शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

एल्गार परिषदेप्रकरणी एका तरुणीसह तिघांना पुण्यातून अटक; एनआयएची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2020 01:15 IST

माओवादी संघटनेशी संबंधित असल्याचा दावा

मुंबई : पावणेतीन वर्षांपूर्वी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सोमवारी रात्री पुण्यातून एका तरुणीसह तिघा परिवर्तनवादी चळवळीतील तरुणांना अटक केली.

सागर तात्याराम गोरखे (वय ३२, रा. वाकड), रमेश मुरलीधर गायचोर (वय ३६, रा. येरवडा) व ज्योती राघोबा जगताप (वय ३३, रा. कोंढवा) अशी त्यांची नावे असून सर्व जण कबीर कला मंचचे सदस्य आहेत. त्यांचा बंदी असलेल्या माओवादी संघटनेशी संबंध असल्याचा तपास यंत्रणेचा आरोप असून या सर्वा$ं$ना शुक्रवारपर्यंत एनआयए कोठडी मिळाली आहे.

पुण्यात शनिवारवाड्यासमोर ३१ डिसेंबर २०१७ रोजी कबीर कला मंचच्या वतीने एल्गार परिषद झालेली होती. त्या वेळी झालेल्या चिथावणीखोर भाषणामुळे १ जानेवारीला भीमा-कोरेगाव येथे दंगल झाली. या प्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून पुणे पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्रही दाखल केले. मात्र राज्यात सत्तांतर झाल्यानंतर केंद्राने सात महिन्यांपूर्वी पुणे पोलिसांकडून हा तपास एनआयएकडे वर्ग केला.

त्यानंतर या प्रकरणात फरारी असलेल्या डाव्या कट्टर विचारसरणीच्या नेत्यांनी कला मंच व इतर समविचारी संघटनेच्या कार्यकर्त्यांना भीमा-कोरेगाव येथील रस्ते आणि अन्य बाबीबद्दल माहिती पुरविली होती. त्याचप्रमाणे कला मंचच्या सदस्यांनी नक्षलवादी संघटनांशी हातमिळवणी करून शस्त्रे, स्फोटक चालविण्याबाबत प्रशिक्षण घेतले आहे. त्यानुसार एनआयएच्या पथकाने सोमवारी पुण्यात छापा टाकून तिघांना ताब्यात घेतले. सर्वांना मंगळवारी मुंबईतील विशेष न्यायालयात हजर केले असता त्यांना ११ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली.  

टॅग्स :PoliceपोलिसArrestअटक