शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

काय आश्चर्य! कॉल गर्ल म्हणून आलेली 'ती' पत्नीच निघाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2020 18:47 IST

पतीचा ‘तिला’ फोन : दोघांनीही दिला एकमेकांना चोप, लोकांची तोंडात बोटे

ठळक मुद्देर्फ बांधून असलेली एक महिला फोनवर बोलत असल्याचे पाहून पतीदेव तिच्यापर्यंत पोहोचला. २२ जानेवारीचा दिवस या दाम्पत्यासाठी धक्कादायक आणि आयुष्याची दिशा बदलविणारा ठरला.

अमरावती - ऐकावे ते नवलच, असे म्हणण्याची वेळ यावी अशी एक घटना बुधवारी अमरावती शहरात उघडकीस आली. नागरिकांमध्ये ती घटना प्रचंड उत्सुकतेचा विषय तर ठरलीच, परंतु सामाजिक जीवनाचा आलेख किती रसातळाला जातो आहे, हेही त्यातून अधोरेखित झाले. त्याचे झाले असे की, शहरातील उच्चभ्रू वस्तीतील एक ३८ वर्षीय पुरुष आणि ३४ वर्षीय महिलेचा आनंदाने संसार सुरू होता. बुधवार, २२ जानेवारीचा दिवस या दाम्पत्यासाठी धक्कादायक आणि आयुष्याची दिशा बदलविणारा ठरला.

बुधवारी सकाळी पत्नी पतीसोबत लाघवीपणे बोलत मैत्रिणीच्या लग्नात जायचे आहे, सायंकाळपर्यंत घरी परतेन, असे सांगून घरून निघाली. कुठलीही आडकाठी न घेता पतीरायानेही पत्नीला त्यासाठी संमती दिली. खरे तर पत्नी कधी घरून बाहेर पडते, याची पतीदेव प्रतीक्षाच करीत होते. पत्नी घरातून बाहेर गेल्याचे पाहून पतीने तात्काळ मित्राला कॉल केला. त्याच्याकडून एका कॉल गर्लचा मोबाइल क्रमांक मिळविला. तिला नियमित क्रमांकावरून त्याने संपर्क साधला. कॉल गर्लने कॉल स्वीकारला. केव्हा आणि कुठे यायचे, हे ठरले. त्यानंतर काही वेळातच कॉल गर्लचा पुन्हा कॉल आला. निश्चित पत्त्याबाबत ती विचारणा करीत होती.  तिला पत्ता माहिती नसल्याचे समजून पतीदेवाने एक लँडमार्क भेटण्याचे ठिकाण ठरविले. वर्दळीचे ते ठिकाण आहे. दोघेही तेथे पोहोचले. एकमेकांचा शोध सुरू केला. स्कार्फ बांधून असलेली एक महिला फोनवर बोलत असल्याचे पाहून पतीदेव तिच्यापर्यंत पोहोचला. काय आश्चर्य! कॉल गर्ल म्हणून आलेली ती त्याची पत्नीच निघाली.

व्हॉट्स अ‍ॅपवरुन पतीनं बोलावलेली कॉल गर्ल निघाली त्याचीच पत्नी

दोघांमध्ये घमासान सुरू झाले. पत्नीच्या अशा वागण्यावर पतीने जोरदार आक्षेप घेतला. या कारणानेच तुम्ही मला बाहेर जाऊ दिले, असा आक्षेप पत्नीनेही नोंदविला. लोक जमले होते. गर्दी वाढत होती. दोघांमध्ये काय घडले, हे एव्हाना त्यांच्याच भांडणातून स्पष्ट झाले. कुणीच मागे हटत नव्हते. उपस्थितही वाद मिटविण्याऐवजी त्याचा आनंद घेत होते. दोघांचाही राग वाढत गेला. पतीने पत्नीचे केस ओढून तिला मारहाण केली. पत्नीनेही पतीला थापडांचा प्रसाद दिला. उच्चभ्रू वस्तीत भर रस्त्यावरील हे नाट्य ज्या कारणासाठी घडत होते, त्या कारणावर अनेकांचा विश्वासच बसेना. मारून मारून दमल्यावर अखेर दोघेही घराच्या दिशेने निघून गेले. शाब्दिक चकमक मात्र जातानाही सुरूच होती. वृत्त लिहिस्तोवर या घटनेची कुठेही तक्रार झालेली नव्हती.

टॅग्स :AmravatiअमरावतीPoliceपोलिस