शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

हत्या की आत्महत्या? एकाच घरातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू, परिसरात खळबळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2020 15:54 IST

Crime News : घरामध्ये पाच जणांचे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असतानाच अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. परिस्थितीला कंटाळून काही जणांनी टोकाचं पाऊल उचल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. याच दरम्यान एकाच घरातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची भयंकर घटना घडली आहे. घरामध्ये पाच जणांचे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यामधील गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. एकाच घरातील पाच जणांचे मृतदेह संशयास्पद पद्धतीने सापडल्यामुळे हत्या की आत्महत्या याचा सध्या तपास सुरू आहे. या मृत्यू प्रकरणामुळे पश्चिम बंगाल हादरलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत्यू झालेल्यांमध्ये दोन लहान मुलं आणि दोन महिलांचा समावेश आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

जालपूर गावातील एका घरात पाच जणांचे मृतदेह मिळाले. एका व्यक्तीचा मृतदेह हा गळफास घेतलेल्या अवस्थेत होता. तर इतर व्यक्तींच्या डोक्यावर जखम असलेली पाहायला मिळाल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. पोलिसांनीआत्महत्या नसून हत्या असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला आहे. एकंदरी घरातील अवस्था आणि मृतदेह पाहून पाचही जणांची हत्या झाल्याचं म्हटलं आहे. 

पोलिसांनी पाचही मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. याआधी काही दिवसांपूर्वी गुजरातच्या अहमदाबादमध्ये देखील एकाच कुटुंबातील सहा जणांचे मृतदेह सापडले होते. सहा जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिसSuicideआत्महत्या