शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

चिठ्ठीतून झाला उलगडा; वाराणसीतील चौघांच्या मृत्यूमागे पैसा अन् राजकीय दबाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2023 12:56 IST

कोंडा बाबू (50), लावण्या (45), राजेश (25) आणि जयराज (23) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे सामूहिक आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. एकाच कुटुंबातील ४ सदस्यांनी धर्मशाळेतील एका खोलीत आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली होती. आत्महत्या केलेले सर्वजण आंध्र प्रदेशच्या ईस्ट गोदावरी जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. मृत्यू झालेल्यांमध्ये आई-वडिलांसह दोन तरुण मुलांचा समावेश आहे. आता, या आत्महत्या प्रकरणातील गूढ उलगडलं असून राजकीय दबाव आणि आर्थिक तंगीतून त्यांनी आत्महत्या केल्याचा उलगडा मृत्युपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून झाला आहे.

कोंडा बाबू (50), लावण्या (45), राजेश (25) आणि जयराज (23) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. त्यामध्ये, पती-पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. हे सर्वजण ३ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता वाराणसी येथे आले होते. काशी यात्रा करणार असल्याचे सांगत त्यांनी खोली बुक केली. आपण, ७ डिसेंबर रोजी सकाळी खोली खाली करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. मात्र, त्यांनी खोलीत सामूहित आत्महत्या केल्याचं समोर आलं. 

पोलिसांना घटनास्थळावरुन तेलुगू भाषेत लिहिलेली सुसाईड नोट आढळून आली होती. आंध्र प्रदेशातील स्थानिक ठिकाणी पैशावरुन त्यांचा वाद सुरू होता. त्यावरुन, ते त्रस्त होते. सुसाईड नोटमध्ये लिहिलेल्या अनुसार, मांडा पेटा येथील दुर्गा दिव्यश्री ऑटो कन्सल्टन्सी कंपनी येथे मृतक राजेश काम करत होता. राजेशने खासगी कामासाठी कंपनी मालकाकडून ६ लाख रुपये घेतले होते. त्यामुळे, दुकानदार- पेंटगदल प्रसाद, रामीरेड्डी वीर लक्ष्मी आणि मल्ली बाबू यांनी राजेशच्या कुटुंबीयांस त्रास दिला. त्यावरच ते थांबले नाहीत, तर कुटुंबातील सदस्यांच्या १०-१० पेपरवर कोऱ्या सह्या घेतल्या. तसेच, २० ब्लँक चेकवरही सह्या घेतल्या होत्या. 

सुसाईड नोटमधील मजकुरानुसार पीडित कुटुंबाने घरातील सर्वच दागिने आणि इतर वस्तू विकून ५ लाख रुपयांचे कर्ज फेडले होते. मात्र, तरीही दुकानमालक व संबंधितांकडून सह्या घेतलेले पेपर्स आणि ब्लँक चेक परत केले जात नव्हते. याउलट, माजी मुख्यमंत्री व बड्या राजकीय व्यक्तीच्या नावाने धमकीही दिली होती. तसेच, १० दिवसांत ६ लाख रुपये देण्याचं बजावलं होतं. त्यामुळे, पीडित कुटुंब आंध्र प्रदेशातून निघून गेलं. कोलकातात, तामिळनाडू, हरिद्वार असा प्रवास करत ते वाराणसीला पोहोचले होते. आपल्या मृत्यूस दुकानदार- पेंटगदल प्रसाद, दुकानातील कर्मचारी- रामीरेड्डी वीर लक्ष्मी आणि राजकीय दबाव टाकणाऱ्या मल्ली बाबूंना जबाबदार असल्याचे म्हटले आहे. या तिघांना शिक्षा देऊन न्याय मिळावा, अशी मागणीह चिठ्ठीत करण्यात आली आहे. 

दरम्यान, दोन महिन्यांच्या भटकंतीनंतर हे कुटुंब वाराणसीत पोहोचले होते. त्यानंतर, येथील एका धर्मशाळेत त्यांनी एकत्रितपणे आत्महत्या केली. वाराणसीतील दश्वामेध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवनाथपूर पांडेहवेली परिसरात आंध्र आश्रम म्हणून एक धर्मशाला आहे. येथील खोली नंबर एस-६ मध्ये हे कुटुंब वास्तव्यास होते. मात्र, गुरुवारी सायंकाळपर्यंत कुटुंबातील कोणीही खोलीतून बाहेर आले नाही, किंवा खोलीही उघडल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे, धर्मशाळेच्या व्यवस्थापकाला संशय आला. त्यानंतर, त्यांनी पोलिसांशी संपर्क साधत माहिती दिली. पोलिसांच्या समोर बंद खोली उघडली असताना सामूहिक आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसVaranasiवाराणसी