेळी देवानंदचं वय 39 वर्ष होतं. देवानंदच्या नातेवाईकांनी त्याला दुसरं लग्न करण्याचं सुचवलं. मात्र, देवानंदनं त्यावेळी आपला 15 वर्षीय मुलगा सुमित याचा विवाह करण्याचा निर्णय घेतला आणि 2016 मध्ये सुमितचं लग्न लावण्यात आलं. लग्नानंतर सहा महिन्यातच सुमित आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद होऊ लागले. याच कारणामुळे दोघांमध्ये दुरावा आला. याच दरम्यान सुमितच्या पत्नीची आपल्या सासऱ्यासोबत जवळीक वाढली.

2017 साली वडील देवानंद यांच्या एका निर्णयामुळे सुमितचं संपूर्ण आयुष्यच बदललं. देवानंदने सुमितच्या पत्नीसोबत कोर्ट मॅरेज केलं आणि दोघंही संभल जिल्ह्यात जाऊन राहू लागले. या दोघांना एक मुलगाही झाला, तो सध्या एक वर्षाचा आहे. मात्र, या काळात देवानंदनं आपल्या मुलांची जबाबदारीही घेतली होती. सुमितला दारू आणि जुगाराची सवय होती आणि यासाठी लागणारे पैसे तो देवानंद यांच्याकडूनच घेत असे. मात्र, काही काळानंतर त्यांनी मुलाला पैसे देणं बंद केलं. यानंतर वकीलांच्या म्हणण्यानुसार, सुमितनं RTI च्या माध्यमातून आपल्या वडिलांच्या पगारासंबंधीची माहिती मागितली.

 

आपली पत्नी हरवल्याने त्याने तिला शोधण्यासाठी पोलिसांतही मदत मागितली.पोलिसांनी याप्रकरणी तपास करताना देवानंद आणि त्याचा मुलगा सुमित यांना ठाण्यात बोलावलं. ठाण्यात सुमित पैसे आणि आपला सांभाळ वडिलांनी करावा अशी मागणी करू लागला. याच कारणामुळे दोघांमध्ये वादही झाले. यानंतर पंचायत बोलावण्यात आली, यात सुमितच्या पत्नीनं आपल्याला सासऱ्यासोबतच राहायचं असल्याचं सांगितलं. तिनं म्हटलं की सासराच तिचा पती असून त्यांनी कोर्ट मॅरेजही केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस