शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

फ्लश केली गेली होती वैशालीची सुसाईड नोट, पोलिसांनी चिठ्ठीचा एक-एक तुकडा जोडला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2022 19:52 IST

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये टेलिव्हिजन अभिनेत्री वैशाली ठक्कर आत्महत्या प्रकरणाचा पोलीस वेगानं तपास करत आहेत.

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये टेलिव्हिजन अभिनेत्री वैशाली ठक्कर आत्महत्या प्रकरणाचा पोलीस वेगानं तपास करत आहेत. पोलिसांनी अभिनेत्रीच्या घराच्या शेजारी राहणाऱ्या राहुल आणि त्याची पत्नी दिशा यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तपासादरम्यान पोलिसांनी अभिनेत्रीची एक डायरी जप्त केली. त्यात अभिनेत्रीने तिच्या अनेक वैयक्तिक गोष्टींचा उल्लेख केला होता. टॉयलेटमध्ये फेकलेल्या सुसाईड नोटची फाडण्यात आलेली पानेही पोलिसांनी जप्त केली आहेत. पोलीस ठाण्याचे प्रभारी आर.डी.कनवा यांनी सुसाईड नोटची फाडलेली पानं जोडून महत्वाची माहिती गोळा केली आहे. 

तेजाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साईबाग कॉलनीतील हे प्रकरण आहे. येथे राहणारी टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्कर हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की शेजारी राहणारा राहुल इंटरनेट कॉलिंगद्वारे अभिनेत्री वैशालीचा छळ करत असे. निराश होऊन अभिनेत्रीने राहुलचे अनेक नंबर ब्लॉक केले. अभिनेत्री आणि राहुल यांच्यात काहीतरी भांडण असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे, मात्र काही कारणांमुळे दोघेही नंतर वेगळे झाले. त्यानंतर राहुल वैशालीला सतत त्रास देऊ लागला. वैशालीने तिच्या कुटुंबीयांना राहुलकडून त्रास होत असल्याचे सांगितले होते. कुटुंबीयांनी राहुलच्या कुटुंबीयांना संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आणि त्यांना समजावून सांगण्यात आले. त्यानंतरही राहुल वैशालीला त्रास देत होता, अशी माहिती समोर आली आहे. 

आरोपी अभिनेत्रीच्या घरी वारंवार यायचा आणि अत्याचार करायचापोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल आणि वैशालीच्या कुटुंबात खूप जवळीक होती, त्यामुळे राहुल हा अनेकदा वैशालीच्या भावाकडे येत असे. तासनतास व्हिडीओ गेम खेळायचा आणि यादरम्यान तो वैशालीला त्रास द्यायचा. त्याचबरोबर कुटुंबीयांनीही पोलिसांना सांगितले की, गेल्या अनेक दिवसांपासून राहुल वैशालीला वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देत होता. राहुलमुळेच अभिनेत्री डिप्रेशनमध्ये गेली आणि तिने असे पाऊल उचलले.

राहुलनेच अभिनेत्री वैशालीचे लग्नही मोडल्याचे तपासात समोर आले आहे. जिथे जिथे अभिनेत्री वैशालीच्या लग्नाची चर्चा होती तिथे राहुल चुकीची माहिती देऊन लग्न मोडायचा. त्याचबरोबर केनियाच्या अभिनंदन नावाच्या तरुणाशी अभिनेत्रीचे लग्न ठरले होते, तिथेही राहुलने चुकीची माहिती देऊन लग्न मोडले, अशी माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात नमूद केली आहे. या गोष्टींमुळे अभिनेत्री वैशाली खूप अस्वस्थ झाली आणि डिप्रेशनमध्ये गेली.

टॅग्स :Televisionटेलिव्हिजन