शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मुलगी विकत घ्यायची आहे? मुलींना फसविण्याचे असेही रॅकेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2023 10:23 IST

कधी नोकरीचे आमिष दाखवून... कधी सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करत त्यांना भेटायला बोलवायचे आणि मग सुरू होतो एक भयानक खेळ... मुलींचे अपहरण करायचे... लग्नासाठी मुलगी हवी असलेल्या कुटुंबाला त्यांची विक्री करायची आणि बळजबरीने तिचे लग्न लावायचे... मुंबईत आणि महाराष्ट्रात अशी अंगावर काटा आणणारी प्रकरणे उघडकीस आली आहेत.

आशिष सिंह, विशेष प्रतिनिधीलासोपारा (पालघर) येथील अल्पवयीन मुलीशी सोशल मीडियावर मैत्री केली. स्वत:ला सैन्यदलातील अधिकारी असल्याचे सांगत तिला भेटायला बोलावले आणि तिचे अपहरण करत राजस्थानमध्ये तिला लग्नासाठी विकले गेले. कुरारमधील (मुंबई) मुलीला राजस्थानमध्ये मोठा इव्हेंट असल्याचे सांगत केटरिंगच्या कामासाठी नेले आणि अपहरण केले... किंवा शाळकरी मुलीला नशेचे डोस देऊन तिची राजस्थानमध्ये विक्री करणे असो... या सर्व प्रकरणांत एक समान धागा आहे. 

मुलींचे अपहरण करून त्यांना राजस्थान किंवा हरयाणात न्यायचे. वेश्या व्यवसायात ढकलण्याची धमकी देऊन तिचे शोषण करायचे आणि लग्नासाठी मुलगी हवी असलेल्या एखाद्या कुटुंबाला बळजबरीने तिला विकायचे. खरेदी-विक्री होणाऱ्या या मुलींना स्थानिक भाषेत ‘पारो’ म्हटले जाते. लाख-दोन लाखांत एजंटांकडून त्यांना खरेदी केले जाते. लग्नासाठी मुलगी न मिळणाऱ्या तरुणाशी तिचे लग्न लावून दिले जाते. 

राजस्थान आणि हरयाणात काही कुटुंबातील मुलांची लग्न जुळत नाहीत. त्यामुळे नाइलाजाने ते पैसे देऊन आपल्या मुलाचे लग्न बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा, आसाम, झारखंड, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातून अपहरण केलेल्या मुलींशी लावून देतात.  

मुंबई, महाराष्ट्रातून अपहरण केलेल्या काही मुली पोलिसांनी शोधल्यानंतर मिळाल्या, मात्र त्या पूर्ण खचून गेलेल्या होत्या. देशभरात सुरू असलेल्या या अनैतिक व्यवसायातील अनेक मुलींचा शोध अजून लागलेला नाही. त्या कुठे असतील?

मुलींना फसविण्याचे असेही रॅकेट- एजंट, सोशल मीडियावर बनावट प्रोफाईल तयार करतात. ते अकाऊंट खूप काळापासून ॲक्टिव्ह असल्याचे दाखवितात. मग सुरू होतो खेळ. - देशातील वेगवेगळ्या शहरांतील सुंदर मुलींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायची. मैत्री करायची, भेटायला बोलवायचे. काहींना नोकरीचे आमिष दाखवायचे, अपहरण करून त्यांना विकायचे. - काही एजंट तर गरीब मुलींशी लग्न करून त्यांना राजस्थान किंवा हरयाणाला घेऊन जातात आणि त्यांची विक्री करतात, त्यांचे बळजबरीने लग्न लावून देतात. 

एजंटच महत्त्वाचा !- राजस्थान आणि हरयाणातील या खरेदी-विक्री व्यवहाराला ‘पारो बिझनेस मॉडेल’ म्हणतात.- हे मॉडेल एखाद्या कॉर्पोरेट बिझनेस मॉडेलप्रमाणेच कार्यरत आहे. यात एजंटची भूमिका महत्त्वाची असते.- मुलीचे अपहरण केल्यानंतर एजंट तिला आपल्याकडेच बंदिस्त ठेवतात. मुलींचे शारीरिक शोषण केले जाते. - वेश्या व्यवसायात ढकलण्याची त्यांना धमकी दिली जाते. दरम्यान, त्यांचे मानसिक आणि शारीरिक शोषण केले जाते. - या मुली मनाने खचून जातात. पुन्हा कुटुंबाला कसे भेटणार, असा प्रश्न त्यांना सतावतो. त्या स्वत:ला अपराधी समजतात. - एजंटचे त्यातून अर्थातच फावते आणि तो लग्नासाठी मुलगी हवी असलेल्या कुटुंबाला त्यांची विक्री करतात. - लग्नाला तयार न होणाऱ्या मुलींना वेश्या व्यवसायात ढकलले जाते. 

टॅग्स :MolestationविनयभंगRajasthanराजस्थानHaryanaहरयाणाmarriageलग्नMaharashtraमहाराष्ट्र