शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

एल्गार परिषदेप्रकरणी एका तरुणीसह तिघांना पुण्यातून अटक; एनआयएची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2020 01:15 IST

माओवादी संघटनेशी संबंधित असल्याचा दावा

मुंबई : पावणेतीन वर्षांपूर्वी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सोमवारी रात्री पुण्यातून एका तरुणीसह तिघा परिवर्तनवादी चळवळीतील तरुणांना अटक केली.

सागर तात्याराम गोरखे (वय ३२, रा. वाकड), रमेश मुरलीधर गायचोर (वय ३६, रा. येरवडा) व ज्योती राघोबा जगताप (वय ३३, रा. कोंढवा) अशी त्यांची नावे असून सर्व जण कबीर कला मंचचे सदस्य आहेत. त्यांचा बंदी असलेल्या माओवादी संघटनेशी संबंध असल्याचा तपास यंत्रणेचा आरोप असून या सर्वा$ं$ना शुक्रवारपर्यंत एनआयए कोठडी मिळाली आहे.

पुण्यात शनिवारवाड्यासमोर ३१ डिसेंबर २०१७ रोजी कबीर कला मंचच्या वतीने एल्गार परिषद झालेली होती. त्या वेळी झालेल्या चिथावणीखोर भाषणामुळे १ जानेवारीला भीमा-कोरेगाव येथे दंगल झाली. या प्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून पुणे पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्रही दाखल केले. मात्र राज्यात सत्तांतर झाल्यानंतर केंद्राने सात महिन्यांपूर्वी पुणे पोलिसांकडून हा तपास एनआयएकडे वर्ग केला.

त्यानंतर या प्रकरणात फरारी असलेल्या डाव्या कट्टर विचारसरणीच्या नेत्यांनी कला मंच व इतर समविचारी संघटनेच्या कार्यकर्त्यांना भीमा-कोरेगाव येथील रस्ते आणि अन्य बाबीबद्दल माहिती पुरविली होती. त्याचप्रमाणे कला मंचच्या सदस्यांनी नक्षलवादी संघटनांशी हातमिळवणी करून शस्त्रे, स्फोटक चालविण्याबाबत प्रशिक्षण घेतले आहे. त्यानुसार एनआयएच्या पथकाने सोमवारी पुण्यात छापा टाकून तिघांना ताब्यात घेतले. सर्वांना मंगळवारी मुंबईतील विशेष न्यायालयात हजर केले असता त्यांना ११ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली.  

टॅग्स :PoliceपोलिसArrestअटक