शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
4
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
5
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
6
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
7
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
8
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
9
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
10
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
11
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
12
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
13
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
14
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
15
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
16
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
17
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
18
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
19
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
20
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य

अंबरनाथ एमआयडीसीमध्ये अपघात; रासायनिक कंपनीमध्ये 3 कामगार भुयारी टाकीत उतरवले, गुदमरून मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 14:13 IST

accident in Ambernath MIDC: अंबरनाथ वडोल गाव येथिल एका रासायनिक कंपनीत असलेल्या भयारी रासायनिक टाकीला कलर लावण्यासाठी तीन कामगारांना बोलावण्यात आले होते. मात्र ठेकेदराने या कामगारांना या रासायनिक टाकीत साफ सफाई करण्यासाठी पाठविले.

अंबरनाथ: अंबरनाथएमआयडीसी मधील आयटीआय परिसरात असलेल्या रासायनिक कंपनीत भुयारी टाकीत उतरलेल्या 3 कामगारांचा गुदमरून मृत्यू  झाल्याची घटना घडली आहे. या कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्याचा काम अग्निशमन दलामार्फत करण्यात येत आहे. (Three workers suffocated in Chemical factory Ambernath.)

कंपनीत वेस्ट ऑईलवर प्रक्रिया करून रिसायकल करण्याचं काम केलं जाते.  ही कंपनी दोन वर्षांपासून बंद असून सध्या कंपनीच्या साफसफाई आणि नूतनीकरणाचं काम सुरू होते. यासाठी गोवंडी इथून चार कामगारांना रंगकामासाठी आणण्यात आले होते. या कामगारांना मागील आठवडाभरापासून कंपनीच्या आवारात असलेल्या केमिकलच्या भूमिगत टाक्या साफ करण्यास सांगण्यात आलेनहोते. त्यापैकीच एक टाकी साफ करत असताना अचानक या कामगारांना केमिकलच्या उग्र दर्पामुळे गुदमरू लागल्याने एक कामगार बाहेर आला. तर इतर तिघे टाकीतच बेशुद्ध पडले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला.

मृत्यू झालेले तिन्ही कामगार मूळचे उत्तर प्रदेशचे असून त्यांना या कामासाठी कुठल्याही सुरक्षात्मक वस्तू, मास्क, ऑक्सिजन सिलेंडर देण्यात आले नव्हते. या घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ पालिका अग्निशमन दल, एमआयडीसी अग्निशमन दल आणि उल्हासनगर महापालिका अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत या तीन कामगारांचे मृतदेह बाहेर काढले. या सगळ्यामध्ये निष्काळजीपणा दिसत असून संबंधितांवर कठोर कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या टाकीत रसायनिक द्रव साठवले जात होते. असे असतानाही कामगारांना त्या टाकीत कोणतीही सुरक्षा साधन न वापरता काम करण्यासाठी उतरविण्यात आले. ही घटना घडल्यावर अग्निशमन दल लागलीच घटनास्थळी गेले असून या टाकीतून कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहेत. तर या कामगारांच्या मृत्यूला जबाबदार धरून थेट कंपनीच्या मालकावरच गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसचे माजी नगरसेवक उमेश पाटील यांनी केली.

टॅग्स :ambernathअंबरनाथMIDCएमआयडीसी