शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

आम्हाला वैभवशी व्यवस्थित बोलूच दिले नाही; वैभव राऊत यांचा पत्नीचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 21:17 IST

वैभवला आज का व कशासाठी घेऊन आले होते कळले नाही असे वैभवाची पत्नी लक्ष्मी यांनी सांगितले. त्यांनी गाडीचे इन्शुरन्स पेपर सोबत घेऊन गेले. 

मुंबई - नालासोपारा येथील भंडारअळी गावात वैभव राऊतच्या घरी महाराष्ट्र दहशतवादी पथकाने (एटीएस) गेल्या शुक्रवारी कारवाई करून बाॅम्ब व स्फोटके जप्त केल्याचा दावा केला होता. त्यानंतर राज्यभरात सनातन संस्थेशी संबंधीत वैभवसोबत काही व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले होते. शुक्रवारी वैभव राऊतला न्यायालयाने १८ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. वैभव राऊतवर करण्यात आलेली कारवाई संशयास्पद असल्याबद्दल चर्चा होत आहे. मात्र, आज दुपारी ३ वाजता एटीएसने अचानक एसआरपी व लोकल पोलिसांना सोबत घेत वैभवला त्याच्या भंडारआळीतील त्याच्या निवासस्थानी पुन्हा चौकशीसाठी आणले होते.यावेळी साधारण ५० मिनीटे त्याची चौकशी करण्यात आली. त्यानंतर पोलीसांनी त्याची इंनोवा गाडी (एमएच ४८, एके २६२६) जप्त केली. त्यावेळी वैभवला त्याच्या कुटुंबियांसोबत बातचीत करण्यास दिली. मात्र, वैभवला आज का व कशासाठी घेऊन आले होते कळले नाही असे वैभवाची पत्नी लक्ष्मी यांनी सांगितले. त्यांनी गाडीचे इन्शुरन्स पेपर सोबत घेऊन गेले. वैभवशी आम्हाला व्यवस्थितपणे बोलूही दिले नाही असा आरोप लक्ष्मी यांनी केला आहे. गोरक्ष संरक्षक असलेला वैभव राऊत याचे सनातन संस्थेशी संबंध असल्याचे तसेच त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात स्फोटके असल्याच्या संशयावरून त्याच्या नालासोपारा येथील भंडारआळीतील निवासस्थानी एटीएसने गेल्या आठवड्यात मोठी कारवाई केली होती. मात्र, आज दुपारी पुन्हा ३ वाजता एटीएसच्या अधिकाऱ्यांनी वैभवला त्याच्या घरी तोंडावर बुरखा घालून चौकशीसाठी आणले होते. यावेळी परिसरात एसआरपी व लोकल पोलीसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.वैभव राऊतला बुधवारी दुपारी ३ वाजता चौकशीसाठी त्याच्या निवासस्थानी आणण्यात आले होते. त्याच्या पहिल्या मजल्यावरील रूममध्ये जवळपास ५० मिनिटे त्याची चौकशी करण्यात आली. वैभवला घरी आणल्याची बातमी वाऱ्यासारखी नालासोपारा व  वसई-विरार शहरात पसरली. काही वेळातच हजारोंच्या संख्येने गावकऱ्यांनी वैभवच्या घराबाहेर गर्दी केली होती. ३ वाजून ५० मिनीटांनी वैभवला बुरखा घालून पोलीसांनी त्याला घराबाहेर आणले. यावेळी उपस्थित लोकांनी वैभवचा बुरखा काढा.आम्हाला त्याच्याशी बोलायचे आहे. असा आग्रह केला. बुरख्याआड वैभव नाही असा संशयही काही जणांनी व्यक्त केला. मात्र, पोलिसांनी लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत वैभवला घराजवळील चिंचोळ्या गल्लीतून घरामागील पोलीसांच्या गाडीत नेऊन बसवले. त्यानंतर काही वेळातच एटीएस, पोलीस  व एसआरपी वैभवला घेऊन निघून गेले.

टॅग्स :Crimeगुन्हाMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्रAnti Terrorist Squadदहशतवाद विरोधी पथकPoliceपोलिसVasai Virarवसई विरार