शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

चोरी करण्यासाठी विमानाने जायचे; हायटेक गँगचा पोलिसांनी केला पर्दाफाश, ५ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 15:50 IST

लाखो रुपये किमतीचे चोरीचे दागिने आणि मौल्यवान भांडी जप्त करण्यात आली आहेत.

उत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये चोरांच्या एका हायटेक गँगचा पर्दाफाश झाला आहे. हे चोरचोरी करण्यासाठी चक्क विमानाने जायचे. चोरी केल्यानंतरही ते विमानानेच परत यायचे. सध्या या गँगमधील पाच जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. त्यांच्याकडून लाखो रुपये किमतीचे चोरीचे दागिने आणि मौल्यवान भांडी जप्त करण्यात आली आहेत.

मिर्झापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरीच्या घटनेचा तपास सुरू असतानाच चुनार येथे पाच जणांना पकडण्यात आलं. चौकशीत पाचही जणांनी चोरी केल्याची कबुली दिली. तसेच ते दिवसा जी घरं बंद आहेत त्याची रेकी करायचे आणि रात्री चोरी करायचे, असंही त्यांनी सांगितलं. मिर्झापूरशिवाय मुंबई, वाराणसी, भदोही, सोनभद्र येथेही ही गँग सक्रिय होती.

अटक करण्यात आलेले आरोपी नथू प्रसाद, आकाश पटेल, अमित राजभर, मनोज सेठ हे वाराणसी जिल्ह्यातील रहिवासी आहेत. आरोपींपैकी एक सूरज रामाश्रय यादव हा महाराष्ट्रातील पालघरचा रहिवासी आहे. ज्यावर मिर्झापूर आणि वाराणसीमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत.

नत्थू प्रसादवर विविध पोलीस ठाण्यात १६ तर आकाश पटेलविरुद्ध ४ गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून १२० किलो पितळेची भांडी, मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचे दागिने आणि कुलूप तोडण्यासाठी वापरली जाणारी अवजारं आदी साहित्य जप्त केलं आहे.

याप्रकरणी पोलीस अधीक्षक अभिनंदन यांनी दिलेल्य़ा माहितीनुसार, या लोकांचा मुंबईतही चोरीच्या घटनांमध्ये हात आहे. ते विमानाने मुंबईत चोरी करण्यासाठी ये- जा करत असत. त्यामुळे आम्ही आता मुंबई पोलिसांशीही संपर्क साधत आहोत. सध्या पाचही आरोपींना जेलमध्ये पाठविण्याची कारवाई सुरू आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसtheftचोरीThiefचोर