शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

प्रियकराच्या मदतीने 'तिने' पतीचा काटा काढला मग खीर खाल्ली, करवा चौथचा उपवासही ठेवला अन्..

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 15:25 IST

रीमा नावाच्या महिलेने प्रियकर भागेंद्र याच्यासोबत मिळून पतीची हत्या केली. हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव पवन असं आहे.

राजस्थानच्या भरतपूरमध्ये पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीची निर्घृण हत्या केली आहे. यानंतर आता महिलेने पोलिसांसमोर धक्कादायक खुलासा केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 मे 2022 रोजी रीमा नावाच्या या महिलेने प्रियकर भागेंद्र याच्यासोबत मिळून पतीची हत्या केली. हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव पवन असं आहे. धक्कादायक बाब म्हणजे हत्या केल्यानंतर त्यांनी पवनचा मृतदेह पलंगावर ठेवला. त्यानंतर तिने स्वयंपाक घरात जाऊन पूरी, भाजी आणि खीर बनवली. भागेंद्रसोबत तिने जेवण केलं. 

रात्री पवनचा मृतदेह कालव्यात फेकला. रीमाने सहा महिने पतीच्या हत्येची घटना लपवून ठेवली होती. कोणाला संशय येऊ नये म्हणून रीमाने 13 ऑक्टोबरला पवनसाठी करवा चौथचा उपवासही ठेवला. संशयावरून पवनच्या वडिलांनी आपला मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली तेव्हा ही बाब उघडकीस आली. 4 जून 2022 रोजी पवनचे वडील हरिप्रसाद यांनी चिकसाणा पोलीस ठाण्यात मुलगा हरवल्याची तक्रार नोंदवली. पोलीस आणि कुटुंबीय पवनचा शोध घेत होते. मात्र, त्याचा कुठेही पत्ता लागला नाही. 

16 ऑक्टोबरच्या रात्री सासरच्यांनी सुनेला प्रियकरासह रंगेहात पकडले. संशयाच्या आधारे सासरच्या मंडळींनी सून आणि तिच्या प्रियकरावर खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी पवनची पत्नी रीमा आणि तिचा प्रियकर भागेंद्र यांना संशयाच्या आधारे अटक केली. चौकशीत रीमाने प्रियकरासह पतीची हत्या करून मृतदेह कालव्यात फेकल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपी महिला आणि तिच्या प्रियकराला कालव्याजवळ नेले. त्यानंतर मृतदेह शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांना मृत पवनची पँट, आधारकार्ड आणि काही हाडं सापडली आहेत.

पोलिसांच्या चौकशीत रीमाने हत्येची संपूर्ण कहाणी सांगितली. ती कानपूरची रहिवासी आहे. 3 जून 2015 रोजी तिचे नौह गावातील पवनसोबत लग्न झाले. दोघांना लग्नानंतर एक मुलगा आणि मुलगी झाली. ज्यांचे वय 6 आणि 4 वर्षे आहे. पवन शर्मा गावातच दुकान चालवायचा. रीमाने सांगितले की, याचदरम्यान तिचे शेजारी राहणाऱ्या 27 वर्षीय भागेंद्र उर्फ भोला याच्यावर प्रेम जडलं. दोघांमध्ये लग्नबाह्य संबंध सुरूच होते. त्यानंतर 29 मेच्या रात्री ती प्रियकर भागेंद्रसोबत पळून जात असताना पवनने दोघांना रंगेहाथ पकडले. यानंतर तिने प्रियकरासह पतीची हत्या केली. 

रीमाने पवनचा मृतदेह बेडवर ठेवला आणि किचनमध्ये जाऊन जेवणासाठी पुरी-भाजी आणि खीर केली. त्यानंतर भगेंद्रसोबत जेवण करून रात्रीच मृतदेह जवळच्या कालव्यात फेकून दिला. पतीची हत्या सर्वांपासून लपवून ठेवली. पवन आता या जगात नाही हे तिने आपल्या सासरच्यांनाही कळू दिले नाही. पवन बेपत्ता झाला असावा असे लोकांना वाटू लागले. त्यामुळे सासरच्यांनी 4 जून रोजी पवन बेपत्ता झाल्याची तक्रारही दाखल केली होती. रीमाने सांगितले की, ती नेहमी मंगळसूत्र घालायची आणि भांगेत कुंकू भरायची, जेणेकरून लोक तिच्यावर कधीच संशय घेणार नाहीत. 13 ऑक्टोबरला तिने पवनसाठी करवा चौथचा उपवासही ठेवला होता. भरतपूरचे पोलीस अधीक्षक श्याम सिंह यांनी सांगितले की, सध्या दोन्ही आरोपींची चौकशी सुरू आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी