शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

पतीचं दुसरं लग्न थांबवण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर जाऊन बसली पत्नी आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 12:00 IST

Kanpur : पोलीस स्टेशनमधून कारवाईला वेळ लागत असल्याने महिला आपल्या आईसोबत तिथेच रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या करण्यासाठी बसली. जे बघून पोलिसांचे धाबे दणाणले.

कानपूरमध्ये (Kanpur) पतीचं दुसरं लग्न रोखण्यासाठी एका पत्नीने जे केलं ते वाचून तुम्ही हैराण व्हाल. पोलीस स्टेशनमधून कारवाईला वेळ लागत असल्याने महिला आपल्या आईसोबत तिथेच रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या करण्यासाठी बसली. जे बघून पोलिसांचे धाबे दणाणले.

ही घटना कानपूरच्या कल्याणपूरमधील आहे. इथे पती अभिषेकचं दुसरं लग्न रोखण्यासाठी पत्नी साक्षी पोलीस स्टेशनसमोरील रेल्वे ट्रॅकवर बसली आणि म्हणाली की, जर तिच्या पतीला पोलिसांनी दुसरं लग्न करण्यापासून रोखलं नाही तर ती तिच्या आईसोबत रेल्वेखाली जीव देईल. 

जे पोलिसवाले आधी तिचं काही ऐकून घेण्यास कानाडोळा करत होते. ते लगेच खळबळून जागे झाले आणि महिलेला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. त्यांनी तक्रारीवर लगेच कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर पोलीस तिच्या पतीचं दुसरं लग्न रोखण्यासाठी घाईघाईने मंदिरात गेले. अशात नवरीला जसं समजलं की तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं आधीही लग्न झालं आहे. तिने लगेच लग्नास नकार दिला.

साक्षीने सांगितलं की, ती मुरादाबादची राहणारी आहे आणि २०१६ मध्ये लखीमपूर खीरीच्या अभिषेकसोबत तिचं लग्न झालं होतं. महिलेचा आरोप आहे की, लग्नाच्या काही दिवसांनंतर हुंड्यात गाडी आणि पैशांच्या मागणीवरून पतीने मारहाण सुरू केली. काही दिवसांनी त्याने तिला घरातून काढलंही होतं.

साक्षीने सांगितलं की, तिला दोन दिवसांआधीच माहिती मिळाली होती की, पती अभिषेक ८ फेब्रुवारीला दुसरं लग्न करणार आहे. आणि हे लग्न कल्याणपूरच्या आशा मंदिरात होणार आहे.

याप्रकरणी एडीसीपी ब्रजेश श्रीवास्तव यांनी सांगितलं की, महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी दुसऱ्या तरूणीच्या परिवाराशी चर्चा केली. त्यांना आरोपी अभिषेकच्या पहिल्या लग्नाबाबत सूचना दिली. त्यानंतर तरूणीने लग्न करण्यास नकार दिला. आता साक्षीला या प्रकरणात कोणताही कारवाई नको आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीmarriageलग्न