शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

Video : लेकीसाठी आई चक्क चढली एसपी कार्यालयासमोरील झाडावर अन् केला आत्महत्येचा प्रयत्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2020 15:13 IST

ओढणीने गळफास घेण्याचा प्रयत्न : ३० मिनिटाच्या नाट्यानंतर पोलिसांनीच उतरविले

ठळक मुद्देपोलिसांनी झाडावर चढवून या विवाहितेला सुखरुप खाली उतरविल्याने सर्वांच्याच जीवात जीव आला. दरम्यान, याआधी देखील अश्विनी हिने झोपेच्या गोळ्या सेवन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

जळगाव : पती-पत्नीत झालेल्या कौटुंबिक वादातून पती मुलीचा ताबा देत नाही, पोलिसांकडे तगादा लावूनही दखल घेतली जात नाही, त्यामुळे अश्विनी पंकज पाटील (रा.विरवाडे, ता.चोपडा ह.मु.गाढोदा, ता.जळगाव) या विवाहितेने संतापाच्या पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाच्या बाहेरच झाडावर चढून ओढणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी दुपारी दीड ता दोन असे तीस मिनिटे हे नाट्य चालले. पोलिसांनी झाडावर चढवून या विवाहितेला सुखरुप खाली उतरविल्याने सर्वांच्याच जीवात जीव आला. दरम्यान, याआधी देखील अश्विनी हिने झोपेच्या गोळ्या सेवन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनी व पंकज यांचा विवाह सोहळा १ फेब्रुवारी २०१७ रोजी विरवाडे येथे झाला आहे. १० ग्रॅम सोन्याची अंगठी, २० भार चांदी व राजाराणी कपाट व इतर भांडी लग्नात दिले होते. काही दिवसानंतर पंकजच्या नोकरीसाठी २ लाख रुपये आणावे म्हणून छळ करण्यात आला. त्यानंतरही वारंवार पैशासाठी छळ करण्यात आला. नातेवाईकांच्या बैठकीत वाद मिटल्यानंतर पंकज पुणे येथे खासगी नोकरीला लागला. दरम्यानच्या काळात अश्विनीने मुलीला जन्म दिला. पुणे येथेही दोन लाखासाठी छळ झाला. ९ जानेवारी २०२० रोजी अश्विनीचे वडील पुण्यात आले असता तेव्हा सासरच्या लोकांनी त्यांच्याशी हुज्जत घातली. त्यानंतर २ फेब्रुवारी रोजी मुलीला हिसकावून घेत अश्विनीला घराबाहेर हाकलून लावले होते. त्यानंतर अश्विनी माहेरी असताना तिने १८ मे रोजी झोपेच्या गोळ्या सेवन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी दखल घेऊन पती पंकज अशोक पाटील, सासु रेखा अशोक पाटील, सासरे अशोक विश्राम पाटील व जेठ प्रदीप अशोक पाटील (सर्व रा.विरवाडे, ता.चोपडा) यांच्याविरुध्द जळगाव तालुका पोलिसात छळ केल्याचा गुन्हा दाखल केला होता.

पोलीस अधीक्षकांनी भेट नाकारलीपतीकडून मुलीचा ताबा मिळावा म्हणून पोलिसांना सांगून थकलो. न्यायालयातही प्रकरण सुरु आहे. आज पोलीस अधीक्षकांना भेटायला आलो, मात्र त्यांनी भेट नाकारली. त्यामुळे संतापाच्या भरात अश्विनी बाहेर आली व कार्यालयाच्या बाहेर आल्यावर झाडावर चढून गळ्यात रुमाल गुंडाळला. जोपर्यंत मुलीचा ताबा मिळणार नाही, तोपर्यंत झाडाच्या खाली उतरणार नाही, असा पवित्रा घेऊन गळ्यात रुमाल बांधून आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. शेजारील शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाºयांनी तातडीने जिल्हा पेठ पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक अकबर पटेल व रामानंद नगरचे निरीक्षक अनिल बडगुजर यांनी आम्ही तुला न्याय मिळवून देतो असे आश्वासन देऊन खाली उतरण्याची विनंती केली, मात्र तरीही अश्विनी ऐकायला तयार नव्हती. शेवटी शहर वाहतूक शाखेचे फिरोज तडवी या कर्मचाºयाने झाडावर चढून अश्विनीला सुखरुप उतरविले. त्यानंतर तिला व तिच्या आई, वडीलांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

मुंबई पोलिसांकडून सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबावर दबाव; वकीलाने लावला गंभीर आरोप

 

लोअर परेल येथून २१ लाख किंमतीच्या बनावट एन -९५ मास्कचा साठा जप्त

 

स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश

 

...म्हणून बिहार पोलिसांचे पथक मुंबईत धडकल्याने रियाने घेतली सुप्रीम कोर्टात धाव

 

भिवंडीत मित्रांसोबत पोहायला गेलेल्या इसमाचा मृत्यू

टॅग्स :Suicideआत्महत्याJalgaonजळगावPoliceपोलिस