शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नागपुरात ट्रकच्या धडकेत दुचाकीचालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 00:33 IST

मुलीला शाळेतून घेण्यासाठी निघालेल्या वडिलांना ट्रकचालकाने जोरदार धडक मारल्याने त्यांचा करुण अंत झाला. हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रायसोनी कॉलेजसमोर गुरुवारी दुपारी ३.३० च्या सुमारास हा भीषण अपघात घडला.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर: मुलीला शाळेतून घेण्यासाठी निघालेल्या वडिलांना ट्रकचालकाने जोरदार धडक मारल्याने त्यांचा करुण अंत झाला. हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रायसोनी कॉलेजसमोर गुरुवारी दुपारी ३.३० च्या सुमारास हा भीषण अपघात घडला.हेमराज कवडूजी वरठी (वय ४५) असे मृताचे नाव आहे. ते सुकळी टाकळी येथे राहत होते. त्यांची मुलगी हिंगण्यात शिकते. तिला घेण्यासाठी ते सुकळी टाकळीवरून गुरुवारी दुपारी ३. ३० च्या सुमारास मोटरसायकलने मिहान ते हिंगणा मार्गाने येत होते. रायसोनी कॉलेजसमोर आरोपी ट्रकचालकाने निष्काळजीपणे ट्रक चालवून हेमराज वरठी यांच्या मोटरसायकलला मागून जोरदार धडक मारली. त्यामुळे वरठी यांचा करुण अंत झाला. दुर्गादास कवडूजी वरठी यांच्या तक्रारीवरून एएसआय प्रमोद पाटील यांनी आरोपी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.आरोपी फरारअपघातानंतर घटनास्थळी निर्माण झालेला तणाव बघता आरोपी ट्रकचालक तेथून पळून गेला. वेळीच पोलीस पोहचल्याने संभाव्य अनर्थ टळला. या अपघातामुळे वरठी यांच्या गावात शोककळा पसरली आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू