शहरं
Join us  
Trending Stories
1
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
2
"खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
3
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
4
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
5
मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
6
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
7
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
8
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
9
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
10
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
11
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
12
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
13
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
14
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
15
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
16
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
17
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
18
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
19
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
20
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?

आम्हाला वैभवशी व्यवस्थित बोलूच दिले नाही; वैभव राऊत यांचा पत्नीचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 21:17 IST

वैभवला आज का व कशासाठी घेऊन आले होते कळले नाही असे वैभवाची पत्नी लक्ष्मी यांनी सांगितले. त्यांनी गाडीचे इन्शुरन्स पेपर सोबत घेऊन गेले. 

मुंबई - नालासोपारा येथील भंडारअळी गावात वैभव राऊतच्या घरी महाराष्ट्र दहशतवादी पथकाने (एटीएस) गेल्या शुक्रवारी कारवाई करून बाॅम्ब व स्फोटके जप्त केल्याचा दावा केला होता. त्यानंतर राज्यभरात सनातन संस्थेशी संबंधीत वैभवसोबत काही व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले होते. शुक्रवारी वैभव राऊतला न्यायालयाने १८ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. वैभव राऊतवर करण्यात आलेली कारवाई संशयास्पद असल्याबद्दल चर्चा होत आहे. मात्र, आज दुपारी ३ वाजता एटीएसने अचानक एसआरपी व लोकल पोलिसांना सोबत घेत वैभवला त्याच्या भंडारआळीतील त्याच्या निवासस्थानी पुन्हा चौकशीसाठी आणले होते.यावेळी साधारण ५० मिनीटे त्याची चौकशी करण्यात आली. त्यानंतर पोलीसांनी त्याची इंनोवा गाडी (एमएच ४८, एके २६२६) जप्त केली. त्यावेळी वैभवला त्याच्या कुटुंबियांसोबत बातचीत करण्यास दिली. मात्र, वैभवला आज का व कशासाठी घेऊन आले होते कळले नाही असे वैभवाची पत्नी लक्ष्मी यांनी सांगितले. त्यांनी गाडीचे इन्शुरन्स पेपर सोबत घेऊन गेले. वैभवशी आम्हाला व्यवस्थितपणे बोलूही दिले नाही असा आरोप लक्ष्मी यांनी केला आहे. गोरक्ष संरक्षक असलेला वैभव राऊत याचे सनातन संस्थेशी संबंध असल्याचे तसेच त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात स्फोटके असल्याच्या संशयावरून त्याच्या नालासोपारा येथील भंडारआळीतील निवासस्थानी एटीएसने गेल्या आठवड्यात मोठी कारवाई केली होती. मात्र, आज दुपारी पुन्हा ३ वाजता एटीएसच्या अधिकाऱ्यांनी वैभवला त्याच्या घरी तोंडावर बुरखा घालून चौकशीसाठी आणले होते. यावेळी परिसरात एसआरपी व लोकल पोलीसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.वैभव राऊतला बुधवारी दुपारी ३ वाजता चौकशीसाठी त्याच्या निवासस्थानी आणण्यात आले होते. त्याच्या पहिल्या मजल्यावरील रूममध्ये जवळपास ५० मिनिटे त्याची चौकशी करण्यात आली. वैभवला घरी आणल्याची बातमी वाऱ्यासारखी नालासोपारा व  वसई-विरार शहरात पसरली. काही वेळातच हजारोंच्या संख्येने गावकऱ्यांनी वैभवच्या घराबाहेर गर्दी केली होती. ३ वाजून ५० मिनीटांनी वैभवला बुरखा घालून पोलीसांनी त्याला घराबाहेर आणले. यावेळी उपस्थित लोकांनी वैभवचा बुरखा काढा.आम्हाला त्याच्याशी बोलायचे आहे. असा आग्रह केला. बुरख्याआड वैभव नाही असा संशयही काही जणांनी व्यक्त केला. मात्र, पोलिसांनी लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत वैभवला घराजवळील चिंचोळ्या गल्लीतून घरामागील पोलीसांच्या गाडीत नेऊन बसवले. त्यानंतर काही वेळातच एटीएस, पोलीस  व एसआरपी वैभवला घेऊन निघून गेले.

टॅग्स :Crimeगुन्हाMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्रAnti Terrorist Squadदहशतवाद विरोधी पथकPoliceपोलिसVasai Virarवसई विरार