शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

धक्कादायक! गायी चोरल्याचा संशयावरून दोघांची हत्या; १३ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 15:14 IST

पश्चिम बंगालमधील कूचबिहार जिल्ह्यात ही घटना घडली

ठळक मुद्देप्रकाश दास (३२) आणि बाबुल मित्र (३७) अशी मृत दोघांची नावे आहेत.  आतापर्यंत पोलिसांनी १३ जणांना अटक केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक निंबाळकर यांनी दिली. 

पश्चिम बंगाल - दोन गायी चोरल्याच्या संशयावरून दोन जणांना जमावाने मरेपर्यंत बेदम मारहाण केली. पश्चिम बंगालमधील कूचबिहार जिल्ह्यात ही घटना घडली असून या प्रकरणी १३ जणांना अटक करण्यात आली आहे अशी माहिती कुचबिहारचे पोलीस अधीक्षक संतोष निंबाळकर यांनी दिली. प्रकाश दास (३२) आणि बाबुल मित्र (३७) अशी मृत दोघांची नावे आहेत.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माथाभंगा येथील रहिवाशी असलेले प्रकाश दास आणि बाबुल मित्र यांना सुमारे ५.३० वाजताच्या सुमारास सुमारे २० स्थानिकांनी थांबवून त्यांच्या पिकअप व्हॅनमध्ये गायी पहिल्या. त्यानंतर स्थानिकांनी त्या दोघांना गाडीतून बाहेर काढले आणि लाठी व दगडांनी बेदम मारहाण केली. पोलीस घटनास्थळी पोहोचताच जमाव पांगला. जखमी दोघांना ताबडतोब कूचबिहार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्या दोघांचा मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, प्रत्यक्षात या गायी चोरीला गेल्या आहेत की नाही याची माहिती पोलीस घेत आहेत. पश्चिम बंगालमध्ये गायींची तस्करी केली जात असल्याची अफवा पसरली होती. गायीची तस्करी केली जात असल्याचा संशय जमावाला आल्याने त्यांनी या दोघांना बेदम मारहाण केली. आतापर्यंत पोलिसांनी १३ जणांना अटक केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक निंबाळकर यांनी दिली. 

टॅग्स :LynchingलीचिंगRobberyचोरीwest bengalपश्चिम बंगालPoliceपोलिसcowगायDeathमृत्यू