शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

Video : लेकीसाठी आई चक्क चढली एसपी कार्यालयासमोरील झाडावर अन् केला आत्महत्येचा प्रयत्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2020 15:13 IST

ओढणीने गळफास घेण्याचा प्रयत्न : ३० मिनिटाच्या नाट्यानंतर पोलिसांनीच उतरविले

ठळक मुद्देपोलिसांनी झाडावर चढवून या विवाहितेला सुखरुप खाली उतरविल्याने सर्वांच्याच जीवात जीव आला. दरम्यान, याआधी देखील अश्विनी हिने झोपेच्या गोळ्या सेवन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

जळगाव : पती-पत्नीत झालेल्या कौटुंबिक वादातून पती मुलीचा ताबा देत नाही, पोलिसांकडे तगादा लावूनही दखल घेतली जात नाही, त्यामुळे अश्विनी पंकज पाटील (रा.विरवाडे, ता.चोपडा ह.मु.गाढोदा, ता.जळगाव) या विवाहितेने संतापाच्या पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाच्या बाहेरच झाडावर चढून ओढणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी दुपारी दीड ता दोन असे तीस मिनिटे हे नाट्य चालले. पोलिसांनी झाडावर चढवून या विवाहितेला सुखरुप खाली उतरविल्याने सर्वांच्याच जीवात जीव आला. दरम्यान, याआधी देखील अश्विनी हिने झोपेच्या गोळ्या सेवन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनी व पंकज यांचा विवाह सोहळा १ फेब्रुवारी २०१७ रोजी विरवाडे येथे झाला आहे. १० ग्रॅम सोन्याची अंगठी, २० भार चांदी व राजाराणी कपाट व इतर भांडी लग्नात दिले होते. काही दिवसानंतर पंकजच्या नोकरीसाठी २ लाख रुपये आणावे म्हणून छळ करण्यात आला. त्यानंतरही वारंवार पैशासाठी छळ करण्यात आला. नातेवाईकांच्या बैठकीत वाद मिटल्यानंतर पंकज पुणे येथे खासगी नोकरीला लागला. दरम्यानच्या काळात अश्विनीने मुलीला जन्म दिला. पुणे येथेही दोन लाखासाठी छळ झाला. ९ जानेवारी २०२० रोजी अश्विनीचे वडील पुण्यात आले असता तेव्हा सासरच्या लोकांनी त्यांच्याशी हुज्जत घातली. त्यानंतर २ फेब्रुवारी रोजी मुलीला हिसकावून घेत अश्विनीला घराबाहेर हाकलून लावले होते. त्यानंतर अश्विनी माहेरी असताना तिने १८ मे रोजी झोपेच्या गोळ्या सेवन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी दखल घेऊन पती पंकज अशोक पाटील, सासु रेखा अशोक पाटील, सासरे अशोक विश्राम पाटील व जेठ प्रदीप अशोक पाटील (सर्व रा.विरवाडे, ता.चोपडा) यांच्याविरुध्द जळगाव तालुका पोलिसात छळ केल्याचा गुन्हा दाखल केला होता.

पोलीस अधीक्षकांनी भेट नाकारलीपतीकडून मुलीचा ताबा मिळावा म्हणून पोलिसांना सांगून थकलो. न्यायालयातही प्रकरण सुरु आहे. आज पोलीस अधीक्षकांना भेटायला आलो, मात्र त्यांनी भेट नाकारली. त्यामुळे संतापाच्या भरात अश्विनी बाहेर आली व कार्यालयाच्या बाहेर आल्यावर झाडावर चढून गळ्यात रुमाल गुंडाळला. जोपर्यंत मुलीचा ताबा मिळणार नाही, तोपर्यंत झाडाच्या खाली उतरणार नाही, असा पवित्रा घेऊन गळ्यात रुमाल बांधून आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. शेजारील शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाºयांनी तातडीने जिल्हा पेठ पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक अकबर पटेल व रामानंद नगरचे निरीक्षक अनिल बडगुजर यांनी आम्ही तुला न्याय मिळवून देतो असे आश्वासन देऊन खाली उतरण्याची विनंती केली, मात्र तरीही अश्विनी ऐकायला तयार नव्हती. शेवटी शहर वाहतूक शाखेचे फिरोज तडवी या कर्मचाºयाने झाडावर चढून अश्विनीला सुखरुप उतरविले. त्यानंतर तिला व तिच्या आई, वडीलांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

मुंबई पोलिसांकडून सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबावर दबाव; वकीलाने लावला गंभीर आरोप

 

लोअर परेल येथून २१ लाख किंमतीच्या बनावट एन -९५ मास्कचा साठा जप्त

 

स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश

 

...म्हणून बिहार पोलिसांचे पथक मुंबईत धडकल्याने रियाने घेतली सुप्रीम कोर्टात धाव

 

भिवंडीत मित्रांसोबत पोहायला गेलेल्या इसमाचा मृत्यू

टॅग्स :Suicideआत्महत्याJalgaonजळगावPoliceपोलिस