शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Unnao Rape: 'बलात्काराची राजधानी' अशी भारताची ओळख झालीय, नरेंद्र मोदी गप्प का?; राहुल गांधींचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 15:00 IST

उन्नाव बलात्कार पिडीतेचा मृत्यू झाल्यांतर आज उत्तर प्रदेशमध्ये वातावरण तापले आहे.

वायनाड : उन्नाव बलात्कार प्रकरणातील पिडीतेला गुरूवारी पेटवून देण्यात आले. आगीत 90 टक्के भाजल्याने काल रात्री तिचा दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. यावरून उत्तर प्रदेशमधील वातावरण संतप्त झाले असून गेल्या वर्षभरापासून पिडीता न्याय मागत भटकत होती. मात्र, आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी खटला फास्टट्रॅक कोर्टात चालविण्याची घोषणा केली आहे. या साऱ्या प्रकरणावर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी टीका केली आहे. 

उन्नाव बलात्कार पिडीतेचा मृत्यू झाल्यांतर आज उत्तर प्रदेशमध्ये वातावरण तापले आहे. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी लखनऊमध्ये विधानसभेबाहेर धरणे आंदोलन केले आहे. तर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी पिडीतेच्या घरच्यांची भेट घेतली आहे. तसेच पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला आहे. 

राहुल गांधी हे आज वायनाडमध्ये आहेत. यावेळी एका सभेदरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. भारत हा बलात्काराची जागतिक राजधानी बनला आहे. देशातील मुली आणि बहीणींना भारत का सुरक्षा पुरवू शकत नाही असे परदेशातून विचारले जात आहे. भाजपाचा आमदार उन्नाव बलात्कार प्रकरणात सहभागी आहे मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर चकार शद्ब काढत नाहीत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. 

उन्नाव बलात्कार पिडीतेचा मृतदेह रस्ते मार्गे उन्नावला नेला जात आहे. येथे तिला मातृभूमीच्या पोटात शांती दिली जाणार असल्याची भावना पिडीतेच्या बहीणीने व्यक्त केली आहे. चोहोबाजुंनी टीका केल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी उन्नावला त्यांचे दोन मंत्री पाठविले आहेत. भाजपा आमदार कुलदीप सेंगर याला काही महिन्यांपूर्वीच अटक करण्यात आली होती. तर त्याच्याविरोधात तक्रार करणाऱ्या मुलीच्या पित्याचा पोलिसांच्या कोठडीत मृत्यू झाला होता. 

टॅग्स :Unnao rape caseउन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणUttar Pradeshउत्तर प्रदेशNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीyogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाcongressकाँग्रेस