शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

स्वत:चा मुलगा, बहिणीसह पाच जणांची हत्या करणारा विवेक पालटकरची फाशीची शिक्षा कायम

By राकेश पांडुरंग घानोडे | Published: March 27, 2024 1:49 PM

उच्च न्यायालयाचा बहुप्रतिक्षित निर्णय, घृणास्पद घटनेमुळे नागपूरमध्ये झाली होती खळबळ

राकेश घानोडे, नागपूर: स्वत:चा मुलगा, बहीण, बहिणीचा पती, मुलगी व सासू यांची क्रूरपणे हत्या करणारा विवेक गुलाब पालटकर (४०) याची मरेपर्यंत फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी कायम ठेवली. न्यायमूर्ति विनय जोशी व महेंद्र चांदवाणी यांनी हा बहुप्रतिक्षित निर्णय दिला. या घटनेमुळे नागपूरमध्ये खळबळ उडाली होती.

कृष्णा विवेक पालटकर (५), अर्चना कमलाकर पवनकर (४५), कमलाकर मोतीराम पवनकर (४८), वेदांती कमलाकर पवनकर (१२) व मीराबाई पवनकर (७३) अशी मृतांची नावे आहेत. पवनकर कुटुंब दिघोरीतील आराधनानगर येथे राहत होते. १५ एप्रिल २०२३ रोजी सत्र न्यायालयाने पालटकरला भादंविच्या कलम ३०२ (खून) अंतर्गत मरेपर्यंत फाशी व ५० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास पाच वर्षे अतिरिक्त सश्रम कारावास, अशी शिक्षा सुनावली. फौजदारी प्रक्रिया संहितेमधील कलम ३६६ अनुसार सत्र न्यायालयाने आरोपीला सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेवर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब करणे बंधनकारक आहे. त्यामुळे हा खटला उच्च न्यायालयात दाखल करण्यात आला होता. तसेच, पालटकरने या शिक्षेविरुद्ध अपील दाखल केले होते. त्यावर १८ डिसेंबर २०२३ रोजी अंतिम सुनावणी पूर्ण झाली होती. त्यानंतर निर्णय राखिव ठेवण्यात आला होता. उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवून पालटकरचे अपील फेटाळून लावले. सरकारतर्फे ॲड. संजय डोईफोडे तर, फिर्यादी केशव पवनकरतर्फे ॲड. मो. अतिक यांनी कामकाज पाहिले.------------------अशी घडली घटनाक्रूरकर्मा पालटकरला पत्नीच्या खूनात जन्मठेपेची शिक्षा झाली होती. त्याला न्यायालयातून सोडविण्यासाठी कमलाकर यांचे सुमारे पाच लाख रुपये खर्च झाले होते. त्यामुळे कमलाकर हे पालटकरला पैसे परत मागत होते. पालटकर त्याच्याकडे नवरगाव येथे वडिलोपार्जित दहा एकर शेती असतानाही पैसे परत करत नव्हता. त्यावरून दोघांमध्ये घटनेच्या आठ दिवसांपासून वाद सुरू होता. त्यामुळे पालटकरने कमलाकर व इतरांना कायमचे संपविण्याचा कट आखला. त्यानुसार, तो ११ जून २०१८ रोजी रात्री दहाच्या सुमारास कमलाकर यांच्या घरी गेला. दरम्यान, सर्वांनी सोबत भोजन केले. त्यानंतर घराच्या हॉलमध्ये पालटकर व मीराबाई झोपल्या. बेडरुममध्ये कमलाकर, अर्चना, वेदांती व कृष्णा झोपले. पालटकरची मुलगी वैष्णवी (१२) व कमलाकर यांची मुलगी मिताली (१४) दुसऱ्या खोलीत झोपल्या होत्या. मध्यरात्री एकच्या सुमारास पालटकर जागा झाला. त्याने सैतानासारखे कमलाकर, अर्चना, वेदांती व कृष्णा यांच्या डोक्यावर लोखंडी सब्बलने जबर वार केला. त्यामुळे चौघेही बेडवरच ठार झाले. त्यांचा आवाज ऐकून मीराबाई बेडरुमकडे धावल्या असता पालटकरने त्यांना पकडून स्वयंपाकघरात नेले व त्यांनाही डोक्यावर वार करून ठार मारले. त्यानंतर तो लोखंडी गेटवरून खाली उडी मारून पसार झाला. वैष्णवी व मिताली सुदैवाने बचावल्या.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर